शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

मूठभर तांदूळ अन् पाण्याची वाटी, अंगणात ठेवा ना माझ्यासाठी

By admin | Updated: March 27, 2017 00:34 IST

घरात चिमणी आली तर ‘इंटेरियर’ची वाट लागेल, असेही काही जण म्हणत आहेत.

भंडारा : घरात चिमणी आली तर ‘इंटेरियर’ची वाट लागेल, असेही काही जण म्हणत आहेत. माझी ओली आळवणी एवढीच आहे, मूठभर तांदूळ अन् वाटीभर पाणी... अंगणात ठेवा ना माझ्यासाठी...’’ चिमण्यांची चिमणी पाखरं लहानसहान किटकांवर वाढतात. हे कीटकही जंतूनाशकांच्या वाढत्या वापरामुळे मरत आहेत. कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने त्यावर जगणाऱ्या चिमण्यांना अन्न मिळेनासे झाले अन् त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे चिमण्यांसह एकूणच पक्ष्यांच्या नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होत आहे. शहरात सुरू असलेली प्रचंड वृक्षतोड, शहरीकरणाचा आंधळा वेग चिमण्यांच्या जीवांवर उठला आहे. खरे तर परिसरात जास्तीतजास्त चिमण्यांचे वास्तव्य असले पाहिजे. काँक्रिटच्या जंगलातील वास्तूरचना चिमण्यांसाठी पोषक नाही. जुन्या वह्यांचे पुठ्ठे काढून त्यापासून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करता येतात. ती शाळेच्या परिसरात अन् अंगणात लावता येतात. घर बांधतानाच घरात चिमण्यांसाठी विशिष्ट जागा शिल्लक ठेवता येते. चिमणी हा मनुष्याच्या आसपास राहणारा पक्षी असल्याने त्यांना घराच्या परिसरातच घरट्यासाठी जागा हवी असते. घरटे बांधण्यासाठी योग्य जागा मिळत नाही म्हणून अनेकदा त्या धोक्याच्या ठिकाणी घरटे तयार करतात. त्यामुळे त्यांची अंडी सुरक्षित राहात नाही. योग्य आहाराविना पिल्लांची वाढ योग्यप्रकारे होत नाही. लहानपणी जेवणाचा कंटाळा केला की, आई हमखास दाणा टाकून चिमण्यांना बोलवायची दारात़ मग त्यांचे कौतुक दाखवत एकेक घास भरायची तोंडात़ बालपणी पहिल्यांदा ही अशी ओळख झाली आपली चिऊताईशी! तेव्हापासून ती मनाच्या चौकटीत कायम बसली आहे घरटे करूऩ संगणकाच्या युगातही तिचे आकर्षण कमी झाले असे अजिबात नाही़ परंतु व्यक्तिगत स्वप्ने नक्कीच मोठी झाली अन् या स्वप्नांच्या उंचीशी स्पर्धा आपल्या लाडक्या चिमण्यांना काही करता आली नाही़ याच उंची स्वप्नांनी पुढे त्यांचे घरटेही हिरावून घेतले़ आता तर त्यांना दोन थेंब पाणीही मिळणे दुरापास्त झाले आहे़; म्हणूनच या चिमण्या आपल्याला साद घालत आहेत़ ऐका जरा ती साद अन् आपल्या बालपणाच्या या सोबत्यांना जगविण्यासाठी मूठभर तांदूळ आणि एक पाण्याने भरलेले भांडे ठेवा आपल्या दारात़चिऊताई म्हणते,‘चिल्यापिल्यांना घास भरवताना मी प्रत्येकच मायबापाच्या मदतीला धावून गेली. आज मला तुमच्या आधाराची गरज आहे. तुम्ही फटाक्यांच्या आवाजाने मला दिवाळीत बधीर केले. संक्रातीला नायलॉनच्या मांजाने माझा गळा कापला. आता आमच्यावर संक्रांत कशाला आणता? मला माहीत आहे. आता इथली जुनी घरे जात आहेत. सिमेंटचे चकाचक जंगल उभे राहात आहे. (शहर प्रतिनिधी)पक्ष्यांचा कलकलाट झाला दुर्लभजगण्याचा अधिकार फक्त मानवालाच नसून अन्य जीवीतांनाही आहे हे आजघडीला मानव विसरून गेला आहे. त्यामुळेच आपल्या सोयीसाठी दुसऱ्याचा जीव घेण्यास तो मागेपुढे बघत नाही. हेच कारण आहे की आपल्या सोयीसाठी मानवाकडून निसर्गाचा ऱ्हास केला जात असून त्याचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर जाणवत आहे. यात मोठ्या प्राण्यांचे तर ठिक आहे, मात्र इवलीशी चिऊताई बिचारी आपला जीव गमावत आहे. परिणामी चिमणी व अन्य पक्ष्यांचीही संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. हेच कारण आहे की, पक्ष्यांचा किलकिलाट व चिमण्यांची चिवचिव आज कानी पडत असून त्यांचे दर्शनही दुर्लभच झाले आहे. नेमकी हिच बाब हेरून चिऊताईच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.