शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

रखडलेल्या सौंदर्यीकरण कामांची चौकशी करा

By admin | Updated: May 19, 2016 00:30 IST

शहरातील सार्वजनिक व्यवस्था, सौंदर्यीकरण, वीज रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, बगीचे आदी अनेक प्रकारच्या सोयी सुविधा ....

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणीभंडारा : शहरातील सार्वजनिक व्यवस्था, सौंदर्यीकरण, वीज रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, बगीचे आदी अनेक प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही नगरपरिषदेची आहे. या सर्व बाबींमध्ये नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे, अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे अपयशीच ठरत आलेली आहे. असाच काहीसा प्रकार शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण करण्याच्या बाबतीत झालेला आहे. या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.मागील दोन महिन्यापुर्वीपासून शहरातील शास्त्री चौक, राजीव गांधी चौक या चौकांचे सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने ऐन चौकांच्या मध्ये मोठमोठे खड्डे खोदून, कॉलम उभे करून बांधकाम सुरू केले. बांधकाम कशाचे आहे, कोणत्या प्रकारे चौकांचे सौंदर्यीकरण करणार आहे, याची नगरपालिकातर्फे शहरातील जनतेलाच नव्हे तर त्या प्रभागातील नगरसेवकांना सुद्धा याची पुसटशीही कल्पना न देता बांधकाम सुरू केले. आमच्या प्रभागात आम्हाला न विचारता बांधकाम करता म्हणून काही नगर सेवकांनी सदर बांधकामाला विरोध केला. वास्तविक बघता शहरात काही विकास कामे करावयासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे, पदाधिकाऱ्यांकडे काही व्हीजन असणे आवश्यक आहे. परंतु मुळात व्हीजनच नसलेल्या, केवळ 'माल सुतोचाच नारा देणाऱ्या पालिकेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सौंदर्यीकरणाच्या नावावर काहीतरी उभे करायचे म्हणून बांधकाम सुरू केल्याचे निवेदनात नमूद आहे. हे बांधकाम दोन महिन्याहून अधिक काळापासून अर्धवट आहेत. या बांधकामाशेजारी पडलेल्या रेतीमुळे, विटांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. न.प. कार्यालयातून माहिती घेतली असता आता हे अर्धवट बांधकाम पाडून त्या ठिकाणी महापुरूषांचे पुतळे उभारणार असल्याचे कळले. ऐन चौकामध्ये असलेले पुतळे चौकामधून हटवून ते बाजूला करण्याचे आदेश न्यायालयाचे असताना न.प. चौकांमध्ये न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन महापुरूषांचे पुतळे उभारणार काय, त्यासाठी झालेले बांधकाम पुन्हा तोडून नव्याने बांधकाम करणार मग झालेल्या बांधकामाच्या खर्चाचे काय, असा सवाल करीत हा खर्च सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा, अशी मागणी उपजिल्हा प्रमुख संजय रेहपाडे, शहर प्रमुख नितीन साकुरे, सुरेश धुर्वे, विशाल लांजेवार, मुकेश थोटे, धनंजय धुळसे, रोशन कळंबे, मयुर लांजेवार, सुधीर उरकुडे, जयदेव गभने, दिनेश गजबे, पंकज दहिकर, संजय दमाहे आदींनी निवेदनातून केलेली आहे. (नगर प्रतिनिधी)