शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

खरीप पीक कर्ज परतफेडीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:01 IST

कोविड - १९ च्या प्रादूर्भावाने घोषीत झालेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रासह निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेने काढलेल्या परिपत्रकानुसार भंडारा जिल्हा सहकारी बँकेने परतफेडीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु नुकत्याच प्राप्त झालेल्या नाबार्डच्या परतफेडीनुसार या परतफेडीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हा बँकेची माहिती । लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशास्थितीत त्यांचे आर्थिक व्यवहारही ठप्प झाले होते. आता त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण व्हावे यासाठी शेतकऱ्यांनी गत हंगामात घेतलेल्या संस्था अथवा बँकांमार्फत पीक कर्जाची परतफेड करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट झाली असून ही मुदत पूर्वी ३१ मे होती. वाढीव मुदतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.कोविड - १९ च्या प्रादूर्भावाने घोषीत झालेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रासह निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व बँकेने काढलेल्या परिपत्रकानुसार भंडारा जिल्हा सहकारी बँकेने परतफेडीला ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु नुकत्याच प्राप्त झालेल्या नाबार्डच्या परतफेडीनुसार या परतफेडीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली. शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेल्या तीन लाखापर्यंतच्या पीक कर्जावरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी तसेच १ लाखापर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी उपलब्ध होण्यासाठी २००६ पासून राज्य शासन बँकांना पीक कर्जावर व्याज परतावा देत आहे. राज्य शासनाच्या या योजनेमुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांचे अल्पमुदतीचे पीक कर्ज सात टक्के व्याजदराने उपलब्ध करून द्यावयाचे आहे. त्यासाठी केंद्र शासन बँकांना २ टक्के व्याज परतावा उपलब्ध करून देत आहे.केंद्र शासनाच्या योजनेच्या धरतीवर बँकांनी तीन लाखापर्यंतचे अल्पमुदती पीक कर्ज राज्यातील शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने उपलब्ध करून दिल्यास राज्य शासन बँकांना एक टक्का दराने व्या परतावा देत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या व्याज परतावा योजनेनुसार शेतकऱ्यांनी बँकाकडून उचल केलेल्या अल्पमुदती पीक कर्जाची परतफेड केल्यास विहित केलेल्या व्याज दराने परतावा केल्याचे सांगण्यात आले. रिझर्व्ह बँकेने २७ मार्चच्या परिपत्रकाद्वारे १ मार्च ते ३१ मे या कालावधीत परतफेडीस पात्र असणारी कर्जे पुढील तीन महिन्यांसाठी अधिस्थगित केली आहे. शेतकऱ्यांना दंड बसू नये म्हणून अधिस्थगित कालावधीसाठी पीक कर्जास परतावा अनुज्ञेय केलेला आहे. पीक कर्ज परतफेडीची मुदतवाढ झाल्याने आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.पीक कर्ज परतफेडीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. जिल्ह्यातील ज्या शेतकरी सभासदांनी त्यांच्याकडील पीक कर्जाची परतफेड अद्याप केली नाही त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.-सुनील फुंडे, अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज