शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

खरिपाच्या तोंडावर बाजारात जनावरांचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:19 IST

पावसाळा अगदी उंबरठ्यावर आला आहे. शेतीच्या कामाची लगबग सुरु झाली आहे. परंपरागत पध्दतीने शेती कसण्यासाठी बैलांची आवश्यकता आहे. मात्र गोपालनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने बैलांची संख्या रोडावली आहे. परिणामी बैलबाजारात जनावरांचे भाव चांगलेच वधारले आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : बैलांची संख्या रोडावली, मजुरी, बियाणे, खते आदींचे दर वाढले

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी(पालोरा) : पावसाळा अगदी उंबरठ्यावर आला आहे. शेतीच्या कामाची लगबग सुरु झाली आहे. परंपरागत पध्दतीने शेती कसण्यासाठी बैलांची आवश्यकता आहे. मात्र गोपालनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याने बैलांची संख्या रोडावली आहे. परिणामी बैलबाजारात जनावरांचे भाव चांगलेच वधारले आहे. देव्हाडा येथील प्रसिध्द गुरांचा बाजारात जनावरांच्या किंमतीत अचानक सात हजार रुपयापर्यंत वाढ झाल्याचे दिसत आहेत.तुमसर तालुक्यातील देव्हाडा येथील बैलबाजार प्रसिध्द आहे. पुर्व विदर्भातील अनेक व्यापारी येथे खरेदी-विक्रीसाठी येतात. दर बुधवारी देव्हाडीचा बैलबाजार भरतो. त्यामुळे परिसरातील शेतकरी जनावरे खरेदीसाठी येथे येतात. दर आठवड्याला येथील बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होते. सध्या शेतीहंगामाचा कामाला सुरुवात झाली आहे. बैलांची आवश्यकता असल्याने शेतकरी बाजारात चाचपणी करीत असल्याचे दिसत आहे. मात्र जनावरांचे भाव वधारल्याने अनेकांचा नाईलाज होत आहे. बैलांच्या किंमतीत तीन ते सात हजारापर्यंत वाढ झाल्याचे दिसून येते. त्यातही नामवंत जातीचे बैल मिळणे कठीण झाले आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर असताना शेतमालाचे भाव गडगडले आहे. दुसरीकडे पशुखाद्याचे दर दुपटीने वाढले आहे. खते, किटकनाशके आणि बियाण्यांचे दरही वाढत आहे. यंत्राने मशागत करावी लागत असल्याने त्यासाठीही रोख रक्कम मोजावी लागते. पैशासाठी शेतकरी बँकाच्या दारात उभा आहे. अशा स्थितीत बाजारात बैलांचे दर वधारल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.व्यापाऱ्यांच्या दुष्टचक्रात फटकादेव्हाडा बैलबाजारात व्यापाऱ्यांकडून शेतकºयांची लूट दिसत आहे. सध्या शेतकरी बैल खरेदीसाठी बाजारात येत असल्याने व्यापाऱ्यांनी जनावरांचे भाव वाढविले आहे. शेतकरी आपले जनावरे विकण्यासाठी बाजारात नेतो तेव्हा भाव पडलेले असतात आणि खरेदीसाठी जातात तेव्हा भाव वधारलेले दिसतात. व्यापाऱ्यांच्या या खेळीने शेतकरी अडचणीत येत आहेत.

टॅग्स :Marketबाजार