शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
3
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
4
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
5
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
6
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
7
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
8
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
9
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
10
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
11
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
12
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
13
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
14
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
15
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
16
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
17
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
18
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
19
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
20
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

जलयुक्त शिवार अभियान लोकचळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:29 IST

राज्यात सतत टंचाईसदृष्य स्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे.

ठळक मुद्देतरकसे यांचे प्रतिपादन : सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, शेतकरी यांचे प्रशिक्षण वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : राज्यात सतत टंचाईसदृष्य स्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. राज्यात मागील ४ दशकात कोरडवाहू क्षेत्रातील पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर चढउतार दिसून येत आहे. या परिस्थितीस मुख्यत्वेकरून पाण्याची कमी उपलब्धता हा घटक कारणीभूत आहे. शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी जलसंधारणाअंतर्गत उपाययोजना एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार करून राबविल्यास पिण्याचे पाणी व विकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्चितपणे करता येईल. यासाठी जलयुक्तशिवार अभियानाच्या माध्यमातून लोकचवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे यांनी केले.मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य, जिल्हा पाणलोट विकास कक्ष तथा जिल्हा माहिती केंद्र जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय भंडारा व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ अंतर्गत भंडारा तालुक्यातील १० गावातील गावपातळीवरील शासकीय व अशासकीय प्रतिनिधीकरिता आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमातील उद्घाटकीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा येथील प्रशिक्षण सभागृहात २३ ते २५ आॅगस्ट या कालावधीकरिता गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक, महिला प्रतिनिधी व प्रगतिशील शेतकरी यांचेकरिता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गाव पातळीवरील प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी एस.पी. लोखंडे, तालुका कृषी अधिकारी एस. जी. गणवीर, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक एन. व्ही. गणविर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव अविल बोरकर, सेवानवृत्त प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे आर.एस. मांढरे उपस्थित होते.यावेळी अविल बोरकर, आर. एस. मांढरे, एस. एस. पिल्लेवान, डॉ. रेखा बोधनकर, मिलींद गजभिये, एस. जी. गणवीर, बी.व्ही. वैद्य, जितेंद्र वंजारी, अरविंद धारगावे आदींनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात १० गावातील कृषी सहाय्यक ११, ग्रामसेवक १०, सरपंच १०, महिला प्रतिनिधी ४, शेतकरी ११, उपसरपंच २ असे एकूण ४८ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.कार्यक्रमासाठी सागर बागडे, विवेक नंदनवार, वैषाली गणवीर, जागेश्वर पाल, शेतकरी आदींनी ंसहकार्य केले.