शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरिजायवर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

जलयुक्त शिवार अभियान लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:29 IST

राज्यात सतत टंचाईसदृष्य स्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे.

ठळक मुद्देतरकसे यांचे प्रतिपादन : सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, शेतकरी यांचे प्रशिक्षण वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : राज्यात सतत टंचाईसदृष्य स्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. राज्यात मागील ४ दशकात कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर चढउतार दिसून येत आहे. या परिस्थितीस मुख्यत्वेकरून पाण्याची कमी उपलब्धता हा घटक कारणीभूत आहे. शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी जलसंधारणाअंतर्गत उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करून राबविल्यास पिण्याचे पाणी व विकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्चितपणे करता येईल. यासाठी जलयुक्तशिवार अभियानाच्या माध्यमातून लोकचवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे यांनी केले.मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य, जिल्हा पाणलोट विकास कक्ष तथा जिल्हा माहिती केंद्र जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय भंडारा व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ अंतर्गत भंडारा तालुक्यातील १० गावातील गावपातळीवरील शासकीय व अशासकीय प्रतिनिधीकरिता आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमातील उद्घाटकीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा येथील प्रशिक्षण सभागृहात २३ ते २५ आॅगस्ट या कालावधीकरिता गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक, महिला प्रतिनिधी व प्रगतिशील शेतकरी यांचेकरिता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाव पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे, तालुका कृषी अधिकारी एस. जी. गणवीर, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक एन. व्ही. गणविर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर, सेवानवृत्त प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे आर.एस. मांढरे उपस्थित होते.यावेळी अविल बोरकर, आर. एस. मांढरे, एस. एस. पिल्लेवान, डॉ. रेखा बोधनकर, मिलींद गजभिये, एस. जी. गणवीर, बी.व्ही. वैद्य, जितेंद्र वंजारी, अरविंद धारगावे आदींनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात १० गावातील कृषी सहाय्यक ११, ग्रामसेवक १०, सरपंच १०, महिला प्रतिनिधी ४, शेतकरी ११, उपसरपंच २ असे एकूण ४८ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.कार्यक्रमासाठी सागर बागडे, विवेक नंदनवार, वैषाली गणवीर, जागेश्वर पाल, शेतकरी आदींनी ंसहकार्य केले.