शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

काशीबाई म्हणते, घर देता का... घर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:01 IST

खिळखिळे झालेले मातीचे घर. वादळ-वाऱ्यात केव्हा कोसळेल याचा नेम नाही. साधी वाºयाची झुळुकही आली तरी अंगावर काटा उभा राहतो. अशा तडे गेलेल्या घरात एक वृध्द महिला गत काही वर्षांपासून नाईलाजाने वास्तव्यास आहे. शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत अर्जही केला.

ठळक मुद्देघरकुलाची प्रतीक्षा : कागदपत्र देऊनही दोन वर्षांपासून प्रतीक्षा

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : खिळखिळे झालेले मातीचे घर. वादळ-वाऱ्यात केव्हा कोसळेल याचा नेम नाही. साधी वाºयाची झुळुकही आली तरी अंगावर काटा उभा राहतो. अशा तडे गेलेल्या घरात एक वृध्द महिला गत काही वर्षांपासून नाईलाजाने वास्तव्यास आहे. शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत अर्जही केला. परंतू दोन वर्षांपासून प्रतीक्षा कायम आहे. आता दिव्यांग वृध्द महिला घर देता का... घर! अशी आर्त विणवनी करीत आहे.ही कहाणी आहे तुमसर तालुक्यातील माडगी येथील काशीबाई संतोष कुंडलीक या ७५ वर्षीय वृध्द महिलेची. आपल्या धनराज नावाच्या मुलासोबत ती या झोपडीत राहते. काशीबाई दिव्यांग असल्याने धनराजच्या भरोश्यावर तिचा चरितार्थ चालतो. गत ५० वर्षांपासून कुंडलिक कुटूंब माडगीत वास्तव्याला आहे. पंरतू अद्यापही हक्काचे घर मात्र मिळाले नाही. घराच्या प्रतीक्षेत काशीबाईचे पती संतोष यांचा मृत्यू झाला.पंतप्रधान घरकूल योजनेमुळे आपल्या घराचे स्वप्न होईल, असे काशीबाईला वाटते. त्यासाठी त्यांनी मुलाच्या मदतीने संपुर्ण कागदपत्रे जमा केली. ग्रामपंचायत व संबंधित एजन्सीकडे अर्ज दिला. परंतू घरकुलाचा अद्यापपर्यंत थांगपत्ता नाही. मागेल त्याला घर देण्याची शासनाची योजना आहे. प्रत्येकाला घरकूल देण्याचा शासनाच्या मानस आहे, असे असतानाही दिव्यांग काशीबाई मात्र घरासाठी प्रतीक्षा करीत आहे. मातीचे असलेले घर गतवर्षीच्या वादळात उध्दवस्त झाले होते. उडालेले छप्पर पैसे जमवून प्लास्टिक ताडपत्रीने अच्छादीत केले. मातीच्या घराला तडे गेले आहे. वादळात घर कोसळते की काय अशी भीती असते. या पावसाळ्यापूर्वीतरी आम्हाला हक्काचे घर मिळेल काय, अशी विनवणी काशीबाई करते.काय करावे काही सुचत नाहीशासनाकडे घरकुलासाठी अर्ज देवूनही उपयोग झाला नाही. या पावसाळ्यात माझी झोपडी वाचेल काय? आकाशात काळे ढग जमा झाले की मन घाबरुन जाते व काय करावे सुचत नाही. मायबाप सरकारने पावसाळ्यापूर्वी घरकूल मंजूर करावे अशी मागणी काशीबाई करीत आहे.प्रत्येकाला घर योजनेचा फज्जा उडाला आहे. दिव्यांग वृध्द महिलेला घरकुलासाठी दारोदारी भटकावे लागते. ही लाजीरवाणी बाब आहे. प्रशासनाला खंत कशी वाटत नाही.- विपील कुंभारेकाँग्रेस नेते, माडगी