शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

अ वर्ग संस्थांचे धान खरेदी केंद्र बंद पाडण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST

लाखांदूर : जिल्ह्यातील अ-वर्ग संस्थांच्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत नियमित धान खरेदी सुरू असताना गत महिनाभरापूर्वी जिल्ह्यात ब ...

लाखांदूर : जिल्ह्यातील अ-वर्ग संस्थांच्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत नियमित धान खरेदी सुरू असताना गत महिनाभरापूर्वी जिल्ह्यात ब वर्ग संस्थांतर्गत धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. मात्र, सदर मंजुरी देताना अ वर्ग संस्थांचे केंद्र असलेल्या गावातच नियमबाह्यरीत्या नव्याने ब वर्ग संस्थांचे केंद्र सुरू करण्यात आल्याने अ वर्ग संस्थांचे आधारभूत केंद्र बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप करून जिल्हा मंडळाच्या तुघलकी कारभार विषयी शेतकरी जनतेत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामात लाखांदूर तालुक्यातील तीन अ वर्ग सहकारी संस्थांतर्गत जवळपास 14 आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू आहेत. सदर संस्थांतर्गत धान खरेदी सुरू असताना खरेदी प्रक्रियेत अधिक गती येण्यासाठी तालुक्यात काही खाजगी संस्थांना शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र चालविण्याची मंजुरी देण्यात आली. सदर मंजुरीनुसार संबंधित संस्था किमान ब वर्गातील असणे शिवाय तीन वर्षांचा अंकेक्षण झालेला असणे बंधनकारक करण्यात आले होते.

एवढेच नव्हे तर या संस्थांतर्गत नवीन धान खरेदी केंद्रांना मंजुरी देताना अ वर्ग संस्थांचे केंद्र असलेली गावे वगळता अन्य गावात धान खरेदी केंद्र सुरू करावयाचे होते. सदर अटी व शर्तीचे पालनात महाराष्ट्र राज्य को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या निर्देशानुसार जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी नव्या केंद्रांना मंजुरी द्यावयाची होती. मात्र, यासंबंधी नियमांची पायमल्ली करीत जिल्हा पणन मंडळांतर्गत तुघलकी कारभार करून चक्क यापूर्वी अ वर्ग संस्थांतर्गत केंद्र असलेल्या गावातच ब वर्ग संस्थांचे केंद्र सुरू करण्यात आल्याचा आरोप शेतकरी जनतेत केला जात आहे.

तथापि तालुक्यात नव्याने धान खरेदी केंद्रांची मंजुरी देण्यात आलेल्या संस्थांपैकी केवळ एक संस्था वगळता अन्य संस्थांना नियमबाह्य व बेकायदेशीररीत्या मंजुरी देण्यात आल्याची खळबळजनक व संतापजनक चर्चा शेतकरी जनतेत केली जात आहे.

दरम्यान, सदर संस्थांतर्गत तालुक्यातील काही गावात धान खरेदी केली जात असताना त्याच गावातील अ वर्ग संस्थांच्या केंद्रांना तब्बल पंधरवाड्यापासून बारदान्याचा पुरवठा न करण्यात आल्याने तालुक्यातील अधिकत्तम धान खरेदी केंद्र बंद पडल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि संबंधित केंद्र चालक संस्थांनी जिल्हा पणन मंडळाला बारदाना पुरवठा करण्याची वारंवार मागणी करूनदेखील केवळ नवीन केंद्रांना बारदाना पुरवठा करताना जुन्या केंद्रांकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करून सदर केंद्र बंद पाडण्याचा डाव असल्याचा जोरदार आरोप शेतकऱ्यांत केला जात आहे. सदर केंद्र मंजुरी व अन्य प्रक्रियेत येथील जिल्हा पणन मंडळांतर्गत प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची संशयास्पद चर्चादेखील केली जात आहे.

याप्रकरणी शासनाने तात्काल दखल घेऊन नियमबाह्य व बेकायदेशीररीत्या धान खरेदी केंद्रांना मंजुरी देतानाच अ वर्ग संस्थांचे केंद्र बंद पाडण्यासाठी तुघलकी कारभार करणाऱ्या जिल्हा पणन मंडळाच्या कारभाराची चौकशी करून दोषी विरोधात कठोर कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी जनतेत जोर धरत आहे.