शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

जांभळी गावाला आले छावण ीचे रुप

By admin | Updated: November 4, 2014 22:35 IST

मागील १५ दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीत जीवन जगत असलेल्या नागरिकांना आताही मोकळा श्वास घेता येत नाही. जराही शेतात किंवा घराबाहेर जायचे म्हटले की समोर दिसते ती बिबट्याची दहशत.

बिबट सापडेना : नागरिकांमध्ये भीती अन् संताप, २०० अधिकारी व कर्मचारी तैनातसंजय साठवणे - साकोलीमागील १५ दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीत जीवन जगत असलेल्या नागरिकांना आताही मोकळा श्वास घेता येत नाही. जराही शेतात किंवा घराबाहेर जायचे म्हटले की समोर दिसते ती बिबट्याची दहशत. एक महिला बिबट्याच्या शिकारीला बळी पडली. त्यामुळे नागरिक धास्तावले आहे. सध्या या गावात वनअधिकारी, कर्मचारी, पोलीस, राज्य राखीव दल असे २०० च्यावर कुमक लागली असून साकोली तालुक्यातील जांभळी (खांबा) या गावाला छावणीचे रुप आले आहे. गावाची लोकसंख्या १२०० असून या गावात आताही एवढी दहशत आसहे की लोक शेतातही जायला घराबाहेर निघत नाही. जांभळी गाव हे नागझिरा व्याघ्रप्रकल्पाला लागले असून हे गाव वनविभाग साकोलीच्या हद्दीत येत असून गावाला लागलेले जंगल हे वन्यजीव विभाग नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या अखत्यारीत येते. गावाच्या सभोवताल जंगल व्यापलेले आहे. त्यामुळे एकंदरीतच परिसरात वन्यप्राण्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात नेहमीच असते.गाव परिसरात वाघ, बिबट, अस्वल, हरिण यासह अन्य वन्यप्राणी नेहमीच दिसतात. हे या परिसरातील लोकांसाठी नवीन नाही. पण शेळ्यांची व माणसांची शिकार ही या परिसरातील पहिलीच घटना आहे.या बिबट्याचे पूर्वी पंधरा वीस दिवसांपासून शेळ्या फस्त करण्याचे प्रकार सुरु केले. याची माहिती गावातीलच लोकांनी वनविभागाला दिली. यावेळी जर वनविभागाने या बिबटाला पकडण्यासाठी जर उपाययोजना केली असती तर कदाचित त्या वृद्ध महिलेचा जीव वाचविता आला असता.वृद्ध महिलेच्या शिकारीपूर्वी साकोली वनविभागातर्फे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना या बिबट्याला जेरबंदी करण्याची परवानगी मागितली होती. मात्र प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी ही मागणी फेटाळली. परिणामी वनविभागाने ही कारवाई टाळली व महिलेला जीव गमवावा लागला. त्यामुळे वनविभागालाच या प्रकरणात दोषी ठरवून त्यांचेवरही कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही आता जोर धरत आहे. मळाबाई बावणे या वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर वनविभाग जागा झाला. त्या दिवसापासून गावात बिबट पकडण्यासाठी पिंजरे मांडणे, वनकर्मचाऱ्यांची गस्त लावणे असे प्रकार सुरु झाले. सद्यस्थितीला या गाव परिसरात या बिबटला पकडण्यासाठी सहा पिंजरे लावण्यात आले.या गावात एक सहायक वनसंरक्षक, दोन वनक्षेत्राधिकारी, आठ सहाय्यक वनक्षेत्राधिकारी, तुमसर, नाकाडोंगरी, लाखनी, लाखांदूर, साकोली यासह इतर ठिकाणचे असे एकूण २०० वनरक्षक, ५० वनमजूर व वन्यजीव विभागाचे दहा कर्मचारी असे एकूण २०० कर्मचारी या ठिकाणी गस्तीवर आहेत. मात्र हा बिबट आताही मोकळाच असून गावात मात्र कमालीची दहशत आहे.