शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याची खरीप पीक अंतिम पैसेवारी ६५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:56 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका भात शेतीला बसल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्याची अंतिम पैसेवारी मात्र ६५ टक्के घोषित झाली आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या या पैसेवारीत जिल्ह्यातील केवळ १२९ गावेच ५० पैशाच्या आंत आहे. तर ५० च्यावर पैसेवारी असलेल्या ७१६ गावांना दुष्काळी मदतीचा कोणातही लाभ होणार नाही. या अंतीम पैसेवारीने शेतकऱ्यांचा जखमेवर एक प्रकारे मिठच चोळले आहे.

ठळक मुद्देखरीप हंगाम : ८४५ पैकी केवळ १२९ गावे ५० पैशाच्या आंत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका भात शेतीला बसल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्ह्याची अंतिम पैसेवारी मात्र ६५ टक्के घोषित झाली आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या या पैसेवारीत जिल्ह्यातील केवळ १२९ गावेच ५० पैशाच्या आंत आहे. तर ५० च्यावर पैसेवारी असलेल्या ७१६ गावांना दुष्काळी मदतीचा कोणातही लाभ होणार नाही. या अंतीम पैसेवारीने शेतकऱ्यांचा जखमेवर एक प्रकारे मिठच चोळले आहे.भंडारा हा जिल्हा प्रमुख धान उत्पादक आहे. धान पिकासाठी पावसाची मोठ्या प्रमाणात गरज असते. पंरतु यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. याचा फटका धान पिकाला बसला. अनेक शेतकºयांचे उत्पन्न घटले. दुष्काळ घोषित करावा अशी मागणी होवू लागली होती. सुरुवातीला जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळसदुश्य म्हणून घोषित झाले होते. मात्र अंतिम यादीत जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नव्हता. त्यामुळे सर्व शेतकºयांचे लक्ष अंतिम पैसेवारीकडे लागले होते.नागपूर विभागाची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबररोजी जाहिर करण्यात आली. त्यात भंडारा जिल्ह्यात खरीप हंगाम २०१८ च्या ८४५ गावांची अंतिम पैसेवारी प्रसिध्द करण्यात आली. जिल्ह्यात खरीपाची ८९८ गावे आहेत. त्यापैकी ३९ गावे पीक नसलेली आहेत. त्यामुळे ८८५ गावांची पैसेवारी घोषित करण्यात आली आहे. १४ रबी गावांची पैसेवारी रबी हंगामानंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. भंडारा तालुक्याची अंतिम पैसेवारी ६५, पवनी ६४, तुमसर ६५, मोहाडी ४९, साकोली ७२, लाखांदूर ७०, लाखनी ७३ अशी आहेत. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६५ टक्के घोषित करण्यात आली आहे.राज्यशासनाने दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुके व २६८ महसुली मंडळाव्यतिरिक्त उर्वरित क्षेत्रातील ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची विहित प्रपत्रातील माहिती सादर करण्यात आली आहे. त्यात भंडारा जिल्ह्यात ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेली १२९ गावे आहेत. भंडारा तालुक्यात ४८, मोहाडी ८१ गावांचा समावेश आहे. तर पवनी, तुमसर, साकोली, लाखांदूर, लाखनी या तालुक्यातील एकही गाव ५० पैशापेक्षा कमी पैसेवारीत आले नाही.या अंतिम आणेवारीने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. ५० पेक्षा कमी पैसेवारी घोषीत झाल्यास शासनाच्या दुष्काळी मदतीचा लाभ मिळू शकतो. जिल्ह्यात दुष्काळ सदुश्य परिस्थती असतांना आणेवारी ६५ निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.५० पैशापेक्षा ७१६ गावांची पैसेवारी अधिकमहसुल विभागाने घोषित केलेल्या अंतिम पैसेवारीत जिल्ह्यातील ७१६ गावांची पैसेवारी ५० पैक्षा अधिक आहे. त्यात भंडारा तालुका १२०, पवनी १४१, तुमसर १४३, मोहाडी २७, साकोली ९४, लाखांदूर ८९ आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांचा समावेश आहे.