शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

बालकदिनी चिमुकल्यांवर आली ताट वाजविण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:14 IST

अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा धान्य साठा संपला आहे. उधारीवर कुठवर धान्य द्यायचे, असा प्रश्न देणाºयांना पडला.

ठळक मुद्दे‘चाचा’ ठरलेल्या सरपंचांची मदत : शालेय पोषण आहार पुरविणाºयावर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा धान्य साठा संपला आहे. उधारीवर कुठवर धान्य द्यायचे, असा प्रश्न देणाºयांना पडला. त्यामुळे बालकांना माध्यान्ह भोजन देण्यासाठी शिक्षकांची कसरत सुरू आहे. असाच प्रकार रोहणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडला. शाळेतील तांदूळ संपला. आज जेवणाचा दिवस कोरडा जाणार म्हणून ग्रामशिक्षण समितीच्या सदस्यांसह चिमुकल्यांवर बालकदिनी रिकाम्या ताट्या वाजविण्याची वेळ आली. तथापि, सरपंच नरेश ईश्वरकर देवदूत बनून आले अन् त्यांनी दोन दिवसाचे तांदूळ देऊन ते या बालकांचे ‘चाचा’ बनले.शालेय पोषण आहारातील तेल अन् मीठही संपले. तरीही विद्यार्थ्यांना खाऊ घाला. कोणताही खंड पडू देऊ नका, १५ दिवसानंतर शासनस्तरावरून केली जाईल. किमान १५ दिवस तरी विद्यार्थ्यांना उपाशी ठेऊ नका, असे मोहाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून ६ सप्टेंबर रोजी मुख्याध्यापकाचा सभेत सांगण्यात आले होते. दोन महिने होऊनही ना तांदूळ ना अन्य साहित्य शाळांना मिळाला नाही. ज्या शाळांनी धान्यादी माल घेतले त्याचे बिलही देण्यात आले नाही. त्यामुळे हा संताप व्यक्त होत असताना रोहणा जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत एक महिन्यापासून तांदूळ संपले आहे. याची कल्पना मुख्याध्यापकांनी प्रशासनाला दिली. मुख्याध्यापकांनी उसणवार धान्य स्वस्त धान्य दुकानातून घेतले. परंतु असे उसणवार धान्य कुठवर द्यायचे, आपले उसणवार धान्य परत मिळणार कधी? या शंकेने धान्य दुकानदारांनी तांदूळ देणे बंद केले. आज भात शिजणार नाही. मुले उपाशी राहतील म्हणून ग्रामशिक्षण समितीचे दोन सदस्य शाळेत गेले. मुलेही वर्गाबाहेर आले. त्यानंतर मुलांनी ताटया वाजवा आंदोलन केले. आज बालकदिनी रिकाम्या ताटया वाजविण्याची वेळ प्रशासनाने मुलांवर आणली. सोमवारलाच सरपंच नरेश ईश्वरकर यांनी रोहणा ग्रामपंचायतचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी मंगळवारला सकाळी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता विद्यार्थी रिकाम्या ताटया वाजवित असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे गावातील मुले उपाशी राहू नये म्हणून सरपंच ईश्वरकर यांनी दोन दिवसाचे तांदूळ शाळेत पुरविले. माध्यान्हानंतर मुलांना अन्न खाऊ घालण्यात आले. बालकदिनी सरपंच नरेश ईश्वरकर हे त्या शाळेतील बालकांचे ‘चाचा’ ठरले. यापूर्वी उपसरपंच असताना त्यांनी त्या शाळेला माध्यान्ह भोजनासाठी ५० किलो तांदूळ पुरविले होते. धान्य शाळेत नाही याबाबत मुख्याध्यापक प्रकाश महालगावे यांनी शिक्षण विभागाच्या प्रशासनाला कळविले होते. आजही त्यांनी गटशिक्षणाधिकाºयांना पत्र दिले. प्रत्येक शाळेत धान्याचा साठा संपला आहे. आपल्या खिशातून पैसे खर्च करणाºया मुख्याध्यापकांना दैनंदिन भोजन देण्यासाठी संकटाचा सामना करावा लागत आहे.बालकांना उपाशी ठेवण्याचे कारस्थान शासनाकडून सुरू आहे. दोन्ही बाजूने मुख्याध्यापक पिळला जात आहे. शासनाचे हेच ‘अच्छे दिन’ का?. धान्याची व्यवस्था प्रशासनाने तातडीने करावी.- नरेश ईश्वरकर,सरपंच, ग्रा.पं. रोहणा.