शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अ वर्ग संस्थांचे धान खरेदी केंद्र बंद पाडण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST

लाखांदूर : जिल्ह्यातील अ-वर्ग संस्थांच्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत नियमित धान खरेदी सुरू असताना गत महिनाभरापूर्वी जिल्ह्यात ब ...

लाखांदूर : जिल्ह्यातील अ-वर्ग संस्थांच्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत नियमित धान खरेदी सुरू असताना गत महिनाभरापूर्वी जिल्ह्यात ब वर्ग संस्थांतर्गत धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. मात्र, सदर मंजुरी देताना अ वर्ग संस्थांचे केंद्र असलेल्या गावातच नियमबाह्यरीत्या नव्याने ब वर्ग संस्थांचे केंद्र सुरू करण्यात आल्याने अ वर्ग संस्थांचे आधारभूत केंद्र बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप करून जिल्हा मंडळाच्या तुघलकी कारभार विषयी शेतकरी जनतेत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामात लाखांदूर तालुक्यातील तीन अ वर्ग सहकारी संस्थांतर्गत जवळपास 14 आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू आहेत. सदर संस्थांतर्गत धान खरेदी सुरू असताना खरेदी प्रक्रियेत अधिक गती येण्यासाठी तालुक्यात काही खाजगी संस्थांना शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र चालविण्याची मंजुरी देण्यात आली. सदर मंजुरीनुसार संबंधित संस्था किमान ब वर्गातील असणे शिवाय तीन वर्षांचा अंकेक्षण झालेला असणे बंधनकारक करण्यात आले होते.

एवढेच नव्हे तर या संस्थांतर्गत नवीन धान खरेदी केंद्रांना मंजुरी देताना अ वर्ग संस्थांचे केंद्र असलेली गावे वगळता अन्य गावात धान खरेदी केंद्र सुरू करावयाचे होते. सदर अटी व शर्तीचे पालनात महाराष्ट्र राज्य को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या निर्देशानुसार जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी नव्या केंद्रांना मंजुरी द्यावयाची होती. मात्र, यासंबंधी नियमांची पायमल्ली करीत जिल्हा पणन मंडळांतर्गत तुघलकी कारभार करून चक्क यापूर्वी अ वर्ग संस्थांतर्गत केंद्र असलेल्या गावातच ब वर्ग संस्थांचे केंद्र सुरू करण्यात आल्याचा आरोप शेतकरी जनतेत केला जात आहे.

तथापि तालुक्यात नव्याने धान खरेदी केंद्रांची मंजुरी देण्यात आलेल्या संस्थांपैकी केवळ एक संस्था वगळता अन्य संस्थांना नियमबाह्य व बेकायदेशीररीत्या मंजुरी देण्यात आल्याची खळबळजनक व संतापजनक चर्चा शेतकरी जनतेत केली जात आहे.

दरम्यान, सदर संस्थांतर्गत तालुक्यातील काही गावात धान खरेदी केली जात असताना त्याच गावातील अ वर्ग संस्थांच्या केंद्रांना तब्बल पंधरवाड्यापासून बारदान्याचा पुरवठा न करण्यात आल्याने तालुक्यातील अधिकत्तम धान खरेदी केंद्र बंद पडल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि संबंधित केंद्र चालक संस्थांनी जिल्हा पणन मंडळाला बारदाना पुरवठा करण्याची वारंवार मागणी करूनदेखील केवळ नवीन केंद्रांना बारदाना पुरवठा करताना जुन्या केंद्रांकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करून सदर केंद्र बंद पाडण्याचा डाव असल्याचा जोरदार आरोप शेतकऱ्यांत केला जात आहे. सदर केंद्र मंजुरी व अन्य प्रक्रियेत येथील जिल्हा पणन मंडळांतर्गत प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची संशयास्पद चर्चादेखील केली जात आहे.

याप्रकरणी शासनाने तात्काल दखल घेऊन नियमबाह्य व बेकायदेशीररीत्या धान खरेदी केंद्रांना मंजुरी देतानाच अ वर्ग संस्थांचे केंद्र बंद पाडण्यासाठी तुघलकी कारभार करणाऱ्या जिल्हा पणन मंडळाच्या कारभाराची चौकशी करून दोषी विरोधात कठोर कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी जनतेत जोर धरत आहे.