शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

ध्येय ठेवा, यश नक्की मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:00 IST

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत यश संपादन करावयाचे असेल तर ध्येय समोर ठेवून परिश्रम घेतल्यास नक्कीच यश मिळते. शाळेचे प्रसन्न वातावरण महत्त्वाचा भाग आहे. जि.प. शाळा ही ग्रामस्थांची आहे.

ठळक मुद्देशंकर राठोड : गुंथारा येथे तालुकास्तरीय एसएमसी सदस्यांचा सक्षमीकरण मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत यश संपादन करावयाचे असेल तर ध्येय समोर ठेवून परिश्रम घेतल्यास नक्कीच यश मिळते. शाळेचे प्रसन्न वातावरण महत्त्वाचा भाग आहे. जि.प. शाळा ही ग्रामस्थांची आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे, नवनवीन योजना उपक्रमाकरिता शिक्षक पालक तसेच गावकऱ्यांचा योग्य सहकार्य घ्यावे. शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी हे विद्यार्थी व शिक्षक यातील महत्वाचा दुवा आहे, असे प्रतिपादन भंडारा पंचायत समितीचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड यांनी केले.जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्था भंडारा व पंचयत समिती भंडाराच्या वतीने धारगाव केंद्रांतर्गत येणाºया जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल गुंथारा येथे तालुकास्तरीय एसएमसी सदस्यांचे सक्षमीकरण मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.उद्घाटन पंचायत समिती सदस्य टेकराम पडोळे यांनी केले व अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य निलकंठ कायते होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सभापती पवन कोरामे, उपसभापती वर्षा साकुरे, सरपंच शुभांगी सार्वे, उपसरपंच दिलीप कायते, सेवानिवृत्त प्राचार्य परसराम सार्वे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, शिक्षण विस्तार अधिकारी शंकर राठोड, केंद्रप्रमुख राजश्री शिंदे, एस.एस. घुग्गुसकर, प्रदीप काटेखाये, साठवणे, प्राचार्य प्रदीप मुटकुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू सयाम, उपाध्यक्ष जितेंद्र मुटकुरे, पंचायत समितीचे माजी सदस्य श्याम सार्वे, गोवर्धन साकुरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आय.बी. तरारे, मुख्याध्यापक बी.एम. गायधने, माजी. जि.प. सभापती संजय गाढवे, सुकराम पडोळे आदी उपस्थित होते.