शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

क्षमतेनुसार भात शेतीला सिंचन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:53 IST

पेंच पेकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्यात आले तर टेलपर्यंत पाणी दोन दिवसात पोहचणे शक्य आहे. तसेच पेंचचे पाणी वितरण करण्यासाठी कामगार व पोलीस यंत्रणा लावण्यात यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.

ठळक मुद्देपत्रकार परिषद : ७२५ क्युसेक पाणी सोडण्याची किसान सभेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : पेंच पेकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्यात आले तर टेलपर्यंत पाणी दोन दिवसात पोहचणे शक्य आहे. तसेच पेंचचे पाणी वितरण करण्यासाठी कामगार व पोलीस यंत्रणा लावण्यात यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.टेल टू हेड या नियमाप्रमाणे पाणी सोडण्या तयावे या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने पाच दिवसापासून तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या उपोषण सुर ुआहे. उपोषण दरम्यान पेंच प्रकल्पाचे जबाबदार अधिकाºयांनी उपोषण कर्त्यांना भेट दिली नाही. उलट पेंच कार्यालयाचा चतुर्थ कर्मचारी पाठवून शेतकºयांची टिंगल केली. पेंच प्रकल्पाचे २० सप्टेंबर रोजी पाणी सोडण्यात आले तरी शेवटच्या लाभक्षेत्रात दोन दिवसात पाणी पोहचेल या विषयी साशंकता व्यक्त केली.त्यासाठी मोहाडी सहकारी खरेदी विक्री समिती मोहाडीच्या सभागृहात किसान सभेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेला माधवराव बांते, मणिकराव कुकडकर, डॉ. प्रा. सुनिल चवळे, नितीन मोहारे, राजु उपरकर, जयप्रकाश मसर्के उपस्थित होते. पेंच प्रकल्पाचे पाणी आराखडा क्षमतानुसार सोडण्याची मागणी करण्यात आली. पेंच कडून कालव्यात ७२५ क्युसेक पाणी सोडला पाहिजे. पण ५०० व त्यापेक्षा कमी क्युसेक पाणी सोडला जातो. त्यामुळे पाणी लवकर मिळत नाही.तसेच टेल टू हेड या नियमाने कधी पाण्याचे वितरण केले जात नाही. शेवटच्या टोकावर दोन दिवसात पाणी पोहचण्यासाठी पेंच प्रशासन व पाणी वापर संस्थेने कामगार व पोलीस यंत्रणा लावली तरच योग्यवेळी पाणी मिळेल. अन्यथा असेच ढिसाळ व्यवस्थापन राहिले तर शेवटच्या टोकावर पाणी येण्यासाठी पंधरा दिवसाची शेतकºयांना प्रतिक्षा करावी लागेल. अशी शंका किसान सभेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. तोपर्यंत धानाचे गर्भ आटून उत्पादनावर परिणाम पडण्याची शक्यता असल्याचे ही सांगण्यत आले.पेंच प्रशासनाने शेवटच्या टोकापर्यंत कधी पाणी येईल याची तारीख लेखी कळवावे. अन्यथा आता शेतकरी उपोषण करण्यासोबतच तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचाही इशारा किसान सभेच्यावतीने देण्यात आला. किसान सभेचा आंदोलन आजही सुरुच आहे. वाल्मीक मुटकुरे, बंडू पापडकर वसंता कस्तुरे उपोषणावर बसली आहेत. दरवर्षी दुरुस्तीच्या नावावर पैसा जातो. कुठे असा सवाल करीत कालव्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. याची चौकशी व्हावी अशी मागणी किसान सभेने पत्रकार परिषदेत केली. पेंच प्रकल्पाचे पाणी हेक्टर कार्यक्षेत्रानुसार सोडण्यात आले तर सिंचनासाठी वेळ लागणार नाही, असेही किसान सभेने म्हटले आहे.

टॅग्स :agricultureशेती