शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

आला पावसाळा आता आपले आरोग्य सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST

बॉक्स रस्त्यावरील अन्न खाणे शक्यतो टाळा अनेकदा रस्त्यावरील वडापाव, समोसे, तळलेले पदार्थ, मिठाई, चीज, पनीरसोबतच मांसाहारी पदार्थ खाणे शक्‍यतो ...

बॉक्स

रस्त्यावरील अन्न खाणे शक्यतो टाळा

अनेकदा रस्त्यावरील वडापाव, समोसे, तळलेले पदार्थ, मिठाई, चीज, पनीरसोबतच मांसाहारी पदार्थ खाणे शक्‍यतो टाळावे. हे पावसाळ्यात टाळण्यासाठीच आपल्या पूर्वजांनी चातुर्मासाची संकल्पना पुढे आणली. श्रावण महिन्यात मांसाहार न करण्याची पद्धत यातूनच रूढ झाली आहे. याचा बारकाईने विचार केल्यास जड अन्न न खाता पचनास हलके तसेच उपवासाच्या निमित्ताने कमी करण्याचा संदेश दिला आहे.

बॉक्स

पावसाळ्याच्या दिवसात हे खाणे टाळावे...पावसाळ्यात विशेषत; रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ तसेच मीठ जास्त असलेले पदार्थ सॉफ्टड्रिंक, थंड पेय, चायनीज सारखे पदार्थ खाणे हे शरीरासाठी केव्हाही घातकच ठरते. यातूनच आपण आजाराला आमंत्रण देत असतो. यासोबतच पावसाळ्यात तेलकट पदार्थ खाण्यावर नियंत्रण हवे. पावसाळ्यात आपला जठराग्नी मंद होतो. म्हणूनच या काळात कमी आहार करणे गरजेचे असते. पचन संदर्भातील आजार टाळण्यासाठी काळजी घेतली पाहिजे.

बॉक्स

पावसाळ्याच्या दिवसात हे खावे...

पावसाच्या दिवसात आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, यासाठी संध्याकाळी लवकर जेवावे. त्यामुळे पचन सुलभ होते. विशेषत: आहारामध्ये जांभळे, मक्याचे भुट्टे, रानभाज्या, घरचे जेवणात वरण-भात-भाजी-पोळी, ताजे अन्न नक्कीच सुरक्षित. सोबतच पोळी, भाकरी, थालीपीठ, पराठे जास्त खावेत. नाचणी, शिंगाडा, हातसडीचा तांदूळ याचाही आहारामध्ये समावेश करता येईल.

कोट

प्रतिकारशक्ती व पचनसंस्थेची ताकद वाढविणारे अन्नपदार्थ पावसाळ्यात नेहमीच उपयुक्त ठरतात. पावसाळ्यात आल्याचा चहा किंवा दुधात हळद घालून घेणे हे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. या काळात आहार कमीच घ्यायला हवा.

डॉ.दिलीप गिऱ्हेपुंजे,

तज्ज्ञ

कोट

भंडारा जिल्हा हा नैसर्गिक विपुलतेने समृद्ध आहे. जिल्ह्यात पावसाळ्यात शेतशिवारात अनेक रानभाज्या सहज उपलब्ध होतात. यातून शरीराला आवश्यक घटक मिळत असल्याने नागरिकांनी आवर्जून रानभाज्या खाणे गरजेचे आहे. यातून शेतकऱ्यांना रोजगारही मिळू शकतो.

मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.