शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

बालकदिनी चिमुकल्यांवर आली ताट वाजविण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:14 IST

अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा धान्य साठा संपला आहे. उधारीवर कुठवर धान्य द्यायचे, असा प्रश्न देणाºयांना पडला.

ठळक मुद्दे‘चाचा’ ठरलेल्या सरपंचांची मदत : शालेय पोषण आहार पुरविणाºयावर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा धान्य साठा संपला आहे. उधारीवर कुठवर धान्य द्यायचे, असा प्रश्न देणाºयांना पडला. त्यामुळे बालकांना माध्यान्ह भोजन देण्यासाठी शिक्षकांची कसरत सुरू आहे. असाच प्रकार रोहणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडला. शाळेतील तांदूळ संपला. आज जेवणाचा दिवस कोरडा जाणार म्हणून ग्रामशिक्षण समितीच्या सदस्यांसह चिमुकल्यांवर बालकदिनी रिकाम्या ताट्या वाजविण्याची वेळ आली. तथापि, सरपंच नरेश ईश्वरकर देवदूत बनून आले अन् त्यांनी दोन दिवसाचे तांदूळ देऊन ते या बालकांचे ‘चाचा’ बनले.शालेय पोषण आहारातील तेल अन् मीठही संपले. तरीही विद्यार्थ्यांना खाऊ घाला. कोणताही खंड पडू देऊ नका, १५ दिवसानंतर शासनस्तरावरून केली जाईल. किमान १५ दिवस तरी विद्यार्थ्यांना उपाशी ठेऊ नका, असे मोहाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून ६ सप्टेंबर रोजी मुख्याध्यापकाचा सभेत सांगण्यात आले होते. दोन महिने होऊनही ना तांदूळ ना अन्य साहित्य शाळांना मिळाला नाही. ज्या शाळांनी धान्यादी माल घेतले त्याचे बिलही देण्यात आले नाही. त्यामुळे हा संताप व्यक्त होत असताना रोहणा जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत एक महिन्यापासून तांदूळ संपले आहे. याची कल्पना मुख्याध्यापकांनी प्रशासनाला दिली. मुख्याध्यापकांनी उसणवार धान्य स्वस्त धान्य दुकानातून घेतले. परंतु असे उसणवार धान्य कुठवर द्यायचे, आपले उसणवार धान्य परत मिळणार कधी? या शंकेने धान्य दुकानदारांनी तांदूळ देणे बंद केले. आज भात शिजणार नाही. मुले उपाशी राहतील म्हणून ग्रामशिक्षण समितीचे दोन सदस्य शाळेत गेले. मुलेही वर्गाबाहेर आले. त्यानंतर मुलांनी ताटया वाजवा आंदोलन केले. आज बालकदिनी रिकाम्या ताटया वाजविण्याची वेळ प्रशासनाने मुलांवर आणली. सोमवारलाच सरपंच नरेश ईश्वरकर यांनी रोहणा ग्रामपंचायतचा कार्यभार स्वीकारला. त्यांनी मंगळवारला सकाळी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता विद्यार्थी रिकाम्या ताटया वाजवित असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे गावातील मुले उपाशी राहू नये म्हणून सरपंच ईश्वरकर यांनी दोन दिवसाचे तांदूळ शाळेत पुरविले. माध्यान्हानंतर मुलांना अन्न खाऊ घालण्यात आले. बालकदिनी सरपंच नरेश ईश्वरकर हे त्या शाळेतील बालकांचे ‘चाचा’ ठरले. यापूर्वी उपसरपंच असताना त्यांनी त्या शाळेला माध्यान्ह भोजनासाठी ५० किलो तांदूळ पुरविले होते. धान्य शाळेत नाही याबाबत मुख्याध्यापक प्रकाश महालगावे यांनी शिक्षण विभागाच्या प्रशासनाला कळविले होते. आजही त्यांनी गटशिक्षणाधिकाºयांना पत्र दिले. प्रत्येक शाळेत धान्याचा साठा संपला आहे. आपल्या खिशातून पैसे खर्च करणाºया मुख्याध्यापकांना दैनंदिन भोजन देण्यासाठी संकटाचा सामना करावा लागत आहे.बालकांना उपाशी ठेवण्याचे कारस्थान शासनाकडून सुरू आहे. दोन्ही बाजूने मुख्याध्यापक पिळला जात आहे. शासनाचे हेच ‘अच्छे दिन’ का?. धान्याची व्यवस्था प्रशासनाने तातडीने करावी.- नरेश ईश्वरकर,सरपंच, ग्रा.पं. रोहणा.