शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

किसनपूर मूलभूत सुविधांपासून वंचित

By admin | Updated: August 12, 2014 23:36 IST

करडी(पालोरा): कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी न्यू नागझिरा व्याघ्र अभयारण्याच्या सिमेवर असलेल्या नक्षलप्रभावित किसनपूर विकासापासून कोसो दूर आहे.

करडी(पालोरा) : करडी(पालोरा): कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्याशी न्यू नागझिरा व्याघ्र अभयारण्याच्या सिमेवर असलेल्या नक्षलप्रभावित किसनपूर विकासापासून कोसो दूर आहे. स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंंतरही गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही.व्याघ्र प्रकल्पामुळे जंगलावर आधारित व्यवसाय बंद पडल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.कोका जंगल टेकड्यांच्या घनदाट अभयारण्याशेजारी फुटक्या तलावाच्या जवळ मोहाडी तालुक्यातील किसनपूर गाव आहे.सध्या गावाच्या सभोवतालचा परिसर न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तारित झोनमध्ये मोडतो. गावाच्या शेजारीच गोंदिया जिल्ह्याच्या सीमा सुरु होतात. स्वातंत्र्याच्या काही वर्षापर्यंत येथे ५०-६० घरांची वस्ती होती. आज केवळ सहा कुटुंब वास्तव्याला आहेत. जंगलातील लाकडे, काड्यामोळ्या आणून शेजारील गावात जाऊन विकणे, त्याचबरोबर झुडपी जंगलाच्या जागेत शेती करुन येथील नागरिक आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवितात. अगोदर येथे वनपरिक्षेत्रधिकाऱ्याचे कार्यालय सुद्धा होते. मात्र विद्युत, शिक्षण व रस्त्याच्या असुविधेमुळे येथील लोकांनी ३ किमी अंतरावरील मोकळ्याजागेत वसाहत तयार केली. नागरिक गाव सोडून जाऊ लागल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी निवासस्थाने रिकामी केली आहेत.मोठ्या गावात स्थलांतरित झाले. गावात केवळ ६ कुटुंब वास्तव्याला आहेत. प्राथमिक शिक्षणासाठी येथील मुलांना जंगलातून ३ किमीचे अंतर पार करुन स्थलांतरीत गावात जावे लागते. तर ८ ते १० वर्गासाठी ७ किमी अंतरावरील गावाकडे पोहोचावे लागते. यामुळे काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. गावात शिक्षणाचे प्रमाण नगण्य आहे. निरक्षणतेबरोबर कुपोषणाचे प्रमाण सुद्धा बरेच आहे.गावात जाण्यायेण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात अनेक कठीनाईचा सामना करावा लागतो. आठवडी बाजारासाठी पालोरा गावी तर दैनंदिन व्यवहारासाठी करडी गावाशी संपर्क साधताना परिश्रम घ्यावे लागतात. किसनपूर गाव जांभोरा गटग्रामपंचायत अंतर्गत मोडत असले तरी येथील नागरिकांना ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधीत्व मिळत नाही. गावात त्यामुळे शासकीय योजनांचा अभाव दिसून येतो. सन १९९३ ला गावात नक्षलवादी येऊन गेल्याची नोंद पोलीस अभिलेखात आहे. परंतु गाव विकासासाठी ठोस उपाययोजना आखल्या गेल्या नाहीत. दोन वर्षाअगोदर गावात विद्युतची सोय नव्हती. लोकप्रतिनिधी व विद्युत विभागाच्या प्रयत्नामुळे गावात विद्युत पोल पोहचून डीपी लावली गेली. अंधाराचे साम्राज्य असलेल्या गावात प्रथमच प्र्रकाश पडला. आजही गाव पक्का रस्ता व शिक्षणाच्या सोयींपासून वंचित आहे. (वार्ताहर)