शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

‘गणेशपूरचा राजा’ साकारतोय श्रीफळातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:19 IST

शहराच्या सांस्कृतीक वैभवात भर घालणाऱ्या सन्मित्र गणेश उत्सव मंडळाने यावर्षी गणेशपूरचा राजा श्रीफळातून (नारळ) साकारण्याचा संकल्प केला. हा संकल्प पुर्णत्वास जात असून वैशिष्ट्यपूर्ण अशी श्रीफळातून श्रीची मुर्ती आकारास येत आहे. सामाजिक प्रबोधन आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा गणेशात्सव शहरवासीयांसाठी पर्वणी ठरणार आहे.

ठळक मुद्देसामाजिक प्रबोधन : सन्मित्र गणेश मंडळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराच्या सांस्कृतीक वैभवात भर घालणाऱ्या सन्मित्र गणेश उत्सव मंडळाने यावर्षी गणेशपूरचा राजा श्रीफळातून (नारळ) साकारण्याचा संकल्प केला. हा संकल्प पुर्णत्वास जात असून वैशिष्ट्यपूर्ण अशी श्रीफळातून श्रीची मुर्ती आकारास येत आहे. सामाजिक प्रबोधन आणि विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा गणेशात्सव शहरवासीयांसाठी पर्वणी ठरणार आहे.भंडारा शहरातील गणेशपूर परिसरात गणेशपूरच्या राजाची दरवर्षी स्थापना केली जाते. दरवर्षी विविधता व वेगळेपण जपणाºया या मंडळाने सामाजिक जाणीवाही जोपासल्या आहेत. यावर्षी श्रीची मुर्ती श्रीफळातून साकारण्याचा संकल्प मंडळाचे अध्यक्ष विनोद भुरे यांनी केला. मंडळाच्या सर्व सहकार्यांच्या मदतीने श्रीफळातून अर्थात नारळातून २१ फूट उंचीची मुर्ती आकारास येत आहे. या शिवाय मंडप परिसरात निसर्गरम्य देखावा, रोषनाई, उत्कृष्ठ सजावट, आरास भाविकांचे मन व नेत्र तृप्त करेल यात शंका नाही.यासोबत सामाजिक प्रबोधन, पर्यावरण, जागृती, रक्तदानशिबिर आयोजित करण्यात येणार आहे. श्री च्या दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठी आनंदमेळावा आणि मिनी सर्कसचे आयोजन करण्यात आले आहे. हे या वर्षीचे खास आकर्षण ठरणार आहे. गणेश भक्तांची सेवा व शिस्तबध्दता यासाठी मंडळाचे कार्यकर्ते तत्पर आहेत. गुरुवारी श्री गणेशाचे वाजतगाजत प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.नारळ विक्रीतून विद्यार्थ्यांना मदतसन्मित्र गणेश उत्सव मंडळाच्या वतीने पर्यावरण पुरक अशी नारळापासून गणेशाची मुर्ती तयार केली आहे. विसर्जन करण्यापुर्वी श्रीच्या मुर्तीचे नारळ भाविकांना प्रसाद म्हणून अल्प देणगी घेवून देण्यात येतील. या देणगीतून गोळा झालेली रक्कम समाजातील होतकरु, गरजू, कमकुवत हुशार विद्यार्थ्यांना दिली जाईल, असे विनोद भुरे यांनी सांगितले.