शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जलसिंचन प्रकल्प भंगारात

By admin | Updated: May 18, 2014 23:22 IST

नियोजन आणि निधीअभावी शेतकर्‍यांनी स्थापन केलेला बपेरा व पिपरी (चुन्ही) येथील महत्त्वाकांक्षी जय किसान जलसिंचन प्रकल्प भंगारात निघाला आहे.

 चुल्हाड/सिहोरा : नियोजन आणि निधीअभावी शेतकर्‍यांनी स्थापन केलेला बपेरा व पिपरी (चुन्ही) येथील महत्त्वाकांक्षी जय किसान जलसिंचन प्रकल्प भंगारात निघाला आहे. वैनगंगा नदीपात्रात पाण्याची साठवणूक करण्यात आल्याने हा प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. सिहोरा परिसरात शेतीला सिंचित करणारा विस्तीर्ण चांदपूर जलाशय आहे. या जलाशयाचे पाणी टेलवर असलेल्या शेतीला पोहोचत नाही. ही समस्या आणि अडचण गेल्या अनेक वर्षापासून आहे. यामुळे टेलवर असलेली शेती जलाशयाच्या पाण्याने ओलिताखाली आणताना यंत्रणेला कसरत करावी लागते. खरीप हंगामात पाण्याची समस्या राहत नाही. परंतु, रबी हंगामात जलाशयाचे पाणी प्राप्त होणार किंवा नाही याची कल्पना शेतकरी करीत नाही. टेलवर असलेल्या शेतकर्‍यांना सुजलाम्-सुफलाम् करताना अडचणीचा सामना करावा लागतो. हे यंत्रणाही नाकारत नाही. परंतु पाणी पोहोचविण्याचा पर्याय नाही. ही गेल्या अनेक वर्षांपासून समस्या असताना प्रश्न निकाली निघणार नाही. म्हणून बपेरा आणि पिपरी चुन्ही गावातील काही वर्षापूर्वी शेतकर्‍यांनी संयुक्त गट तयार केला. गावात सहकारी संस्था स्थापन केली. जय किसान जल सिंचन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. शासन आणि शासकीय निधी प्राप्त करण्याचा यात संबंध नव्हता. या प्रकल्पाचे चालक आणि मालक हे शेतकरी होते. प्रकल्प उभारण्यासाठी शेतकर्‍यांनी गुंतवणूक केली. बपेराच्या प्रकल्पाला देवसर्रा, बपेरा, सुकळी (नकुल), गोंडीटोला ही गावे जोडण्यात आली. बपेरा गावानजीक वैनगंगा नदीवर शेतकर्‍यांच्या गुंतवणुकीतून प्रकल्प तयार करण्यात आला. या प्रकल्पाचे कालवे तयार करण्यात आले. या प्रकल्पाच्या पाण्याने शेतकरी समाधानी होते. टेलवर प्रकल्पाने उपसा करण्यात आलेले पाणी पोहोचत होते. परंतु मध्यंतरी या प्रकल्पाला अखेरची घरघर लागली. लाखोचे वीज बिल थकल्याने प्रकल्प बंद करण्यात आला आहे. शेतकर्‍यांचा संयुक्त गट सैरावैरा झालेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प बंद आहेत. शेतकर्‍यांनी स्थापन केलेला प्रकल्प भांगारात निघाला आहे. प्रकल्प उभा असला तरी साहित्य चोरीला गेली आहेत. प्रकल्प आणि कालवे आजही शाबूत आहेत. वीज जोडणी उभी आहे. प्रकल्पस्थळात सर्वकाही जसेच्या तसे आहे. प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. दरम्यान, हे प्रकल्प बंद झाले असता पाटबंधारे विभागाने संलग्नित शेतीला चांदपूर जलाशयाला सिंचनासाठी जोडली आहेत. शेतकर्‍यांचे करारनामे केली आहे. परंतु आजही टेलवर पाणी पोहोचत नाही, अशी समस्या आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी नियोजनाची गरज आहे. कवलेवाडा, मांडवी गावानजीक धरण बांधकामात पाणी अडविण्यात आल्याने नदी पात्रात पाणी आहे. विजेची समस्या निकाली काढून यंत्राची दुरुस्ती करण्याची गरज आहे. शासनाने हे दोन्ही प्रकल्प ताब्यात घेऊन विकसित करण्यासाठी पुढाकार घेण्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहे. राज्य शासनाने या प्रकल्पाला पुनर्जीवित केल्यास रबी हंगामात पाणी वाटप करताना रोटेशन पद्धतीला तिलांजली मिळेल. संपूर्ण परिसरात शेतकर्‍यांच्या शेतीला पाणी वाटप करण्यासाठी दोन्ही प्रकल्प रामबाण ठरणार आहेत. अशा शेतकर्‍यांच्या प्रतिक्रिया आहेत. (वार्ताहर)