शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

खापरी गावाचे पुनर्वसन थंडबस्त्यात

By admin | Updated: April 6, 2016 00:26 IST

पूर्व विदर्भात हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणारे राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गोसेखुर्दचे नाव देशाच्या राजधारीपर्यंत पोहचले.

अशोक पारधी पवनी पूर्व विदर्भात हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणारे राष्ट्रीय प्रकल्प म्हणून गोसेखुर्दचे नाव देशाच्या राजधारीपर्यंत पोहचले. परंतू त्या प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या नागरिकांच्या समस्या गेल्या २७ वर्षात जैसेच आहेत. पुनर्वसन झालेल्या नागरिकांच्या समस्या काही प्रमाणात सुटलेल्या असल्या तरी ज्या गावाचे पुनर्वसन अद्यापही व्हायचे आहे तेथील नागरिक त्रस्त आहेत. खापरी (रेहपाडे) गावासाठी गावठाण निश्चित व्हायचे असल्याने गावाचे पुनर्वसन थंडबस्त्यात आहे.गोसेखुर्द प्रकल्पात पाणी साठविणे सुरु झाले तेव्हापासून खापरी (रेह) गावालगतच्या शेतात पाणी शिरले आहे. एका बाजूला गोसे प्रकल्पाचे पाणी व दुसऱ्या बाजूला उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातील हिंस्त्र प्राण्याचा त्रास यामुळे खापरीकरांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. अधिकारी वर्गाकडून पुनर्वसनाचे आश्वासन तेवढे वारंवार मिळत आहे. कारवाई मात्र शुन्य आहे. ग्रामस्थांना त्यांच्याच गावात जायला अभयारण्याच्या प्रवेशद्वार एंट्री केल्याशिवाय जाता येत नाही हे केवढे दुर्भाग्य.खापरी रेह गावासाठी सुरुवातीला वाही-गराडापार गावाजवळ अधिग्रहीत करण्याचे ठरले होते. जाहीरनामेदेखील प्रसिध्द झाले परंतु ते ठिकाण नंतर रद्द करण्यात आले. त्यानंतर खापरी रोडवर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ जागेची पाहणी करुन गावठाणकरिता जागा निश्चित झाली पंरतु अभ्रकाचे खाणीसाठी जागा राखीव असल्याने प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले व ती जागासुध्दा मिळू शकली नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. अलीकडे बेटाळा गावाजवळ जागेची पाहणी करण्यात आली परंतु दोन-तीन शेतकऱ्यांनी जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे खापरी (रेह) गावासाठी आवश्यक तेवढी जागा त्याठिकाणी उपलब्ध नाही या कारणास्तव बेटाळा शेतशिवारातील जमीन अधिग्रहीत करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे व पुनर्वसनात येण्याऱ्या अडथळ्यामुळे नागरिकांत पाहिजे त्यांना भुखंड व उर्वरितांना रोख रक्कम देण्यात यावी, असे सूर उमटू लागले आहेत. याचा आधार घेऊन गोसेखुर्द पुनर्वसन उपविभाग क्र. ९ वाहीचे सहाय्यक अभियंता यांनी सरपंच खापरी (रेह) यांना पत्र देऊन गावकरी स्वेच्छा पुनर्वसनास संमती देण्याकरिता ग्रामसभेत ठराव घेण्याबाबत असे सुचित केले. यावरुन गावात दोन मतप्रवाह निर्माण होऊन शेवटी त्यात राजकारण आले. पुनर्वसन करतांना गावाचे हित तसेच ग्रामस्थांचे हित दोन्ही महत्त्वाचे आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीचा आदर करुन पुनर्वसनाचे धोरण आखण्यात यावे व विलंब न लावता खापरी रेह गावाचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले असून शासनाने याची दखल घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांत आहे.