शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

पूरग्रस्तांच्या भूखंडांची लाभार्थ्यांकडून परस्पर विक्री

By admin | Updated: April 30, 2015 00:36 IST

सन १९७८ च्या पुराचा फटका चुलबंद व वैनगंगा नदीकाठावरील हजारो कुटुंबांना बसला होता.

पूरग्रस्तांचे जीणे धोक्याच्या ठिकाणी : भूखंड वाटपाचा निव्वळ फार्स, दोषीवर कारवाई करण्याचे अधिकाऱ्यांचे निर्देशलाखांदूर : सन १९७८ च्या पुराचा फटका चुलबंद व वैनगंगा नदीकाठावरील हजारो कुटुंबांना बसला होता. त्यानंतर राज्य शासनाने सहा गावांचे पुनर्वसन करून पूरग्रस्तांना भूखंड दिले. पूरग्रस्तांनी त्याच धोकादायक ठिकाणी संसार थाटून मिळालेले भूखंड परस्पर विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे महसूल विभागाने आता शर्तभंगाची कारवाई सुरु केली आहे.लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदीकाठावरील खोलमारा, मरेगाव, बोथली, किन्हाळा तर वैनगंगा नदीकाठावरील आवळी, टेंभरी, विहिरगाव ही गावे पूरबाधीत ठिकाणी आहेत. त्यामुळे राज्य शासनाने सन १९७८ ला पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने प्रत्येक कुटुंबाला भूखंड दिले होते. यासोबतच लाकूडफाटे, कवेलू व कुटुंबनिहाय घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली. मरेगाव येथील पुनर्वसनाकरिता वाकलजवळ नवीन मऱ्हेगाव येथे ५९ भूखंड, आवळीचे पुनर्वसन, इंदोरा येथे १०५ भूखंड, टेंभरी विहिरगावचे पुनर्वसन, कन्हाळगाव २६ भूखंड तर किन्हाळाचे लाखांदूर येथे पुनर्वसन करण्याच्या हेतूने १५० भूखंड देण्यात आले होते.आता या घटनेला ३५ वर्षाचा काळ लोटला मात्र काही गावातील पूरग्रस्तांनी सुरक्षित स्थळी मिळालेल्या भूखंडावर घर बांधून संसार थाटला. मात्र अर्ध्यापेक्षा जास्त पुरग्रस्तांनी हक्काचे भूखंड परस्पर विकले. विकलेल्या या भूखंडावर आता टोलेजंग इमारती तयार झालेल्या आहेत. १० ते १०० रुपयाच्या मुद्रांकावर पुरग्रस्तांनी भूखंड विकल्याचे लिहून दिले आहे. काही भूखंड हे पूरग्रस्तांनी वापरात न आणल्यामुळे अनेकांनी अतिक्रमण केले आहे. तलाठी व ग्रामपंचायत दस्ताऐवज तयार करवून घेतले. तर काही भूखंड ‘जैसे थे’ स्थितीत आहेत.ज्या पूरग्रस्तांनी नदीकाठावरील हक्कांची जागा सोडून मिळालेल्या भूखंडावर संसार थाटला. त्या पूरग्रस्तांच्या रिकाम्या भूखंडावर इतरांनी अतिक्रमण केले आहे. मात्र यावेळी पुनरावृत्ती टाळण्याच्या दृष्टीने प्रशासन किंवा ग्रामपंचायतीने विरोध केला नाही. याउलट त्यांचे नावे गृहकराचा बोझा चढवून नव्याने घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला. शासनाने ज्या ठिकाणी धोका असल्याचे समजून दुसरीकडे पुनर्वसन केले त्याच ठिकाणी पुन्हा शासकीय लाभाच्या योजना देण्यात आले आहे. एकीकडे नदीकाठावरील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च तर दुसरीकडे त्याच ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यात प्रशासनाची नियोजनशून्य कार्यप्रणाली दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)प्रशासनाने केला कारवाईला विलंब!उपजीविकेचे साधन किंवा पूरग्रस्तांना पुनर्वसनाकरीता शासनस्तरावरून शेतजमीन किंवा भूखंड त्या व्यक्तीला किंवा त्या कुटुंबाला अटी व शर्थीच्या आधारावर उपलब्ध करून देते. यात शासनाकडून मिळविलेली शेती किंवा भूखंड अनेक वर्षे वापरात आणली नसेल तर त्या कुटुंबाला किंवा त्या व्यक्तीला शासकीय शेती किंवा भूखंडाची गरज नसल्याचे गृहीत धरून शर्तभंगाच्या कारवाईस सुरुवात करते. मात्र सन १९७८ ला वाटप झाले भूखंड अजूनही वापरात न आल्याने महसूल विभागाने अद्याप शर्तभंगाची कारवाई न केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तपासाअंती कारवाई होणारपूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने आबादी भूखंडाचे शासनस्तरावर वाटप करण्यात आले होते. मात्र वाटपातील भूखंडावर अतिक्रमण किंवा ते भूखंड पूरग्रस्तांना विकल्याचे निदर्शनास आले. त्यादृष्टीने सर्व तलाठ्यांना निर्देश देऊन शर्तभंगाचे प्रकरण तयार करण्यासाठी सांगितले आहे. नदीकाठावरील धोक्याच्या ठिकाणी पूरग्रस्तांनी सोडलेल्या जागेवर चुकीने घरकुलाचे बांधकाम केल्याचे दिसून आले. यात अनियमितता किंवा चुका आढळून आल्यास तपासाअंती कारवाई करण्यात येणार आहे.- विजय पवार,तहसीलदार, लाखांदूर.