शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
3
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
4
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
5
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
6
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
7
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
8
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
9
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
10
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
11
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
12
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
13
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
14
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
15
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
16
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
17
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
18
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
19
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
20
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

ज्ञान रचनावादाची घडी बदल्यांमुळे विस्कटणार

By admin | Updated: June 3, 2016 00:33 IST

प्राथमिक शाळांच्या अध्यापनात नव्या पर्वाला सुरुवात झाली. ज्ञानरचनावाद अध्यापनाने शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केली.

आज कार्यशाळा : आता शिक्षकांच्या तालुकास्तरीय बदल्याराजू बांते मोहाडी प्राथमिक शाळांच्या अध्यापनात नव्या पर्वाला सुरुवात झाली. ज्ञानरचनावाद अध्यापनाने शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केली. ज्ञानरचनावादाची मुळे खोलवर रूजण्याचे कार्य होत असताना मधातच प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. आता प्रशासकीय व विनंती बदल्या तालुकास्तरीय केल्या जाणार आहेत. या बदल्यांचा परिणाम ज्ञानरचनावादाच्या अध्यापनावर होणार आहे. जिल्हास्तरावर प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय विनंती, आपसी बदल्या जिल्हा परिषदेकडून करण्यात आल्या आहेत. आता तालुकास्तरावर प्रशासकीय व विनंती करण्यासंबंधी कार्यशाळा होत आहेत. प्रत्येक तालुक्यातून प्राथमिक शिक्षक प्रशासकीय बदलीने दूर गेले. शाळांचे स्थान बदल झाले. या बदलाचा परिणाम अध्यापनाच्या कार्यक्षमतेवर पडणार आहे.शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन करण्यासाठी ज्ञानरचनावाद ही संकल्पना आखली गेली. निराशमय अध्यापन पद्धतीत बदल होऊन आनंद देणारी शिक्षण प्रणाली रुढ व्हायला लागली. शिक्षकांनी नव्या ज्ञानरचनावादी अध्यापनाचा पुरस्कार केला. मोठ्या आनंदाने, चैतन्याने फुलून गेलेला प्राथमिक शिक्षक नव्या दमाने ज्ञानरचनावादाची संकल्पना वास्तवात उतरायला लागला होता. काही शिक्षकांची बदली मनाविरुद्ध झाली असेल असे शिक्षक पुरते खचले आहेत. ज्ञानरचनावाद अध्यापनाची मुळे दृढ करायला सुदृढ मानसिकतेची आवश्यकता असते. अशा खचलेल्या शिक्षकांच्या मानसिकतेला मजबूत करण्यासाठी समुपदेशनाची गरज भासणार आहे.मोहाडी तालुक्यातून ५९ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा बदली झाली. तेवढेच शिक्षक तालुक्यात आले आहेत. मोहाडी तालुक्यात १९ पदे पदवीधरांची रिक्त आहेत. ७ रिक्त पदे उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची आहेत. तालुकास्तरावर प्रशासकीय बदल्या ३२ होणार आहेत. तर विनंती बदल्या १६ करण्यात येणार आहेत. पांढराबोडी, सिरसोली, कांद्री, हिवरा, नवेगाव, पिंपळगाव, सकरला, शिवनी, मुंढरी खुर्द, निलज खुर्द, नवेगाव बु., ढिवरवाडा, जांभोरा, धुसाळा, बेटाळा, मोहगाव व बोथली या शाळांमध्ये ६ ते ८ वीच्या वर्गावर प्रशासकीय बदलीने ७ पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत. मोहाडी शिक्षण विभागाची बदलीची कार्यशाळा ३ जून रोजी पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे. प्राथमिक शिक्षणात अधिक सुत्रबद्धता यावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यासंबंधी नवीन धोरण आखले पाहिजे.- हरिश्चंद्र बंधाटे, सभापती, पं.स. मोहाडी.स्थानांतरणामुळे ज्ञानरचनावादाच्या प्रक्रियेवर काहीअंशी परिणाम होईल. प्रभावी संप्रेषण व सामाजिक समायोजनाची प्रक्रिया मंदावणार आहे. त्याचा परिणाम गुणवत्ता वाढीवर होऊ शकतो.- विनायक मोथारकर, शिक्षक, जि.प. प्राथमिक शाळा, खापा.