शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अनियमित देयक वाटपाचा ग्राहकांना फटका

By admin | Updated: November 6, 2015 02:04 IST

वेळेच्या आत वीज देयक देण्याचा शिरस्ता महावितरण कंपनीत असल्याचा दावा करण्यात येतो, परंतु मागील काही

मोहन भोयर ल्ल तुमसर वेळेच्या आत वीज देयक देण्याचा शिरस्ता महावितरण कंपनीत असल्याचा दावा करण्यात येतो, परंतु मागील काही महिन्यापासून महावितरणच्या वीज देयक वितरणात अनियमितता दिसून येत आहे. वीज ग्राहकांवर यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे. संगणकीय युगात महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.वीज आज प्रत्येकाची गरज झाली आहे. नवीन नियमानुसार सर्वसामान्य वीज ग्राहक दर महिन्याला आलेले देयक जबाबदारीने भरण्याचा प्रयत्न करतो, परंतु वीज ग्राहकाच्या हातात वेळेच्या आत वीज देयक मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हाभरातून आहेत. हा क्रम मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे. परंतु त्याच्यावर महावितरणने अजूनपर्यंत तोडगा काढला नाही.जिल्हास्तरावर महावितरणने एक मुख्य वीज वितरकाची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून तालुक्याच्या स्थळी वीज देयके संबंधित कार्यालयात पाठविण्यात येतात. नंतर तालुक्यातील वितरक घरोघरी जाऊन वीज देयके वितरीत करतात. सध्या प्रत्येक महिन्याला वीज बिल येत आहे. यापूर्वी तीन महिने, नंतर दोन महिने व एका महिन्याचे वीज देयके महावितरण देत आहे.मिटर रिडींग घेणे, ती कार्यालयाकडे पाठविणे, कार्यालयीन कामे पार पडल्यानंतर प्रिंटींग करणे, नंतर जिल्हास्तरावरून ते वितरीत करणे याकरिता बराच अवधी लागतो. यामुळे वीज ग्राहकांना वेळेवर वीज देयक मिळत नाही. दिलेल्या तारखेनंतर वीज देयक भरल्यास ग्राहकाला फाईन भरावे लागते. त्याचा आर्थिक भुर्दंड वीज ग्राहकांना सहन करावा लागतो. ग्राहकाला वेळेत वीज देयक देण्याची काळजी येथे घेतली जात नाही असे दिसते.तुमसर शहर, देव्हाडी परिसर, सिहोरा तथा नाकाडोंगरी परिसरात नित्यनियमनाने उशिरा वीज देयके देण्यात येत आहेत. तुमसर शहराकरिता किमान तीन ते चार वितरक नियुक्त करण्याची गरज आहे. महावितरण येथे गंभीर दिसत नाही.कृषी वीज पंपधारक ग्राहकांना सरासरी वीज देयके पाठविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मिटर रिडींग घेतली जात नाही. शेतकऱ्यांचे घर सहसा वीज बिल वितरकांना माहिती होत नाही. याचा फटकाही कृषी पंपधारक शेतकऱ्यांना बसतो. तीन एचपी तथा पाच एचपी कृषी पंपधारकांना सारखेच वीज देयक देणे सुरु असल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी मुळ वीज वितरण कंपनीचे कर्मचारी कामे करीत नाहीत. तर त्यांची कामे भाडे तत्वावर दुसरेच करीत असल्याचे समजते. वीज चोरी रोखण्याकरिता महावितरणने भरारी पथकाची नेमणूक केली आहे. ही अभिनंदनाची बाब आहे. परंतु मूलभूत समस्या कायमस्वरुपी केव्हा दूर होणार असा प्रश्न हजारो वीज ग्राहकांना पडला आहे. संगणकीय युगात समस्या दूर होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते.तुमसर शहर तथा ग्रामीण परिसरात वीज देयके ग्राहकांना वेळेवर मिळत नाही. याबाबत जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.- नंदलाल गडपायलेउपविभागीय अभियंतामहावितरण, तुमसर.