शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

जिल्ह्याची खरीप पीक अंतिम पैसेवारी ६५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:56 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका भात शेतीला बसल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्याची अंतिम पैसेवारी मात्र ६५ टक्के घोषित झाली आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या या पैसेवारीत जिल्ह्यातील केवळ १२९ गावेच ५० पैशाच्या आंत आहे. तर ५० च्यावर पैसेवारी असलेल्या ७१६ गावांना दुष्काळी मदतीचा कोणातही लाभ होणार नाही. या अंतीम पैसेवारीने शेतकऱ्यांचा जखमेवर एक प्रकारे मिठच चोळले आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम : ८४५ पैकी केवळ १२९ गावे ५० पैशाच्या आंत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका भात शेतीला बसल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्याची अंतिम पैसेवारी मात्र ६५ टक्के घोषित झाली आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या या पैसेवारीत जिल्ह्यातील केवळ १२९ गावेच ५० पैशाच्या आंत आहे. तर ५० च्यावर पैसेवारी असलेल्या ७१६ गावांना दुष्काळी मदतीचा कोणातही लाभ होणार नाही. या अंतीम पैसेवारीने शेतकऱ्यांचा जखमेवर एक प्रकारे मिठच चोळले आहे.भंडारा हा जिल्हा प्रमुख धान उत्पादक आहे. धान पिकासाठी पावसाची मोठ्या प्रमाणात गरज असते. पंरतु यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. याचा फटका धान पिकाला बसला. अनेक शेतकºयांचे उत्पन्न घटले. दुष्काळ घोषित करावा अशी मागणी होवू लागली होती. सुरुवातीला जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळसदुश्य म्हणून घोषित झाले होते. मात्र अंतिम यादीत जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नव्हता. त्यामुळे सर्व शेतकºयांचे लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले होते.नागपूर विभागाची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबररोजी जाहिर करण्यात आली. त्यात भंडारा जिल्ह्यात खरीप हंगाम २०१८ च्या ८४५ गावांची अंतिम पैसेवारी प्रसिध्द करण्यात आली. जिल्ह्यात खरीपाची ८९८ गावे आहेत. त्यापैकी ३९ गावे पीक नसलेली आहेत. त्यामुळे ८८५ गावांची पैसेवारी घोषित करण्यात आली आहे. १४ रबी गावांची पैसेवारी रबी हंगामानंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. भंडारा तालुक्याची अंतिम पैसेवारी ६५, पवनी ६४, तुमसर ६५, मोहाडी ४९, साकोली ७२, लाखांदूर ७०, लाखनी ७३ अशी आहेत. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६५ टक्के घोषित करण्यात आली आहे.राज्यशासनाने दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुके व २६८ महसुली मंडळाव्यतिरिक्त उर्वरित क्षेत्रातील ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची विहित प्रपत्रातील माहिती सादर करण्यात आली आहे. त्यात भंडारा जिल्ह्यात ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेली १२९ गावे आहेत. भंडारा तालुक्यात ४८, मोहाडी ८१ गावांचा समावेश आहे. तर पवनी, तुमसर, साकोली, लाखांदूर, लाखनी या तालुक्यातील एकही गाव ५० पैशापेक्षा कमी पैसेवारीत आले नाही.या अंतिम आणेवारीने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. ५० पेक्षा कमी पैसेवारी घोषीत झाल्यास शासनाच्या दुष्काळी मदतीचा लाभ मिळू शकतो. जिल्ह्यात दुष्काळ सदुश्य परिस्थती असतांना आणेवारी ६५ निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.५० पैशापेक्षा ७१६ गावांची पैसेवारी अधिकमहसुल विभागाने घोषित केलेल्या अंतिम पैसेवारीत जिल्ह्यातील ७१६ गावांची पैसेवारी ५० पैक्षा अधिक आहे. त्यात भंडारा तालुका १२०, पवनी १४१, तुमसर १४३, मोहाडी २७, साकोली ९४, लाखांदूर ८९ आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांचा समावेश आहे.