शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

अखेर खुटसावरी टेकडीचा परवाना केला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST

ग्रामपंचायतीने मासिक सभेतील ठरावात गौण खनिज पट्टा सुरुंग लावणे, खोदकाम करणे, तसेच क्रशर लावून दगड फोडण्याची मंजुरी पाच वर्षे ...

ग्रामपंचायतीने मासिक सभेतील ठरावात गौण खनिज पट्टा सुरुंग लावणे, खोदकाम करणे, तसेच क्रशर लावून दगड फोडण्याची मंजुरी पाच वर्षे कालावधीकरिता प्रदान केली होती. मात्र, या ठरावाला झुगारून प्रशासनाने खनिज उत्खननाचा परवाना दहा वर्षांचा दिला. जवळपास पाच वर्षांपासून चालत आलेल्या उत्खननामुळे त्या ठिकाणी मोठमोठे जीव घेणारे खड्डे तयार झाले आहेत व रस्त्याचीसुद्धा दुरवस्था झाली आहे. त्या खोल जीवघेण्या खड्ड्यांमुळे जवळपासच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचत नसल्यामुळे पिकांचेसुद्धा नुकसान होत आहे. त्यासोबतच गावकऱ्यांनासुद्धा धोका संभवत आहे. ग्रामपंचायत व गावकऱ्यांकडून परवानाधारकास ‘जीव घेणे खड्डे’ बुजविण्याची विनंती करण्यात आली; परंतु परवानाधारकाने ‘जिल्हाधिकाऱ्यांकडून मला दहा वर्षांकरिता परवाना मिळालेला आहे’ असे सांगून ग्रामपंचायतीच्या विनंतीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय व केंद्रीय मानवाधिकार संघटनेने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन न्यायाची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सदर प्रकरणाच्या चौकशीला प्रारंभ केला. दरम्यान, लीजधारकाने २७ मे रोजी सदर क्षेत्रामध्ये दगड, मुरूम उपलब्ध नसून, या मालाची विक्री होत नाही, हे कारण दाखवून खाणपट्टा बंद करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाला केली. यावर प्रशासनाने २१ जून रोजी दखल घेतली. मोजणीअंती जास्त गौण खनिजांचे उत्खनन केल्याचे आढळून आल्यास वाढीव स्वामित्वधनाची रक्कम जमा करण्याच्या शर्तीवर लीजधारकास खाण सोडून देण्यास परवानगी दिली आहे.

बॉक्स

नुकसानभरपाई व चुकीच्या परवान्याचे काय?

ग्रामपंचायत खुटसावरीने सदर टेकडीच्या उत्खननासाठी ठराव घेऊन पाच वर्षांकरिता ना हरकत दिली असताना परवानाधारकास तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी दहा वर्षांचा परवाना दिलाच कसा? उत्खननाच्या परवान्याला पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच परवाना रद्दची मागणी करणे यातून प्रकरणाला कलाटणी देण्याचा प्रयत्न होत असल्याची खमंग चर्चा आहे. टेकडीतून मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले असल्याचे वास्तव आहे. आता सदर क्षेत्रामध्ये दगड, मुरूम उपलब्ध नसल्याचे खुद्द लीजधारक कबूल करीत आहेत. सदर टेकडीच्या उत्खननासंबंधी दोषी अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करून त्यांच्यावर गावकऱ्यांच्या झालेल्या व होत असलेल्या नुकसानभरपाईचा व चुकीचा परवाना दिल्याबद्दलचा कारवाई करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे.