शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर खुटसावरी टेकडीचा परवाना केला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST

ग्रामपंचायतीने मासिक सभेतील ठरावात गौण खनिज पट्टा सुरुंग लावणे, खोदकाम करणे, तसेच क्रशर लावून दगड फोडण्याची मंजुरी पाच वर्षे ...

ग्रामपंचायतीने मासिक सभेतील ठरावात गौण खनिज पट्टा सुरुंग लावणे, खोदकाम करणे, तसेच क्रशर लावून दगड फोडण्याची मंजुरी पाच वर्षे कालावधीकरिता प्रदान केली होती. मात्र, या ठरावाला झुगारून प्रशासनाने खनिज उत्खननाचा परवाना दहा वर्षांचा दिला. जवळपास पाच वर्षांपासून चालत आलेल्या उत्खननामुळे त्या ठिकाणी मोठमोठे जीव घेणारे खड्डे तयार झाले आहेत व रस्त्याचीसुद्धा दुरवस्था झाली आहे. त्या खोल जीवघेण्या खड्ड्यांमुळे जवळपासच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचत नसल्यामुळे पिकांचेसुद्धा नुकसान होत आहे. त्यासोबतच गावकऱ्यांनासुद्धा धोका संभवत आहे. ग्रामपंचायत व गावकऱ्यांकडून परवानाधारकास ‘जीव घेणे खड्डे’ बुजविण्याची विनंती करण्यात आली; परंतु परवानाधारकाने ‘जिल्हाधिकाऱ्यांकडून मला दहा वर्षांकरिता परवाना मिळालेला आहे’ असे सांगून ग्रामपंचायतीच्या विनंतीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय व केंद्रीय मानवाधिकार संघटनेने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन न्यायाची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सदर प्रकरणाच्या चौकशीला प्रारंभ केला. दरम्यान, लीजधारकाने २७ मे रोजी सदर क्षेत्रामध्ये दगड, मुरूम उपलब्ध नसून, या मालाची विक्री होत नाही, हे कारण दाखवून खाणपट्टा बंद करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाला केली. यावर प्रशासनाने २१ जून रोजी दखल घेतली. मोजणीअंती जास्त गौण खनिजांचे उत्खनन केल्याचे आढळून आल्यास वाढीव स्वामित्वधनाची रक्कम जमा करण्याच्या शर्तीवर लीजधारकास खाण सोडून देण्यास परवानगी दिली आहे.

बॉक्स

नुकसानभरपाई व चुकीच्या परवान्याचे काय?

ग्रामपंचायत खुटसावरीने सदर टेकडीच्या उत्खननासाठी ठराव घेऊन पाच वर्षांकरिता ना हरकत दिली असताना परवानाधारकास तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दहा वर्षांचा परवाना दिलाच कसा? उत्खननाच्या परवान्याला पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच परवाना रद्दची मागणी करणे यातून प्रकरणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न होत असल्याची खमंग चर्चा आहे. टेकडीतून मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले असल्याचे वास्तव आहे. आता सदर क्षेत्रामध्ये दगड, मुरूम उपलब्ध नसल्याचे खुद्द लीजधारक कबूल करीत आहेत. सदर टेकडीच्या उत्खननासंबंधी दोषी अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करून त्यांच्यावर गावकऱ्यांच्या झालेल्या व होत असलेल्या नुकसानभरपाईचा व चुकीचा परवाना दिल्याबद्दलचा कारवाई करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे.