शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

परिश्रमातून समृद्धीचा मळा फुलविणारा किन्हीचा शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:36 IST

संतोष जाधवर भंडारा : शेती आणि निसर्गाचे विळ्या-भोपळ्याचे नाते. दरवर्षी नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीतही परिश्रमातून साकोली ...

संतोष जाधवर

भंडारा : शेती आणि निसर्गाचे विळ्या-भोपळ्याचे नाते. दरवर्षी नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीतही परिश्रमातून साकोली तालुक्यातील किन्ही मोखे येथील शेतकऱ्याने समृद्धीचा मळा फुलविला. त्यांच्या या परिश्रमावर शासनाची मोहर लागली. घनश्याम बळीराम पारधी यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार घोषित झाला. त्यांनी शेतीत केलेल्या बदलाचे रहस्य उलगडण्यासाठी ‘लोकमत’ने साधलेला संवाद.

साकोली तालुक्यातील किन्ही मोखे गाव शेतीवर अवलंबून. याच गावात एक अल्पभूधारक शेतकरी नवनवीन प्रयोग करून आपल्यासोबत इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करीत आहे. घनश्याम पारधी असे या शेतकऱ्याचे नाव आहे. शालेय जीवनात पितृछत्र हरपल्याने त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. आपसूकच शेती कसण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय नव्हता. १९९७-९८ पासून त्यांनी शेती कसणे सुरू केली. सुरुवातीपासूनच परिश्रमाची जोड देत त्यांनी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग केले. १९९८ साली मिलिंद ढोणे या कृषी सहायकांशी त्यांची गाठ पडली आणि तेथून सुरू झाली आधुनिक तंत्रज्ञानाने शेती कसण्याची पद्धत. शेतकरी प्रशिक्षण, नवनवीन ज्ञान मिळविण्याची आवड यातून त्यांनी शेतीचे चित्रच पालटले. अवघ्या साडेचार एकर शेतीत त्यांनी हे सर्व प्रयोग केले.

आधुनिक तंत्रज्ञानासोबतच विषमुक्त शेती पिकविण्याचा ध्यास घनश्याम पारधी यांनी घेतला. आजही ते अडीच एकर शेतीत सेंद्रिय पद्धतीनेच धान पिकवितात. बीबीएफ पद्धतीचा अवलंब करून त्यातून एकरी १२ ते १४ क्विंटल धानाचे उत्पन्न काढतात. विशेष म्हणजे या विषमुक्त धानाला इतर शेतकऱ्यांपेक्षा अधिक दर मिळतो. जय श्रीराम जातीच्या धानाला साधारणत: ४० ते ४५ रुपये दर मिळत असल्याचे घनश्याम पारधी सांगतात.

धानासोबतच त्यांनी विषमुक्त भाजीपाल्याचा प्रयोगही आपल्या शेतात सुरू केला. बोर वृक्षाची लागवड केली. त्यातूनही त्यांना उत्पन्न मिळत आहे. या सर्वांमध्ये त्यांना कृषी विभागाचे मिळालेले मार्गदर्शन बहुमूल्य ठरले. साकोली कृषी अधिकारी वृषाली देशमुख, तालुका कृषी अधिकारी सागर ढवळे, कृषी सहायक परशुरामकर, स्मिता मोहरकर, कृषी मंडळ अधिकारी मेश्राम आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करीत असल्याचे ते विनम्रपणे सांगतात. अशा या शेतकऱ्याचा महाराष्ट्र शासनाने गौरव केला असून, त्यांना २०१९ सालचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार घोषित झाला आहे.

बाॅक्स

शेतकऱ्यांना विनामूल्य मार्गदर्शन

घनश्याम पारधी यांनी शेतीत केलेले नवनवीन प्रयोग आपल्यापुरतेच मर्यादित न ठेवता इतर शेतकऱ्यांनाही त्यात सहभागी करून घेतले. शेतकऱ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. शेती विषयातील नवनवीन ज्ञान आत्मसात करून ते आपल्या सहकारी शेतकऱ्यांना सांगतात. इतरही शेतकरी त्यांचा आदर्श घेत शेती करीत आहेत.

कोट

आधुनिक पद्धतीने शेती करीत आहेत. दहा वर्षांपासून शेती कसत आहे. रासायनिक खतांचा अतिरेक कमी करून विषमुक्त पीक घेतले जात आहे. भविष्यात परिसरातील शेतकऱ्यांना एकत्रित करून मोठ्या प्रमाणात विषमुक्त पीक पिकविले जाईल. हा माल परराज्यात विक्रीसाठी पाठविण्याचा प्रयत्न आहे.

-घनश्याम पारधी, शेतकरी किन्ही (मोखे)