शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

खोकरला येथे मृतदेहालाही ‘नरकयातना’

By admin | Updated: May 12, 2016 00:44 IST

प्रत्येक गावातील मृतात्म्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीची जागा राखीव ठेवण्यात आली आहे.

नागरिकांमध्ये संताप : प्रशासनाची भूमिका असहकाराचीप्रशांत देसाई भंडाराप्रत्येक गावातील मृतात्म्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र शहरालगत असलेल्या खोकरला येथील स्मशानभूमीवर काही व्यक्तींनी अक्षरश: संरक्षण भिंत बांधून अतिक्रमण केले आहे. यामुळे येथे अंत्यसंस्कारांसाठी जाणाऱ्यांना मार्ग नसल्याने तारेचे कुंपण व भिंतीतून निमुळता मार्ग बनवून येथून मृतात्म्याला नेले जाते. यामुळे मृत्यूनंतरही मानवाची अवहेलना होत असल्याची विदारक स्थिती खोकरल्यात बघायला मिळत आहे. शहरालगतच्या खोकरला ग्रामपंचायतीची लोकसंख्या जेमतेम ६ हजार ५०० च्या घरात आहे. या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या नऊ असून येथे भाजप प्रणित सरपंच आहे. या गावाचा स्मशानभूमीसाठी गावातीलच एकेकाळचे दानशूर श्री धांडे यांनी त्यांचा हिस्सातील गट क्रमांक १२१/१ मधील ६३ आर म्हणजे १.५३ एकर जमीन गावाला दान दिली होती. त्यातील काही जागेत गावची ढोरबोडी आहेत. काही वर्षापर्यंत खोकरला येथील नागरिक या स्मशानभूमीत गावातील मृत व्यक्तींचा अंत्यसंस्कारांचा कार्यक्रम पार करीत होते. मात्र काही वर्षाच्या कालावधीनंतर तत्कालीन तलाठी पठाण यांच्या कार्यकाळात अनेकांनी स्मशानभूमीलगतच्या जमिनी विकत घेतल्या. यावेळी स्मशानभूमीच्याही जागेचा ताबा काही धनदांडग्यांनी घेतला. एवढेच नव्हे तर त्यांनी स्मशानभूमीचा जागेवर चौफेर संरक्षण भिंत उभी केली. यामुळे स्मशानभूमीची वहीवाटीनुसार असलेली हद्द व रस्ता संरक्षण भिंतीत गडप केली. यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जाण्याचा मार्ग पूर्णत: बंद करण्यात आला आहे. यामुळे अंत्यसंस्काराला जातांना नागरिकांना संरक्षण भींत फोडून किंवा काटेरी कुंपण तोडून जावे लागते. यावर लगतचा जमिन मालकांने आक्षेप घेवून पुन्हा भींत चालविली आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर स्मशानभूमीची हडप केलेली जमीन परत मिळवून द्यावी व मृतात्म्याला शांती मिळावी हिच खोकरला वासियांची मागणी आहे.