शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

स्पर्धा परीक्षेसाठी ‘आॅप्शन’ न ठेवता ध्येय ठेवा

By admin | Updated: July 12, 2017 00:25 IST

अनेक क्षेत्रातील अस्थिरतेमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून स्पर्धा परीक्षा देण्याची मानसिकता तयार करण्याबरोबरच कुठलाही दुसरा आॅप्शन न ठेवता...

देवा जाधवर : युनिक अकॅडमीतर्फे व्याख्यानलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनेक क्षेत्रातील अस्थिरतेमुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून स्पर्धा परीक्षा देण्याची मानसिकता तयार करण्याबरोबरच कुठलाही दुसरा आॅप्शन न ठेवता एकच ध्येय ठेवून स्पर्धा परीक्षेला सामोरे गेल्यास यश निश्चित आहे, असे प्रतिपादन देवा जाधवर यांनी व्यक्त केले.नियोजन व मेहनत यासोबतच अभ्यासाचं स्वत:चं वेळापत्रक तयार करुन अभ्यासात सातत्य व स्वत:वरचा विश्वास कायम ठेवण्याचे मोलाचे मार्गदर्शन युनिक अ‍ॅकाडमीचे प्राध्यापक देवा जाधवर यांनी विद्यार्थ्यांना केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका मार्गदर्शन केंद्रात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी. पी., उपायुक्त जात पडताळणी भंडारा सिध्दार्थ गायकवाड, उपायुक्त जात पडताळणी गोंदिया देवसुदन धारगावे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते व सहाय्यक आयुक्त मंगेश वानखेडे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सिरीज सुरु करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पूणे येथील युनिक अ‍ॅकाडमीचे प्रा. देवा जाधवर यांचे चालू घडामोडी या विषयावर मार्गदर्शन ठेवण्यात आले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील अभ्यासिका समृध्द असून या अभ्यासिकेचा पूरेपूर लाभ घ्यावा. या ठिकाणी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना युनिक अ‍ॅकाडमीतर्फे टेस्ट सिरीज व व्याख्यान मोफत देण्याची घोषणा त्यांनी केली. त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तके ५० टक्के सवलतीच्या दरात देण्यात येतील, असे जाधवर यांनी घोषित केले.स्पर्धा परीक्षा हे यश किंवा अपयश याचे साध्य नसून ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण उन्नतीची प्रक्रीया आहे. सतत स्टडीमोडमध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे. नोकरीचा आॅप्शन म्हणून स्पर्धा परीक्षेकडे न वळण्याचा सल्ला देतांनाच विषयाचे सखोल विश्लेषण व संदर्भ साहित्यांचा पूरेपूर वापर हा स्पर्धा परीक्षेचा सक्सेस मंत्र असल्याचे प्रा. जाधवर यांनी सांगितले. केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाचा अभ्यासक्रम पूर्वी सारखा राहिला नसून त्यात मोठया प्रमाणात बदल झाला आहे. पाठांतराचे दिवस गेले असून आता व्यवहारीक ज्ञान व संदर्भ साहित्यावरील प्रश्न मोठया प्रमाणात समाविष्ठ केले जातात, असे त्यांनी सांगितले. केवळ तात्पूरते नियोजन करुन चालणार नाही तर वर्षभराचे नियोजन असणे गरजेचे आहे. आपण काय वाचतो याचे रिव्हीजन तितकेचे महत्वाचे आहे.