शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

रक्तदानासाठी जयदीपची सायकल भ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:57 IST

फुटबॉल खेळताना अपघात झाला. एक तरुण मृत्यूच्या दारात पोहचला. त्यावेळी रक्ताची अत्यंत गरज होती. मात्र जेथे कुटुंबियांनीच नकार दिला तेथे दुसऱ्यांचे काय? अशा परिस्थितीत एका रक्तपेढीने पुढाकार घेत त्याला रक्त उपलब्ध करुन दिले आणि तेथून सुरु झाला त्याच्या रक्तदान चळवळीचा प्रवास.

ठळक मुद्देदेशभर करणार प्रसार : पश्चिम बंगालच्या तरुणाचा १३ राज्यात प्रवास

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : फुटबॉल खेळताना अपघात झाला. एक तरुण मृत्यूच्या दारात पोहचला. त्यावेळी रक्ताची अत्यंत गरज होती. मात्र जेथे कुटुंबियांनीच नकार दिला तेथे दुसऱ्यांचे काय? अशा परिस्थितीत एका रक्तपेढीने पुढाकार घेत त्याला रक्त उपलब्ध करुन दिले आणि तेथून सुरु झाला त्याच्या रक्तदान चळवळीचा प्रवास. जयदीप राऊत असे या अवलीयाचे नाव असून पश्चिम बंगालचा हा तरुण चक्क सायकलने भारतभर भ्रमंती करीत रक्तदानासाठी नागरिकांना प्रेरीत करीत आहे.साकोली या राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्याच्या ठिकाणी मंगळवारी सायकलवरून एक तरुण आला. सायकलला तिरंगा झेंडा आणि समोर एक फलक लावलेल्या या तरुणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अधिक चौकशी केली तेव्हा हा तरुण रक्तदान चळवळीसाठी स्वत:ला वाहून घेतलेला निघाला. पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्यातील जयदीप राऊत हा तरुण आपल्या सायकलने भारतभर भ्रमंती करीत आहे. फुटबॉल खेळत असताना त्याला जबर दुखापत झाली. त्यावेळी चार बॉटल रक्ताची त्याला आवश्यकता होती. परंतु त्याच्या कुटुंबियांनी रक्त देण्यास नकार दिला. अखेर एका रक्तपेढीच्या पुढाकाराने त्याला जीवदान मिळाले. स्वत:वर ओढवलेल्या या संकटाने त्यांना रक्तदानाचे महत्व कळले. हीच बाब देशवासीयांना कळावी म्हणून पुढाकार घेतला. गत चार महिन्यांपासून ते सायकलने भारतभर फिरत आहेत.झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि आता तो महाराष्ट्रात पोहचला आहे. आतापर्यंत नऊ राज्यात पाच हजार किलोमीटर सायकलने प्रवास केला आहे. साकोली येथे लहरीबाबा मठात उपस्थितांना रक्तदानाविषयी त्यांनी प्रेरित केले. यावेळी डॉ.केशव कापगते, डॉ.भास्कर गायधने, डॉ.अमोल बडवाईक, डॉ.अजय तुमसरे, डॉ.रवींद्र कापगते, डॉ.छाया कापगते, डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विदर्भात मिळाला उत्तम प्रतिसादजयदीप राऊत हा मुंबई, नाशिक, औरंगाबाद मार्गे विदर्भात दाखल झाला. अकोला, अमरावती, नागपूर असा प्रवास करीत तो भंडारा जिल्ह्यात दाखल झाला. या मोहीमेत ठिकठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रत्येकाने आपली आस्थेने चौकशी करून कोणतीही अडचण येऊ दिली नाही. रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा असे सांगतो.