शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

किसनपूर मूलभूत सुविधांपासून वंचित

By admin | Updated: August 12, 2014 23:36 IST

करडी(पालोरा): कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी न्यू नागझिरा व्याघ्र अभयारण्याच्या सिमेवर असलेल्या नक्षलप्रभावित किसनपूर विकासापासून कोसो दूर आहे.

करडी(पालोरा) : करडी(पालोरा): कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी न्यू नागझिरा व्याघ्र अभयारण्याच्या सिमेवर असलेल्या नक्षलप्रभावित किसनपूर विकासापासून कोसो दूर आहे. स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंंतरही गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही.व्याघ्र प्रकल्पामुळे जंगलावर आधारित व्यवसाय बंद पडल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.कोका जंगल टेकड्यांच्या घनदाट अभयारण्याशेजारी फुटक्या तलावाच्या जवळ मोहाडी तालुक्यातील किसनपूर गाव आहे.सध्या गावाच्या सभोवतालचा परिसर न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तारित झोनमध्ये मोडतो. गावाच्या शेजारीच गोंदिया जिल्ह्याच्या सीमा सुरु होतात. स्वातंत्र्याच्या काही वर्षापर्यंत येथे ५०-६० घरांची वस्ती होती. आज केवळ सहा कुटुंब वास्तव्याला आहेत. जंगलातील लाकडे, काड्यामोळ्या आणून शेजारील गावात जाऊन विकणे, त्याचबरोबर झुडपी जंगलाच्या जागेत शेती करुन येथील नागरिक आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवितात. अगोदर येथे वनपरिक्षेत्रधिकाऱ्याचे कार्यालय सुद्धा होते. मात्र विद्युत, शिक्षण व रस्त्याच्या असुविधेमुळे येथील लोकांनी ३ किमी अंतरावरील मोकळ्याजागेत वसाहत तयार केली. नागरिक गाव सोडून जाऊ लागल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी निवासस्थाने रिकामी केली आहेत.मोठ्या गावात स्थलांतरित झाले. गावात केवळ ६ कुटुंब वास्तव्याला आहेत. प्राथमिक शिक्षणासाठी येथील मुलांना जंगलातून ३ किमीचे अंतर पार करुन स्थलांतरीत गावात जावे लागते. तर ८ ते १० वर्गासाठी ७ किमी अंतरावरील गावाकडे पोहोचावे लागते. यामुळे काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. गावात शिक्षणाचे प्रमाण नगण्य आहे. निरक्षणतेबरोबर कुपोषणाचे प्रमाण सुद्धा बरेच आहे.गावात जाण्यायेण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात अनेक कठीनाईचा सामना करावा लागतो. आठवडी बाजारासाठी पालोरा गावी तर दैनंदिन व्यवहारासाठी करडी गावाशी संपर्क साधताना परिश्रम घ्यावे लागतात. किसनपूर गाव जांभोरा गटग्रामपंचायत अंतर्गत मोडत असले तरी येथील नागरिकांना ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधीत्व मिळत नाही. गावात त्यामुळे शासकीय योजनांचा अभाव दिसून येतो. सन १९९३ ला गावात नक्षलवादी येऊन गेल्याची नोंद पोलीस अभिलेखात आहे. परंतु गाव विकासासाठी ठोस उपाययोजना आखल्या गेल्या नाहीत. दोन वर्षाअगोदर गावात विद्युतची सोय नव्हती. लोकप्रतिनिधी व विद्युत विभागाच्या प्रयत्नामुळे गावात विद्युत पोल पोहचून डीपी लावली गेली. अंधाराचे साम्राज्य असलेल्या गावात प्रथमच प्र्रकाश पडला. आजही गाव पक्का रस्ता व शिक्षणाच्या सोयींपासून वंचित आहे. (वार्ताहर)