शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

पवनारा पूल देतोय अपघातास आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 21:50 IST

तुमसर - कटंगी (बालाघाट) आंतराज्यीय मार्गावरील पवनारा शिवारातील पूल धोकादायक ठरत असून आतापर्यंत येथे अनेक अपघात घडले आहेत. दोन दिवसापूर्वी सदर पूलाजवळ कोळसा वाहून नेणारा ट्रक उलटला होता. जुन्या पूलाजवळच नवीन पूल समांतर बांधला आहे. नवीन पूलावर प्रवेश करताना रस्त्यावर खचका पडला आहे. वळणमार्गावर पूल असल्याने काही वाहने जुन्या पूलाच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे येथे अपघातात वाढ होत आहे.

ठळक मुद्देवळणमार्गावरील पूल : ब्रिटीशकालीन पूल पाडले, जुने पोचमार्ग धोकादायक
<p>लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर - कटंगी (बालाघाट) आंतराज्यीय मार्गावरील पवनारा शिवारातील पूल धोकादायक ठरत असून आतापर्यंत येथे अनेक अपघात घडले आहेत. दोन दिवसापूर्वी सदर पूलाजवळ कोळसा वाहून नेणारा ट्रक उलटला होता. जुन्या पूलाजवळच नवीन पूल समांतर बांधला आहे. नवीन पूलावर प्रवेश करताना रस्त्यावर खचका पडला आहे. वळणमार्गावर पूल असल्याने काही वाहने जुन्या पूलाच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करतात. यामुळे येथे अपघातात वाढ होत आहे.आंतरराज्यीय मार्ग हा वर्दळीचा असून पवनारा शिवारातील पूलाजवळ सतत अपघातात वाढ होत आहे. अपघात प्रवणस्थळ म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे. ब्रिटीशकालीन पूल येथे यापूर्वी होता. आयुष्य संपल्याने येथे नवीन पूल तयार करण्यात आला. जुने पूल त्यानंतर पाडण्यात आले. परंतु जुन्या पूलांचे पोचमार्ग मात्र तसेच ठेवण्यात आले. दोन्ही मार्गावर डांबरीकरण असल्याने भरधाव वाहने जुन्या पोचमार्गावरूनच जातात. अचानक त्यांना रस्ता बंद दिसतो. यामुळे वाहने अनियंत्रित होवून अपघाताची येथे शक्यता बळावली आहे. नवीन पूलावर प्रवेश करताना दोन्ही बाजूला मोठे खचके पडले आहेत. भरधाव वाहने या खचक्यातून उसळी घेतात. येथे वाहने अनियंत्रित होवून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. रस्ता व पूल एकमेकास समांतर करण्याची गरज येथे आहे. दोन्ही बाजूच्या डांबरी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी डांबरीकरण उखडले आहे. वळणमार्गावरील पोचमार्ग (पूल) दुरुस्ती करण्याची गरज आहे. वळणावर पूल असल्याने तो धोकादायक ठरू नये, याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी घेण्याची गरज आहे.पवनारा शिवारातील पुलाच्या पोचमार्गावर खचके पडले असून ते धोकादायक आहे. जुने पुल पाडल्यानंतर जुना पोचमार्गही उध्वस्त करण्याची गरज होती. पोचमार्गाच्या दोन्ही बाजूला सूचना फलक लावण्याची गरज आहे. येथे नेहमीच अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे.-संगीता सोनवानेजिल्हा परिषद सदस्य, चिखला