शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

बिबट मृत्युप्रकरणाचा तपास थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:11 IST

विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याला राष्ट्रीय महामार्गाजवळ फेकून दिल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या घटनेला दोन आठवडे लोटूनही यातील आरोपींपर्यंत वन विभाग पोहचू शकले नाही.

ठळक मुद्देआरोपी मोकाटच : वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याला राष्ट्रीय महामार्गाजवळ फेकून दिल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या घटनेला दोन आठवडे लोटूनही यातील आरोपींपर्यंत वन विभाग पोहचू शकले नाही. एकामागोमाग वन्यप्राण्यांचा जीव जात असताना त्यातील दोषींना पाठीशी घातले जात असल्याने वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.११ एप्रिल रोजी पलाडी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला एक बिबट मृतावस्थेत आढळून आला होता. बिबट्याची तपासणी केली असता त्याच्या पायाला मोठे व्रण असल्याचे दिसून आले. तसेच बिबट्याने जिवंत तार तोंडात घेतल्याने त्याची जीभ जळाल्याचे आढळून आले. उर्वरित सर्व अवयव शाबूत होते. त्यामुळे विजेच्या धक्कयाने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. शिवाय ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून बिबट्याचा अपघाती मृत्यू दाखविण्यासाठी त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला आणून फेकण्यात आले होते. ही अत्यंत गंभीर बाब असून घटनेच्या दोन आठवड्यानंतरही वन विभाग आरोपींपर्यंत पोहचू शकले नाही.ज्याठिकाणी बिबट मृतावस्थेत आढळले त्याच परिसरात त्याचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. घटनेनंतर वन विभागाने चौकशी केली असता त्यांना अद्याप काहीही आढळून आले नाही. वन विभागाला आरोपींचा ठावठिकाणा माहित आहे, परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप आता होत आहे. एकीकडे वन आणि वन्यजीव यांच्या संर्वधनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना दुसरीकडे वन्यप्राण्यांचे असे हकनाक बळी जात आहेत. शिवाय त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांचा शोधही घेतला जात नसल्याने वन्यप्रेमींमध्ये असंतोष निर्माण होत आहे.'जय' नंतर 'जयचंद'ही बेपत्ताउमरेड-कºहांडला अभयारण्यातील रुबाबदार असा जय (टी १) नावाचा वाघ दोन वर्षांपासून अचानक बेपत्ता असताना आता त्याचा अपत्य 'जयचंद' (टी ५) हा वाघही बेपत्ता आहे. तो अभयारण्य सोडून दुसऱ्या जंगलात गेल्याचीही कुठे नोंद नाही. सातत्याने वन्यप्राण्यांच्या शिकारी होणे, बेपत्ता होण्याचे प्रकार वाढत असताना वन विभाग नेमका करतोय तरी काय? असा प्रश्न आहे. जय नंतर जयचंदने पर्यटकांना भूरळ घातली होती.

टॅग्स :Tigerवाघ