शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

रस्त्यावरील खड्डे देताहेत मृत्युला आमंत्रण

By admin | Updated: April 2, 2015 00:53 IST

गंतव्य स्थानावर जाण्याकरिता सुरक्षित मार्गाची निवड सामान्य नागरिक करतात.

तुमसर : गंतव्य स्थानावर जाण्याकरिता सुरक्षित मार्गाची निवड सामान्य नागरिक करतात. मागील तीन वर्षात या तालुक्यातील ४९ मोटारसायकल स्वारांना आपल्या प्राणास मुकावे लागले हे धक्कादायक तितकीच वास्तव स्थिती समोर आली आहे. येथे रस्ते आहेत की ते मृत्यू मार्गावरील द्वार आहे, असे म्हणते वावगे ठरणार नाही. मात्र या सर्व प्रकाराला रस्त्यवरील खड्डे कारणीभूत आहेत. या अपघातात बहुतांश दुचाकी स्वार मृत्यूमुखी पडले आहेत.तुमसर तालुक्यातील विविध रस्त्यावर सन २०१३ मध्ये एकूण २६, सन २०१४ मध्ये १८ व फेब्रुवारी २०१५ मध्ये ३ व मार्च महिन्यात दोघांचा अपघातात मृत्यू झाला. यासर्व अपघातांची माहिती प्राप्त केली असता त्यांच्या डोक्याला व छातीला मुका मार लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे.या मृतांमध्ये शहरी व ग्रामीण भागातील युवकांची संख्या असून त्यात दुचाकीस्वारांची संख्या जास्त आहे. काही अपघातात मद्य प्राशन हे एक मुळ कारण आहे. काही अति भरधाव वेगाने गाडी चालविणे तर काही ठिकाणी जनावरे आडवे आल्याने अपघात घडला आहे. बहुतेक कुटूंबातील कर्ते पुरूष या अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. काही कुटूंबातील एकुलता मुलगा मृत्यूमुखी पडला आहे. गंभीर जखमी व किरकोळ जखमींची संख्या २०० च्या वर आहे. डोक्याला इजा होवू नये याकरिता अपघातग्रस्तांनी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केला असता तर हा आकडा ५ ते ७ वर इतका खाली घसरला असता, असे पोलीस तथा डॉक्टरांचे म्हणने आहे.अपघातात सतत वाढ होणे याचा गृहमंत्रालय सध्या गांभीर्याने अभ्यास करीत असून पुढील काळात हेलमेट सक्तीने करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)