शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

ताणतणाव नियंत्रणात ठेवा; मधुमेह, उच्च रक्तदाबाचा वाढतोय धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 14:07 IST

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम : मधुमेहाने वयाचे बंधन नाकारले, प्रतिबंध गरजेचा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : बदलती जीवनशैली, नोकरी, व्यवसायात निर्माण होणाऱ्या ताणाचा तसेच व वाढत्या स्पर्धेचा खूप मोठा परिणाम आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली पाहावयास मिळत आहे.

आता कोणत्याही वयाचे आणि वर्गवारीतील लोक मधुमेहाच्या विळख्यात सापडत आहेत. त्यामुळे आगामी वर्षात या रोगाचे प्रमाण अधिक वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. काही वर्षांमध्ये झपाट्याने लोकांच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. त्याचा मोठा परिणाम आरोग्यावर होऊन जिल्ह्यात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात मधुमेह आणि उच्च रक्तदाबावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे.

केवळ नियंत्रण हाच पर्याय• साधारण १५-२० वर्षापूर्वी मधुमेह हा उच्च वर्गापुरताच मर्यादित असणारा आजार होता. त्यामुळे चेष्टेने त्याला श्रीमंतांचा आजारही म्हटले जायचे. पण, आता सर्वच स्तरांतील लोकांची जीवनशैली बिघडली आहे. त्यामुळे आता कोणत्याही आर्थिक वर्गात मधुमेहाचे रुग्ण आढळतात. चोरपावलांनी शरीरात प्रवेश करणाऱ्या या आजाराला नंतर फक्त नियंत्रित ठेवता येते. त्यातून पूर्ण बरे होता येत नाही. म्हणूनच योग्य वेळेत जीवनशैली सुधारून मधुमेह टाळणे हाच पर्याय आहे.

प्रतिबंधाचे कार्य अवघडटाइप वन मधुमेह हा आयुष्यभराचा आणि जीवनशैलीशी निगडित आजार आहे. नियमित देखरेख आणि व्यायाम यांना सुयोग्य आहाराची जोड दिल्यास मधुमेह नियंत्रित होऊ शकतो. मात्र, तसे होताना दिसत नसून मधुमेहग्रस्तांची संख्या वाढत आहे.

मुले, महिला मधुमेहाच्या विळख्यातबदलत्या जीवनशैलीमुळे बालकांमधील वाढता मधुमेह ही मोठी समस्या बनली आहे. वाढते जंकफूडचे प्रमाण आणि खाण्याच्या चुकीच्या वेळा, यामुळे मधुमेह होण्यासाठी पूरक असे वातावरण तयार झाले आहे, चुकीच्या जीवनशैलीमुळे या आजारांना मुलांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, महिलांमधील वाढता ताण हे त्यांच्यातील वाढत्या मधुमेहाचे मुख्य कारण आहे.

नवजात अर्भकांनाही मधुमेहमहिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गर्भवती महिलांद्वारे होणाऱ्या बाळाला जन्मतःच मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. याचापरिणाम म्हणजे नवजात बालकांचे कमी असणारे वजन, जन्माच्या वेळी कमी वजन असणाऱ्या बालकांना जास्त खाणे दिले जाते. त्यामुळे नवजात बालकांमध्ये मधुमेहाचा धोका निर्माण होतो.

ही आहेत मधुमेहाची कारणे• कामाचा अधिक ताण• डबाबंद पदार्थांचा अतिरेकी वापर चुकीचा आहार व अवेळी जेवण• व्यायामाचा अभाव, योग व सकाळी फिरण्याचा अभाव• गोड पदार्थांचे अतिसेवन • व्यसनाधीनता

शारीरिक हालचाल नाही, बैठे काम करणे, जंकफूड जास्त प्रमाणात खाणे, कॉम्प्युटर, मोबाइल जास्त प्रमाणात वापरणे यामुळे मधुमेह वाढत आहे. त्यासाठी लोकांनी राहणीमान बदलणे आवश्यक आहे. तरच मधुमेहाचे प्रमाण कमी होऊ शकते.- डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा. लोकांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे. मनावरील

ताण कमी करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहार व योगासने करणे गरजेचे आहे. कमी झोप घेणे, व्यसनाधीनता, विभक्त कुटुंब पद्धती, वाढता एकटेपणा यामुळे उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत.- डॉ. मिलिंद सोमकुवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.

टॅग्स :diabetesमधुमेहchandrapur-acचंद्रपूर