शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

क्षमतेनुसार भात शेतीला सिंचन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:53 IST

पेंच पेकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्यात आले तर टेलपर्यंत पाणी दोन दिवसात पोहचणे शक्य आहे. तसेच पेंचचे पाणी वितरण करण्यासाठी कामगार व पोलीस यंत्रणा लावण्यात यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.

ठळक मुद्देपत्रकार परिषद : ७२५ क्युसेक पाणी सोडण्याची किसान सभेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : पेंच पेकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्यात आले तर टेलपर्यंत पाणी दोन दिवसात पोहचणे शक्य आहे. तसेच पेंचचे पाणी वितरण करण्यासाठी कामगार व पोलीस यंत्रणा लावण्यात यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.टेल टू हेड या नियमाप्रमाणे पाणी सोडण्या तयावे या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने पाच दिवसापासून तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या उपोषण सुर ुआहे. उपोषण दरम्यान पेंच प्रकल्पाचे जबाबदार अधिकाºयांनी उपोषण कर्त्यांना भेट दिली नाही. उलट पेंच कार्यालयाचा चतुर्थ कर्मचारी पाठवून शेतकºयांची टिंगल केली. पेंच प्रकल्पाचे २० सप्टेंबर रोजी पाणी सोडण्यात आले तरी शेवटच्या लाभक्षेत्रात दोन दिवसात पाणी पोहचेल या विषयी साशंकता व्यक्त केली.त्यासाठी मोहाडी सहकारी खरेदी विक्री समिती मोहाडीच्या सभागृहात किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेला माधवराव बांते, मणिकराव कुकडकर, डॉ. प्रा. सुनिल चवळे, नितीन मोहारे, राजु उपरकर, जयप्रकाश मसर्के उपस्थित होते. पेंच प्रकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्याची मागणी करण्यात आली. पेंच कडून कालव्यात ७२५ क्युसेक पाणी सोडला पाहिजे. पण ५०० व त्यापेक्षा कमी क्युसेक पाणी सोडला जातो. त्यामुळे पाणी लवकर मिळत नाही.तसेच टेल टू हेड या नियमाने कधी पाण्याचे वितरण केले जात नाही. शेवटच्या टोकावर दोन दिवसात पाणी पोहचण्यासाठी पेंच प्रशासन व पाणी वापर संस्थेने कामगार व पोलीस यंत्रणा लावली तरच योग्यवेळी पाणी मिळेल. अन्यथा असेच ढिसाळ व्यवस्थापन राहिले तर शेवटच्या टोकावर पाणी येण्यासाठी पंधरा दिवसाची शेतकºयांना प्रतिक्षा करावी लागेल. अशी शंका किसान सभेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. तोपर्यंत धानाचे गर्भ आटून उत्पादनावर परिणाम पडण्याची शक्यता असल्याचे ही सांगण्यत आले.पेंच प्रशासनाने शेवटच्या टोकापर्यंत कधी पाणी येईल याची तारीख लेखी कळवावे. अन्यथा आता शेतकरी उपोषण करण्यासोबतच तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचाही इशारा किसान सभेच्यावतीने देण्यात आला. किसान सभेचा आंदोलन आजही सुरुच आहे. वाल्मीक मुटकुरे, बंडू पापडकर वसंता कस्तुरे उपोषणावर बसली आहेत. दरवर्षी दुरुस्तीच्या नावावर पैसा जातो. कुठे असा सवाल करीत कालव्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. याची चौकशी व्हावी अशी मागणी किसान सभेने पत्रकार परिषदेत केली. पेंच प्रकल्पाचे पाणी हेक्टर कार्यक्षेत्रानुसार सोडण्यात आले तर सिंचनासाठी वेळ लागणार नाही, असेही किसान सभेने म्हटले आहे.

टॅग्स :agricultureशेती