शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
4
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
5
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
6
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
7
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
8
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
9
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
10
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
11
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
12
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
13
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
14
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
15
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
16
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
17
कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
18
IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!
19
स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
20
"आम्हालाही अशा तंत्रज्ञानाची गरज," 'या' भारतीय अ‍ॅपचे फॅन झाले ब्रिटनचे पंतप्रधान

चांदपूर जलाशयात अवैध बोटींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:23 IST

भंडारा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तलाव म्हणून चांदपूर तलावाची नोंद आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या नियंत्रणात हा तलाव आहे. परंतु गत सहा महिन्यांपासून या तलावात अवैध बोटींग आणि मासेमारी सुरु आहे. यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आला आहे. सदर व्यवसायाला कुणाचे अभय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपर्यटकांचा जीव धोक्यात : आयुष्य संपलेली बोट, जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तलाव म्हणून चांदपूर तलावाची नोंद आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या नियंत्रणात हा तलाव आहे. परंतु गत सहा महिन्यांपासून या तलावात अवैध बोटींग आणि मासेमारी सुरु आहे. यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आला आहे. सदर व्यवसायाला कुणाचे अभय असा प्रश्न निर्माण झाला आहे.सातपुडा पर्वत रांगांत चांदपूर पर्यटन तथा प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. येथे मोठे जलाशय आहे. शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यानंतर ते पर्यटनासाठी चांदपूर जलाशयावर जातात. विस्तीर्ण जलाशयात सध्या बोटींग सुरु आहे. मात्र ही बोटींग अवैध असून प्रतिव्यक्ती ३० रुपये घेऊन जलसफर घडविली जाते. सुरक्षेची कोणतेही साधन नसताना धोकादायक पद्धतीने बोटींग करण्याचा गोरखधंदा सुरु आहे. या बोटीमध्ये लहान मुले, महिला, तरुण वर्ग सहभागी होतात. बोटींग करणाºयाला प्रशिक्षण नाही. बोटीचे आयुष्यही संपल्याची माहिती आहे. तलाव विस्तीर्ण असून खोल आहे. तलावाचा काही भाग उंच सखल आहे. त्यामुळे बोट खडकावर आदळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बोटीसोबत येथे अवैध मासेमारी सुरु आहे. मासेमारीचे कंत्राट संपल्याची माहिती आहे. परंतु राजरोसपणे मासेमारी केली जात आहे. स्थानिक कोळी बांधवांची त्यात कमी असून नागपूर येथील दलालांचा समावेश असल्याची माहिती आहे. मासेमारीत लाखोची उलाढाल होत आहे. सदर तलाव राज्यशासनाच्या जलसंपदा विभागाच्या नियंत्रणात असून तुमसर शहरात मुख्य कार्यालय आहे. मात या कार्यालयात शुकशुकाट राहत असल्याने कुणाचेही नियंत्रण दिसत नाही.सिहोरा ठाण्यात दिली होती तक्रारअवैध बोटींग प्रकरणी जलसंपदा विभागाने नोव्हेंबर महिन्यात सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु त्यानंतरही येथे अवैध बोटींग राजरोसपणे सुरु आहे. विशेष म्हणजे या बोटींग व्यवसायाला कुणाचे अभय आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हास्तरावरील संबंधित अधिकारी गप्प का आहेत हा प्रश्न कायम आहे. अपघातानंतर संबंधित विभागाला जाग येईल काय? असा प्रश्न विचारला जात आहे.