शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर - कटंगी राज्यमार्गावरील खड्डे देताहेत अपघातांना आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 21:31 IST

तुमसर-कटंगी राज्यमार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाल्याने अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे संबधिताचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : किरकोळ अपघातांची मालीका सुरुच, नागरिकांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनाकाडोंगरी : तुमसर-कटंगी राज्यमार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाल्याने अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे संबधिताचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.तुमसर - कटंगी राज्यमार्गावर नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ असते. राज्यमार्गाला लागूनच असलेल्या चिखला, डोंगरी(बूज) व सीतासांवगी मॉइल असल्यामुळे त्यात आणखीच भर पडते, मोठ्या प्रमाणावर जड वाहन सतत ये -जा करीत असल्यामुळे या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात गोबरवाही रेल्वे स्थानकापासून तर नाकाडोंगरीपर्यंतच्या रस्त्याची अवस्था दयनीय अवस्था झाली आहे, जागोजागी रस्त्याच्या मधोमध मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सुंदरटोला येथे भर चौकात रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे अनेक दुचाकीस्वार पडून त्यांना दुखापत झाली, असेच अपघात त्या खड्ड्याच्या ठिकाणी नेहमी होतच असतात. राजापूर - नाकाडोंगरी या दरम्यान असलेल्या पुलाच्या कडेला मोठा खड्डा पडला आहे. तो खड्डा दुरून दिसत नाही पण खड्ड्याच्या जवळ गेल्यावरच तो दिसतो. तो पर्यंत खूप वेळ निघून गेलेली असते. अचानक एवढा मोठा खड्डा पाहून गाडी चालक भांबावतो. वाहणावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होत आहे. अपघातात वाहन चालकास आपला जीवही गमवावा लागू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता बांधकाम व दुरुस्तीसंबधी बांधकाम विभागाचे नेहमीच दुर्लक्ष केली जात आहे. यापुर्वी खड्ड्यांची डागडूजी करण्यात आली. मात्र महिन्याभरात रस्त्याची पुन्हा दयनीय अवस्था झाली आहे. संबंधीत विभागाने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.