शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
4
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
5
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
6
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
7
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
8
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
9
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
10
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
11
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
12
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
13
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
14
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
15
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
16
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
17
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
18
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
19
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
20
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!

किसनपूर मूलभूत सुविधांपासून वंचित

By admin | Updated: August 12, 2014 23:36 IST

करडी(पालोरा): कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी न्यू नागझिरा व्याघ्र अभयारण्याच्या सिमेवर असलेल्या नक्षलप्रभावित किसनपूर विकासापासून कोसो दूर आहे.

करडी(पालोरा) : करडी(पालोरा): कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी न्यू नागझिरा व्याघ्र अभयारण्याच्या सिमेवर असलेल्या नक्षलप्रभावित किसनपूर विकासापासून कोसो दूर आहे. स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंंतरही गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही.व्याघ्र प्रकल्पामुळे जंगलावर आधारित व्यवसाय बंद पडल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.कोका जंगल टेकड्यांच्या घनदाट अभयारण्याशेजारी फुटक्या तलावाच्या जवळ मोहाडी तालुक्यातील किसनपूर गाव आहे.सध्या गावाच्या सभोवतालचा परिसर न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तारित झोनमध्ये मोडतो. गावाच्या शेजारीच गोंदिया जिल्ह्याच्या सीमा सुरु होतात. स्वातंत्र्याच्या काही वर्षापर्यंत येथे ५०-६० घरांची वस्ती होती. आज केवळ सहा कुटुंब वास्तव्याला आहेत. जंगलातील लाकडे, काड्यामोळ्या आणून शेजारील गावात जाऊन विकणे, त्याचबरोबर झुडपी जंगलाच्या जागेत शेती करुन येथील नागरिक आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवितात. अगोदर येथे वनपरिक्षेत्रधिकाऱ्याचे कार्यालय सुद्धा होते. मात्र विद्युत, शिक्षण व रस्त्याच्या असुविधेमुळे येथील लोकांनी ३ किमी अंतरावरील मोकळ्याजागेत वसाहत तयार केली. नागरिक गाव सोडून जाऊ लागल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी निवासस्थाने रिकामी केली आहेत.मोठ्या गावात स्थलांतरित झाले. गावात केवळ ६ कुटुंब वास्तव्याला आहेत. प्राथमिक शिक्षणासाठी येथील मुलांना जंगलातून ३ किमीचे अंतर पार करुन स्थलांतरीत गावात जावे लागते. तर ८ ते १० वर्गासाठी ७ किमी अंतरावरील गावाकडे पोहोचावे लागते. यामुळे काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. गावात शिक्षणाचे प्रमाण नगण्य आहे. निरक्षणतेबरोबर कुपोषणाचे प्रमाण सुद्धा बरेच आहे.गावात जाण्यायेण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात अनेक कठीनाईचा सामना करावा लागतो. आठवडी बाजारासाठी पालोरा गावी तर दैनंदिन व्यवहारासाठी करडी गावाशी संपर्क साधताना परिश्रम घ्यावे लागतात. किसनपूर गाव जांभोरा गटग्रामपंचायत अंतर्गत मोडत असले तरी येथील नागरिकांना ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधीत्व मिळत नाही. गावात त्यामुळे शासकीय योजनांचा अभाव दिसून येतो. सन १९९३ ला गावात नक्षलवादी येऊन गेल्याची नोंद पोलीस अभिलेखात आहे. परंतु गाव विकासासाठी ठोस उपाययोजना आखल्या गेल्या नाहीत. दोन वर्षाअगोदर गावात विद्युतची सोय नव्हती. लोकप्रतिनिधी व विद्युत विभागाच्या प्रयत्नामुळे गावात विद्युत पोल पोहचून डीपी लावली गेली. अंधाराचे साम्राज्य असलेल्या गावात प्रथमच प्र्रकाश पडला. आजही गाव पक्का रस्ता व शिक्षणाच्या सोयींपासून वंचित आहे. (वार्ताहर)