शहरं
Join us  
Trending Stories
1
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
2
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
3
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
4
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
5
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
6
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
7
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
8
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
9
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
10
Post Office Investment Scheme: दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
11
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
12
Scorpio Yearly Horoscope 2026: वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
13
Nashik Municipal Corporation Election : मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
14
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
15
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
16
Libra Yearly Horoscope 2026: तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
17
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
18
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
19
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
20
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची खरीप पीक अंतिम पैसेवारी ६५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:56 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका भात शेतीला बसल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्याची अंतिम पैसेवारी मात्र ६५ टक्के घोषित झाली आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या या पैसेवारीत जिल्ह्यातील केवळ १२९ गावेच ५० पैशाच्या आंत आहे. तर ५० च्यावर पैसेवारी असलेल्या ७१६ गावांना दुष्काळी मदतीचा कोणातही लाभ होणार नाही. या अंतीम पैसेवारीने शेतकऱ्यांचा जखमेवर एक प्रकारे मिठच चोळले आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम : ८४५ पैकी केवळ १२९ गावे ५० पैशाच्या आंत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका भात शेतीला बसल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्याची अंतिम पैसेवारी मात्र ६५ टक्के घोषित झाली आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या या पैसेवारीत जिल्ह्यातील केवळ १२९ गावेच ५० पैशाच्या आंत आहे. तर ५० च्यावर पैसेवारी असलेल्या ७१६ गावांना दुष्काळी मदतीचा कोणातही लाभ होणार नाही. या अंतीम पैसेवारीने शेतकऱ्यांचा जखमेवर एक प्रकारे मिठच चोळले आहे.भंडारा हा जिल्हा प्रमुख धान उत्पादक आहे. धान पिकासाठी पावसाची मोठ्या प्रमाणात गरज असते. पंरतु यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. याचा फटका धान पिकाला बसला. अनेक शेतकºयांचे उत्पन्न घटले. दुष्काळ घोषित करावा अशी मागणी होवू लागली होती. सुरुवातीला जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळसदुश्य म्हणून घोषित झाले होते. मात्र अंतिम यादीत जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नव्हता. त्यामुळे सर्व शेतकºयांचे लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले होते.नागपूर विभागाची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबररोजी जाहिर करण्यात आली. त्यात भंडारा जिल्ह्यात खरीप हंगाम २०१८ च्या ८४५ गावांची अंतिम पैसेवारी प्रसिध्द करण्यात आली. जिल्ह्यात खरीपाची ८९८ गावे आहेत. त्यापैकी ३९ गावे पीक नसलेली आहेत. त्यामुळे ८८५ गावांची पैसेवारी घोषित करण्यात आली आहे. १४ रबी गावांची पैसेवारी रबी हंगामानंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. भंडारा तालुक्याची अंतिम पैसेवारी ६५, पवनी ६४, तुमसर ६५, मोहाडी ४९, साकोली ७२, लाखांदूर ७०, लाखनी ७३ अशी आहेत. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६५ टक्के घोषित करण्यात आली आहे.राज्यशासनाने दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुके व २६८ महसुली मंडळाव्यतिरिक्त उर्वरित क्षेत्रातील ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची विहित प्रपत्रातील माहिती सादर करण्यात आली आहे. त्यात भंडारा जिल्ह्यात ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेली १२९ गावे आहेत. भंडारा तालुक्यात ४८, मोहाडी ८१ गावांचा समावेश आहे. तर पवनी, तुमसर, साकोली, लाखांदूर, लाखनी या तालुक्यातील एकही गाव ५० पैशापेक्षा कमी पैसेवारीत आले नाही.या अंतिम आणेवारीने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. ५० पेक्षा कमी पैसेवारी घोषीत झाल्यास शासनाच्या दुष्काळी मदतीचा लाभ मिळू शकतो. जिल्ह्यात दुष्काळ सदुश्य परिस्थती असतांना आणेवारी ६५ निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.५० पैशापेक्षा ७१६ गावांची पैसेवारी अधिकमहसुल विभागाने घोषित केलेल्या अंतिम पैसेवारीत जिल्ह्यातील ७१६ गावांची पैसेवारी ५० पैक्षा अधिक आहे. त्यात भंडारा तालुका १२०, पवनी १४१, तुमसर १४३, मोहाडी २७, साकोली ९४, लाखांदूर ८९ आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांचा समावेश आहे.