शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिक्षणासाठी चिमुकल्या बालकांची केविलवाणी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:51 IST

सिहोरा परिसरातील गुढरी ग्राम पंचायतीला संलग्नीत असणाऱ्या खैरटोला गावातील चिमुकल्या बालकांची शिक्षणासाठी करण्यात येणारी धडपड वेदनादायक आहे. निरागस बालके जंगलाचे वाटेने पायदळ प्रवास करीत आहेत. गावात शाळा आणि अंगणवाडी नसल्याने या बालकांचे जीव वेशीवर टांगले जात आहे.

ठळक मुद्देरोज ५ कि.मी.चा पायी प्रवास : शाळा अन् अंगणवाडीही नाही, खैरटोला येथील प्रकार

रंजित चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील गुढरी ग्राम पंचायतीला संलग्नीत असणाऱ्या खैरटोला गावातील चिमुकल्या बालकांची शिक्षणासाठी करण्यात येणारी धडपड वेदनादायक आहे. निरागस बालके जंगलाचे वाटेने पायदळ प्रवास करीत आहेत. गावात शाळा आणि अंगणवाडी नसल्याने या बालकांचे जीव वेशीवर टांगले जात आहे.सातपुडा पर्वत रांगाचे घनदाट जंगलात गुडरी ग्रामपंचायत आहे.या ग्रामपंचायतीला १५ ते २० घरांची वस्ती असणारा खैरटोला गाव संलग्नीत करण्यात आलेला आहे. चांदपूर जलाशयाचे शेजारी असणाºया या गावात रोजगाराचा अभाव आहे. जलाशयातील मासेमारीवर या वस्तीत राहणारे लोकांचे उदरनिर्वाह आहे. गावात विकासाचे जाळे निर्माण करण्याचे प्रयत्न ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले असले तरी शिक्षणाची दालने या गावात निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद पर्यंत प्रत्यत्न झाले नाहीत.या गावात शाळा नाही. साधे मिनी अंगणवाडी नाही. वस्ती शाळा निर्मितीचे नियोजन शासनाचे असले तरी या गावात वस्तीशाळा मंजुरीकरिता साधे फाईल तयार करण्यात आली नाही. या गावात असणारे निरागस चिमुकले बालके खांद्यावर पुस्तकाचे ओझे घेवून घनदाड जंगलातून ५ कि.मी. अंतरावर असणारे खंदाड गावातील जिल्हा परिषदेची शाळा गाठत आहेत. इयत्ता १ ते ४ थी पर्यंत त्यांची वय तशी कमीच आहे. या वयात शिक्षणासाठी त्यांचा पायदळ प्रवास मनाला वेदना देणारे आहे. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूत या बालकांची धडपड बघून जंगलाचे वाटेने जाणाºयांचे मन शुब्ध करीत आहे.जंगलात हिंसक आणि वन्य प्राण्यांचे बस्तान आहे. या वन्य प्राण्यांची भीती त्याचे मनात असली तरी शिक्षणाची जिद्द बघून भीती ही लांबच आहे. या मार्गाने जाणारे मोटर सायकलधारक बालकांना बसण्याचे सांगतात .परंतु या बालकांचे नाकारणे असती. ते कधी कुणाचे वाहनावरून खंदाड गावचे शाळेपर्यंत प्रवास करीत नाही. अलीकडे बालके सुरक्षीत नाहीत.खैरटोला ते खंदाड गावाचे अंतर अडीच कि.मी. चे आहे. परंतु या बालकांचा पायदळ प्रवास ५ कि.मी. अंतरचा आहे. या गावाचे मार्गावरील रापनिची बस फेरी आहे. या बस फेरीचा फायदा या बालकांना होत नाही. पायदळ प्रवास करून शिक्षणासाठी केवीलवाणी धडपडणारे इयत्ता १ ते ४ पर्यंतचे चिमुकले बालक वातावरणाने असुरक्षित आहेत. या गावात अंगणवाडी नाही. यामुळे बालकांना शासनाचे सुविधा प्राप्त होत नाही.गर्भवती मातांना आहाराचे वाटप प्रभावित होत आहेत. राज्य शासन अशा गावात वस्तीशाळा आणि मिनी अंगणवाडी ना मंजुरी देत आहे. परंतु या गावात दोन्ही सुविधा नाही. लोकप्रतिनिधी या गावात क्वचित हजेरी लावत आहेत. गावात सिमेंट रस्ते आणि पिण्याचे पाणी या सुविध निकाली काढण्यात आलेल्या आहे. परंतु शिक्षणाचे सोयी व बालकांचे सुरक्षेकरिता साधे यंत्रणेमार्फत प्रयत्न करण्यात आले नाही.उच्च शिक्षणाकरिता या गावातील मुले सिहोरा गावात धाव घेत आहेत. त्याचे प्रवास रापनिचे बस ने होत आहे. त्याचे वय १२ वर्गाचे पुढे आहे. परंतु पायदळ प्रवास करणारी बालके या वयाचे आतील आहेत. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर समस्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.या गावात असणारी बालकांची शिक्षणासाठी धडपड मन हेलावणारी आहे. शाळा, ग्रामपंचायत व शिक्षण विभाग यांचेत समन्वय साधून बालकांच्या सुरक्षेसंदर्भात प्रयत्न करणार आहे.-धनेंद्र तुरकर, सभापती जि.प. भंडारा.या गावात अंगणवाडी नाही. अन्य गावांना गाव संलग्नीत असले तरी निकषानुसार मिनी अंगणवाडी मंजुरीसाठी प्रयत्न करणार आहे.-रेखा ठाकरे, सभापती महिला व बाल कल्याण विभाग भंडाराबालकांना ने आण करण्याची जबाबदारी शाळा समिती व ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून झाली पाहिजे. अशा एका वाहनाची सोय करण्याची गरज आहे.-गुड्डू शामकुवर, सामाजिक कार्यकर्ता चुल्हाड.