शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या चार महिन्यातच झाली रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 05:00 IST

मात्र काही कारणास्तवर अनेक शेतकरी, ग्रामस्थ याच रस्त्यावरून प्रवास करतात. सदर दस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याची ओरड होत असल्याने रस्ता काम करणाºयांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. परिसरात या रस्त्याच्या निकृष्ठ कामाची चर्चा रंगत आहे. एकीकडे शासन लाखो रूपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे दर्जेदार कामे होत नसल्याने ग्रामीण भागात नागरिकांना रस्त्याअभावी चांगलीच कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देअड्याळ-सालेवाडा रस्त्याचे प्रकरण : शेतकऱ्यांची होतेय दमछाक

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पवनी तालुक्यातील अड्याळ ते सालेवाडा मार्गातील नुकतेच डांबरीकरण करण्यात आले होते. या रस्ते कामासाठी लाखो रूपये खर्च केले असताना अवघ्या चार महिन्यातच रस्त्याची दुरावस्था झाली असून शेतकऱ्यांना ऐन हंगामात कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यानंतर काही दिवसांनी रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र काम व्यवस्थित झाले नसल्याचे गावकºयातून ओरड आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे स्वत:चा जीव धोक्यात घालणे, असा गावकऱ्यातून सूर निघत आहे.मात्र काही कारणास्तवर अनेक शेतकरी, ग्रामस्थ याच रस्त्यावरून प्रवास करतात. सदर दस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याची ओरड होत असल्याने रस्ता काम करणाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. परिसरात या रस्त्याच्या निकृष्ठ कामाची चर्चा रंगत आहे. एकीकडे शासन लाखो रूपये खर्च करीत आहे तर दुसरीकडे दर्जेदार कामे होत नसल्याने ग्रामीण भागात नागरिकांना रस्त्याअभावी चांगलीच कसरत करावी लागत आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अड्याळ ते सालेवाडा डांबरीकरण रस्ता.गत सहा महिन्यात अड्याळसह परिसरात बऱ्याच डांबरी रस्त्यांची कामे झाली. मात्र याचा दर्जा चांगला नसल्याची ओरड सुरू आहे. ग्रामस्थांची रस्त्याबाबत नेहमीच तक्रार सुरू असून याबाबत वरिष्ठांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आले आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहे.कारवाई होत नसल्याने यामागचे गुपीत काय, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. लाखो रूपयांचा निधी खर्च होत असताना किमान एक वर्षतरी रस्त्याची गुणवत्ता कायम राहिली पाहिजे. मात्र अवघ्या दोन ते चारच महिन्यात रस्त्यावर खड्डे पडत असल्याने रस्ता काम गुणवत्तापूर्ण झाले आहे काय, असा प्रश्न नागरिकांतून अधिकाºयांना केला जात आहे.काहींच्या स्वार्थासाठी नागरिकांना त्रासशासन ग्रामीण भागातून नागरिकांना रस्त्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी लाखो रूपयाचा निधी उपलब्ध करून देते. मात्र यंत्रणेतील काही अधिकारी, कंत्राटदार स्वत:च्या स्वार्थासाठी रस्ते काम दर्जेदार करीत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. रस्त्याची सुरूवात आणि शेवटचे काम बऱ्यापैकी झाले. मात्र मध्यंतरी झालेली कामे निकृष्ठ दर्जाची असल्याचे चित्र स्पष्ट आहे. परिणामी रस्त्याची दूरावस्था झाली असतानाही संबंधित यंत्रणेला लक्ष देण्यासाठी वेळ नाही का, असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकpwdसार्वजनिक बांधकाम विभाग