शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

खरीप पीक कर्ज परतफेडीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:01 IST

कोविड - १९ च्या प्रादूर्भावाने घोषीत झालेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रासह निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेने काढलेल्या परिपत्रकानुसार भंडारा जिल्हा सहकारी बँकेने परतफेडीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु नुकत्याच प्राप्त झालेल्या नाबार्डच्या परतफेडीनुसार या परतफेडीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हा बँकेची माहिती । लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशास्थितीत त्यांचे आर्थिक व्यवहारही ठप्प झाले होते. आता त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी गत हंगामात घेतलेल्या संस्था अथवा बँकांमार्फत पीक कर्जाची परतफेड करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट झाली असून ही मुदत पूर्वी ३१ मे होती. वाढीव मुदतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.कोविड - १९ च्या प्रादूर्भावाने घोषीत झालेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रासह निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेने काढलेल्या परिपत्रकानुसार भंडारा जिल्हा सहकारी बँकेने परतफेडीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु नुकत्याच प्राप्त झालेल्या नाबार्डच्या परतफेडीनुसार या परतफेडीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली. शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेल्या तीन लाखापर्यंतच्या पीक कर्जावरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी तसेच १ लाखापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी उपलब्ध होण्यासाठी २००६ पासून राज्य शासन बँकांना पीक कर्जावर व्याज परतावा देत आहे. राज्य शासनाच्या या योजनेमुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांचे अल्पमुदतीचे पीक कर्ज सात टक्के व्याजदराने उपलब्ध करून द्यावयाचे आहे. त्यासाठी केंद्र शासन बँकांना २ टक्के व्याज परतावा उपलब्ध करून देत आहे.केंद्र शासनाच्या योजनेच्या धरतीवर बँकांनी तीन लाखापर्यंतचे अल्पमुदती पीक कर्ज राज्यातील शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिल्यास राज्य शासन बँकांना एक टक्का दराने व्या परतावा देत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या व्याज परतावा योजनेनुसार शेतकऱ्यांनी बँकाकडून उचल केलेल्या अल्पमुदती पीक कर्जाची परतफेड केल्यास विहित केलेल्या व्याज दराने परतावा केल्याचे सांगण्यात आले. रिझर्व्ह बँकेने २७ मार्चच्या परिपत्रकाद्वारे १ मार्च ते ३१ मे या कालावधीत परतफेडीस पात्र असणारी कर्जे पुढील तीन महिन्यांसाठी अधिस्थगित केली आहे. शेतकऱ्यांना दंड बसू नये म्हणून अधिस्थगित कालावधीसाठी पीक कर्जास परतावा अनुज्ञेय केलेला आहे. पीक कर्ज परतफेडीची मुदतवाढ झाल्याने आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.पीक कर्ज परतफेडीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकरी सभासदांनी त्यांच्याकडील पीक कर्जाची परतफेड अद्याप केली नाही त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.-सुनील फुंडे, अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज