शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

बिबट मृत्युप्रकरणाचा तपास थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:11 IST

विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याला राष्ट्रीय महामार्गाजवळ फेकून दिल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या घटनेला दोन आठवडे लोटूनही यातील आरोपींपर्यंत वन विभाग पोहचू शकले नाही.

ठळक मुद्देआरोपी मोकाटच : वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याला राष्ट्रीय महामार्गाजवळ फेकून दिल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या घटनेला दोन आठवडे लोटूनही यातील आरोपींपर्यंत वन विभाग पोहचू शकले नाही. एकामागोमाग वन्यप्राण्यांचा जीव जात असताना त्यातील दोषींना पाठीशी घातले जात असल्याने वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.११ एप्रिल रोजी पलाडी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला एक बिबट मृतावस्थेत आढळून आला होता. बिबट्याची तपासणी केली असता त्याच्या पायाला मोठे व्रण असल्याचे दिसून आले. तसेच बिबट्याने जिवंत तार तोंडात घेतल्याने त्याची जीभ जळाल्याचे आढळून आले. उर्वरित सर्व अवयव शाबूत होते. त्यामुळे विजेच्या धक्कयाने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. शिवाय ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून बिबट्याचा अपघाती मृत्यू दाखविण्यासाठी त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला आणून फेकण्यात आले होते. ही अत्यंत गंभीर बाब असून घटनेच्या दोन आठवड्यानंतरही वन विभाग आरोपींपर्यंत पोहचू शकले नाही.ज्याठिकाणी बिबट मृतावस्थेत आढळले त्याच परिसरात त्याचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. घटनेनंतर वन विभागाने चौकशी केली असता त्यांना अद्याप काहीही आढळून आले नाही. वन विभागाला आरोपींचा ठावठिकाणा माहित आहे, परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप आता होत आहे. एकीकडे वन आणि वन्यजीव यांच्या संर्वधनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना दुसरीकडे वन्यप्राण्यांचे असे हकनाक बळी जात आहेत. शिवाय त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांचा शोधही घेतला जात नसल्याने वन्यप्रेमींमध्ये असंतोष निर्माण होत आहे.'जय' नंतर 'जयचंद'ही बेपत्ताउमरेड-कºहांडला अभयारण्यातील रुबाबदार असा जय (टी १) नावाचा वाघ दोन वर्षांपासून अचानक बेपत्ता असताना आता त्याचा अपत्य 'जयचंद' (टी ५) हा वाघही बेपत्ता आहे. तो अभयारण्य सोडून दुसऱ्या जंगलात गेल्याचीही कुठे नोंद नाही. सातत्याने वन्यप्राण्यांच्या शिकारी होणे, बेपत्ता होण्याचे प्रकार वाढत असताना वन विभाग नेमका करतोय तरी काय? असा प्रश्न आहे. जय नंतर जयचंदने पर्यटकांना भूरळ घातली होती.

टॅग्स :Tigerवाघ