शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शिक्षणासाठी चिमुकल्या बालकांची केविलवाणी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:51 IST

सिहोरा परिसरातील गुढरी ग्राम पंचायतीला संलग्नीत असणाऱ्या खैरटोला गावातील चिमुकल्या बालकांची शिक्षणासाठी करण्यात येणारी धडपड वेदनादायक आहे. निरागस बालके जंगलाचे वाटेने पायदळ प्रवास करीत आहेत. गावात शाळा आणि अंगणवाडी नसल्याने या बालकांचे जीव वेशीवर टांगले जात आहे.

ठळक मुद्देरोज ५ कि.मी.चा पायी प्रवास : शाळा अन् अंगणवाडीही नाही, खैरटोला येथील प्रकार

रंजित चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील गुढरी ग्राम पंचायतीला संलग्नीत असणाऱ्या खैरटोला गावातील चिमुकल्या बालकांची शिक्षणासाठी करण्यात येणारी धडपड वेदनादायक आहे. निरागस बालके जंगलाचे वाटेने पायदळ प्रवास करीत आहेत. गावात शाळा आणि अंगणवाडी नसल्याने या बालकांचे जीव वेशीवर टांगले जात आहे.सातपुडा पर्वत रांगाचे घनदाट जंगलात गुडरी ग्रामपंचायत आहे.या ग्रामपंचायतीला १५ ते २० घरांची वस्ती असणारा खैरटोला गाव संलग्नीत करण्यात आलेला आहे. चांदपूर जलाशयाचे शेजारी असणाºया या गावात रोजगाराचा अभाव आहे. जलाशयातील मासेमारीवर या वस्तीत राहणारे लोकांचे उदरनिर्वाह आहे. गावात विकासाचे जाळे निर्माण करण्याचे प्रयत्न ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले असले तरी शिक्षणाची दालने या गावात निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद पर्यंत प्रत्यत्न झाले नाहीत.या गावात शाळा नाही. साधे मिनी अंगणवाडी नाही. वस्ती शाळा निर्मितीचे नियोजन शासनाचे असले तरी या गावात वस्तीशाळा मंजुरीकरिता साधे फाईल तयार करण्यात आली नाही. या गावात असणारे निरागस चिमुकले बालके खांद्यावर पुस्तकाचे ओझे घेवून घनदाड जंगलातून ५ कि.मी. अंतरावर असणारे खंदाड गावातील जिल्हा परिषदेची शाळा गाठत आहेत. इयत्ता १ ते ४ थी पर्यंत त्यांची वय तशी कमीच आहे. या वयात शिक्षणासाठी त्यांचा पायदळ प्रवास मनाला वेदना देणारे आहे. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूत या बालकांची धडपड बघून जंगलाचे वाटेने जाणाºयांचे मन शुब्ध करीत आहे.जंगलात हिंसक आणि वन्य प्राण्यांचे बस्तान आहे. या वन्य प्राण्यांची भीती त्याचे मनात असली तरी शिक्षणाची जिद्द बघून भीती ही लांबच आहे. या मार्गाने जाणारे मोटर सायकलधारक बालकांना बसण्याचे सांगतात .परंतु या बालकांचे नाकारणे असती. ते कधी कुणाचे वाहनावरून खंदाड गावचे शाळेपर्यंत प्रवास करीत नाही. अलीकडे बालके सुरक्षीत नाहीत.खैरटोला ते खंदाड गावाचे अंतर अडीच कि.मी. चे आहे. परंतु या बालकांचा पायदळ प्रवास ५ कि.मी. अंतरचा आहे. या गावाचे मार्गावरील रापनिची बस फेरी आहे. या बस फेरीचा फायदा या बालकांना होत नाही. पायदळ प्रवास करून शिक्षणासाठी केवीलवाणी धडपडणारे इयत्ता १ ते ४ पर्यंतचे चिमुकले बालक वातावरणाने असुरक्षित आहेत. या गावात अंगणवाडी नाही. यामुळे बालकांना शासनाचे सुविधा प्राप्त होत नाही.गर्भवती मातांना आहाराचे वाटप प्रभावित होत आहेत. राज्य शासन अशा गावात वस्तीशाळा आणि मिनी अंगणवाडी ना मंजुरी देत आहे. परंतु या गावात दोन्ही सुविधा नाही. लोकप्रतिनिधी या गावात क्वचित हजेरी लावत आहेत. गावात सिमेंट रस्ते आणि पिण्याचे पाणी या सुविध निकाली काढण्यात आलेल्या आहे. परंतु शिक्षणाचे सोयी व बालकांचे सुरक्षेकरिता साधे यंत्रणेमार्फत प्रयत्न करण्यात आले नाही.उच्च शिक्षणाकरिता या गावातील मुले सिहोरा गावात धाव घेत आहेत. त्याचे प्रवास रापनिचे बस ने होत आहे. त्याचे वय १२ वर्गाचे पुढे आहे. परंतु पायदळ प्रवास करणारी बालके या वयाचे आतील आहेत. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गंभीर समस्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.या गावात असणारी बालकांची शिक्षणासाठी धडपड मन हेलावणारी आहे. शाळा, ग्रामपंचायत व शिक्षण विभाग यांचेत समन्वय साधून बालकांच्या सुरक्षेसंदर्भात प्रयत्न करणार आहे.-धनेंद्र तुरकर, सभापती जि.प. भंडारा.या गावात अंगणवाडी नाही. अन्य गावांना गाव संलग्नीत असले तरी निकषानुसार मिनी अंगणवाडी मंजुरीसाठी प्रयत्न करणार आहे.-रेखा ठाकरे, सभापती महिला व बाल कल्याण विभाग भंडाराबालकांना ने आण करण्याची जबाबदारी शाळा समिती व ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून झाली पाहिजे. अशा एका वाहनाची सोय करण्याची गरज आहे.-गुड्डू शामकुवर, सामाजिक कार्यकर्ता चुल्हाड.