शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जलयुक्त शिवार अभियान लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:29 IST

राज्यात सतत टंचाईसदृष्य स्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे.

ठळक मुद्देतरकसे यांचे प्रतिपादन : सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, शेतकरी यांचे प्रशिक्षण वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : राज्यात सतत टंचाईसदृष्य स्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. राज्यात मागील ४ दशकात कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर चढउतार दिसून येत आहे. या परिस्थितीस मुख्यत्वेकरून पाण्याची कमी उपलब्धता हा घटक कारणीभूत आहे. शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी जलसंधारणाअंतर्गत उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करून राबविल्यास पिण्याचे पाणी व विकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्चितपणे करता येईल. यासाठी जलयुक्तशिवार अभियानाच्या माध्यमातून लोकचवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे यांनी केले.मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य, जिल्हा पाणलोट विकास कक्ष तथा जिल्हा माहिती केंद्र जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय भंडारा व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ अंतर्गत भंडारा तालुक्यातील १० गावातील गावपातळीवरील शासकीय व अशासकीय प्रतिनिधीकरिता आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमातील उद्घाटकीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा येथील प्रशिक्षण सभागृहात २३ ते २५ आॅगस्ट या कालावधीकरिता गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक, महिला प्रतिनिधी व प्रगतिशील शेतकरी यांचेकरिता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाव पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे, तालुका कृषी अधिकारी एस. जी. गणवीर, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक एन. व्ही. गणविर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर, सेवानवृत्त प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे आर.एस. मांढरे उपस्थित होते.यावेळी अविल बोरकर, आर. एस. मांढरे, एस. एस. पिल्लेवान, डॉ. रेखा बोधनकर, मिलींद गजभिये, एस. जी. गणवीर, बी.व्ही. वैद्य, जितेंद्र वंजारी, अरविंद धारगावे आदींनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात १० गावातील कृषी सहाय्यक ११, ग्रामसेवक १०, सरपंच १०, महिला प्रतिनिधी ४, शेतकरी ११, उपसरपंच २ असे एकूण ४८ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.कार्यक्रमासाठी सागर बागडे, विवेक नंदनवार, वैषाली गणवीर, जागेश्वर पाल, शेतकरी आदींनी ंसहकार्य केले.