शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

करडी परिसराला १६ तास भारनियमनाचा ‘शॉक’

By admin | Updated: August 1, 2016 00:18 IST

करडी परिसरातील शेतकरी व घरगुती ग्राहक करडी फिडरवरून होणाऱ्या १६ तासाच्या भारनियमनाने पावसाळा असतानाही होरपळून निघाले आहे.

शेतकऱ्यांमध्ये संताप : करडी, आंधळगांव परिसरातील शेतकऱ्यांचा उपकेंद्रावर आंदोलनाचा इशाराकरडी (पालोरा) : करडी परिसरातील शेतकरी व घरगुती ग्राहक करडी फिडरवरून होणाऱ्या १६ तासाच्या भारनियमनाने पावसाळा असतानाही होरपळून निघाले आहे. मागील १० दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. रोवणीसाठी तसेच रोवणी झालेल्या धान पिकाला जगवायचे कसे? केव्हाही घरगुती वीज बंद करून १० ते १२ तासांचे भारनियमन होत आहे. उकाड्यामुळे दिवसा व रात्रीची झोपही विभागाने उडवली आहे. हे भारनियमन त्वरीत बंद करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.विदर्भात विजेचे मोठे उत्पादन होत असताना भारनियमनाचा त्रास येथील शेतकऱ्यांसह व्यवसायीकांना होत आहे. करडी फिडरवर १६ तासांचे भारनियमन होत आहे. परिसरातील २५ गावांना तसेच कोका परिसरातील पाच गावांना माडगी फिडरवरून करडी उपकेंद्राच्या माध्यमातून विजेचा पुरवठा केला जात आहे. कोका परिसरातील गावे कोका वन्यजीव अभयारण्यात मोडतात. जंगली श्वापदांचा वावर या भागात आहे. मात्र विद्युत विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे येथील नागरिकांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. मुख्यालयी राहावे की नाही असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. घरगुती ग्राहक १० ते १२ तास होणाऱ्या घोषित व अघोषित भारनियमनाने त्रस्त आहेत. मात्र विजेचे बील कमी झालेले दिसत नसल्याने त्यांच्या असंतोषात भर पडली आहे. करडी व कोका परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याला विद्युत विभागाची मोठी भूमिका असल्याचा आरोप होत आहे. फक्त आठ तासात विद्युत विभागानेच शेती पिकवून दाखवावी, असा शेतकऱ्यांचा संतप्त प्रश्न आहे. मागील १० दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. रोवणी झालेल्या शेतात भेगा पडायला लागल्या आहेत. शेतीसाठी घेतलेले कर्ज पुन्हा मागील वर्षासारखे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस नसल्याने व विद्युत विभागाच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. रोवणी झालेल्या शेतकऱ्यांबरोबर रोवणी न झालेले शेतकरीही बेजार झाले आहेत.शेतीची धूळधाणी झाली असून रात्रीची झोपही विभागाने उडविली आहे. रात्री केव्हाही वीज पुरवठा बंद केला जातो. पावसाळ्याचे दिवस असल्याने मच्छरांचा उपद्व्यापामुळे लहान मुले आजारी पडत आहेत. भारनियमणामुळे त्यांना झोप येत नसल्याने रात्र जाणून निघत आहे. केव्हाही वीज पुरवठा बंद करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर कायम केला जातो. असह्य झाल्याचे नागरिकांचे मत असून त्वरीत भारनियमन बंद न केल्यास करडी उपकेंद्रावर आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)आंधळगाव परिसरात २४ तास वीज पुरवठ्याची मागणीआंधळगाव : परिसरात धान रोवणीचा हंगाम सुरु असून पाऊस वारंवार हुलकावणी देत आहे. शेतकरी दररोज दमदार पाऊस पडेल या आशेने वरुण राजाकडे टक लावून बघत आहेत. त्यातच या परिसरात भारनियमण सुरु असल्यामुळे फक्त शेतकऱ्यांना आठ तास शेत ओलीत करता येते. हे लोडशेडींग न करता २४ तास वीज पुरवठा करण्याची मागणी आंधळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता, महावितरण कंपनीच्या अभियंत्याला केली आहे.शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा या उद्देशाने शासन अनेक योजना राबवित आहे. तर दुसरीकडे शासनच लोडशेडींग करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. आंधळगाव परिसरात भात रोवणी जोमात सुरु आहे. मात्र वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांना फक्त आठ तास वीज पुरवठा करीता पाण्याची आवश्यकता आहे. शेतात पाणी नसल्यामुळे मजुरांना खाली ठेवून मजुरी भरून द्यावी लागत आहे. मात्र वीज वितरण कंपनी रात्र पाळीला वीज पुरवठा सुरु करते. तेवढ्या रात्री विद्युत पंप सुरु करण्यासाठी जाणे शेतकऱ्यांना अवघड होते असते. त्यात रात्रीला वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांवर हल्ला करण्याची शक्यता असते व त्या शेतकऱ्याला जीवास मुकावे लागू शकते. या सर्व गोष्टींचा वीज वितरण कंपनी व शासनाने विचार करून शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन अभियंता वीज वितरण कंपनी यांना शेतकऱ्यांनी दिले आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कैलास मते, नरेंद्र बुराडे, रेवराम उपरीकर, अमोल विठुले, आत्माराम पिकलमुंडे, श्रीराम गलबले, सेवक मते, पंढरी उके, प्रफुल धुमनखेडे, नरेंद्र धुमनखेडे, उमेश बनकर, जनार्दन गोंडाणे, पांडूरंग मते, शिवलाल गलबले आदी शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)करडी परिसरात विद्युत विभागाचे वतीने कृषी फिडरवर १६ तासाचे तर घरगुती फिडरवर १० ते १२ तासांचे घोषित, अघोषित भारनियमन केले जात आहे. माडगी विद्युत स्टेशन जळाल्याचे कारण देत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरून टाकले जात आहे. शेतकरी त्रस्त असून त्वरीत भारनियमन बंद न झाल्यास करडी उपकेंद्रावर शेतकऱ्यांचे वतीने आंदोलन केले जाईल.- श्रीकांत डोरले, सामाजिक कार्यकर्ता तथा शेतकरी करडीमाडगी फिडरला आग लागल्यामुळे विजेचे संकट उभे ठाकले आहे. शासनाच्या धोरणामुळे कृषीवर १६ तासाचे भारनियमन तर घरगुतीवरही ८ तासांचे भारनियमन होत आहे. माडगी केंद्र दोन दिवसात सुरु होण्याची शक्यता आहे. त्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. मे महिन्यात वारंवार बिघाड आल्याने वीज पुरवठा खंडीत होत होता. आता मात्र दुरुस्त्या पूर्ण केल्या आहेत.ए. बी कहाले उपविभागीय अभियंता मोहाडी