शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
5
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
6
PM Kisan योजनेच्या २० हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
7
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
8
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
9
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
10
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
11
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
12
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
14
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
15
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
16
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
17
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
18
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...
19
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
20
दहावीतील गुणांवरून नातेवाईकांनी उडवली होती खिल्ली, आता तरुणाने बँकेचा SMS दाखवला; आकडा पाहून 'बोलती बंद'

बालकदिनी चिमुकल्यांवर आली ताट वाजविण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:14 IST

अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा धान्य साठा संपला आहे. उधारीवर कुठवर धान्य द्यायचे, असा प्रश्न देणाºयांना पडला.

ठळक मुद्दे‘चाचा’ ठरलेल्या सरपंचांची मदत : शालेय पोषण आहार पुरविणाºयावर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा धान्य साठा संपला आहे. उधारीवर कुठवर धान्य द्यायचे, असा प्रश्न देणाºयांना पडला. त्यामुळे बालकांना माध्यान्ह भोजन देण्यासाठी शिक्षकांची कसरत सुरू आहे. असाच प्रकार रोहणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडला. शाळेतील तांदूळ संपला. आज जेवणाचा दिवस कोरडा जाणार म्हणून ग्रामशिक्षण समितीच्या सदस्यांसह चिमुकल्यांवर बालकदिनी रिकाम्या ताट्या वाजविण्याची वेळ आली. तथापि, सरपंच नरेश ईश्वरकर देवदूत बनून आले अन् त्यांनी दोन दिवसाचे तांदूळ देऊन ते या बालकांचे ‘चाचा’ बनले.शालेय पोषण आहारातील तेल अन् मीठही संपले. तरीही विद्यार्थ्यांना खाऊ घाला. कोणताही खंड पडू देऊ नका, १५ दिवसानंतर शासनस्तरावरून केली जाईल. किमान १५ दिवस तरी विद्यार्थ्यांना उपाशी ठेऊ नका, असे मोहाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून ६ सप्टेंबर रोजी मुख्याध्यापकाचा सभेत सांगण्यात आले होते. दोन महिने होऊनही ना तांदूळ ना अन्य साहित्य शाळांना मिळाला नाही. ज्या शाळांनी धान्यादी माल घेतले त्याचे बिलही देण्यात आले नाही. त्यामुळे हा संताप व्यक्त होत असताना रोहणा जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत एक महिन्यापासून तांदूळ संपले आहे. याची कल्पना मुख्याध्यापकांनी प्रशासनाला दिली. मुख्याध्यापकांनी उसणवार धान्य स्वस्त धान्य दुकानातून घेतले. परंतु असे उसणवार धान्य कुठवर द्यायचे, आपले उसणवार धान्य परत मिळणार कधी? या शंकेने धान्य दुकानदारांनी तांदूळ देणे बंद केले. आज भात शिजणार नाही. मुले उपाशी राहतील म्हणून ग्रामशिक्षण समितीचे दोन सदस्य शाळेत गेले. मुलेही वर्गाबाहेर आले. त्यानंतर मुलांनी ताटया वाजवा आंदोलन केले. आज बालकदिनी रिकाम्या ताटया वाजविण्याची वेळ प्रशासनाने मुलांवर आणली. सोमवारलाच सरपंच नरेश ईश्वरकर यांनी रोहणा ग्रामपंचायतचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी मंगळवारला सकाळी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता विद्यार्थी रिकाम्या ताटया वाजवित असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे गावातील मुले उपाशी राहू नये म्हणून सरपंच ईश्वरकर यांनी दोन दिवसाचे तांदूळ शाळेत पुरविले. माध्यान्हानंतर मुलांना अन्न खाऊ घालण्यात आले. बालकदिनी सरपंच नरेश ईश्वरकर हे त्या शाळेतील बालकांचे ‘चाचा’ ठरले. यापूर्वी उपसरपंच असताना त्यांनी त्या शाळेला माध्यान्ह भोजनासाठी ५० किलो तांदूळ पुरविले होते. धान्य शाळेत नाही याबाबत मुख्याध्यापक प्रकाश महालगावे यांनी शिक्षण विभागाच्या प्रशासनाला कळविले होते. आजही त्यांनी गटशिक्षणाधिकाºयांना पत्र दिले. प्रत्येक शाळेत धान्याचा साठा संपला आहे. आपल्या खिशातून पैसे खर्च करणाºया मुख्याध्यापकांना दैनंदिन भोजन देण्यासाठी संकटाचा सामना करावा लागत आहे.बालकांना उपाशी ठेवण्याचे कारस्थान शासनाकडून सुरू आहे. दोन्ही बाजूने मुख्याध्यापक पिळला जात आहे. शासनाचे हेच ‘अच्छे दिन’ का?. धान्याची व्यवस्था प्रशासनाने तातडीने करावी.- नरेश ईश्वरकर,सरपंच, ग्रा.पं. रोहणा.