शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

पिकांचे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:08 IST

भंडारा तालुक्यातील गुंथारा येथे महाराष्ट्र शासन राज्य कृषी विभागांतर्गत तालुकास्तरीय क्षेत्रीय कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...

भंडारा तालुक्यातील गुंथारा येथे महाराष्ट्र शासन राज्य कृषी विभागांतर्गत तालुकास्तरीय क्षेत्रीय कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ कृषी अधिकारी होमराज धांडे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, कृषी साहाय्यक गिरीश रणदिवे, देवा जवंजाळ, मीनाक्षी लांडगे उपस्थित होते. डॉ. श्यामकुवर यांनी उन्हाळी धान लागवडीची पाहणी करून त्यावरील कीड रोग व्यवस्थापनाविषयी सखोल मार्गदर्शन केले.

उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेबाबत सखोल मार्गदर्शन केले.

भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी हरभरा पिकाचे दैनंदिन आहारातील महत्त्व व जमीन सुपीकतेच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी हरभरा पीक महत्त्वाचे असून कृषी विभागाच्या ठिबक, तुषार सिंचन, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत राबवलेल्या योजना तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त भाजीपाला पिकाकडे लक्ष देऊन आपली आर्थिक उन्नती साधण्याचे आवाहन केले. पारंपरिक भात पिकाला अन्य पिकांचे पर्याय शोधण्याचेही त्यांनी आवाहन केले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी गटनिर्मिती व शासनाच्या विविध योजनांचा लाभ गटामार्फत कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. संचालन होमराज धांडे यांनी केले तर आभार मीनाक्षी लांडगे यांनी मानले.

बॉक्स

शेतीपूरक व्यवसायासाठी सर्वतोपरी सहकार्य

महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतीशी निगडित शेतीपूरक व्यवसाय निर्मिती, शेतकरी उत्पादक कंपन्यांतून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याचा ध्यास घेतला आहे. यासाठी भंडारा उपविभागातून कृषी आयुक्तालयाकडे ५ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. या प्रस्तावांची दखल घेत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी अन्य जिल्ह्यांतूनही असे शेतीपूरक उद्योग उभारणीचे प्रस्ताव मागविले असून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर व ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी हे उद्योग फायदेशीर ठरणार आहेत. कृषी आयुक्तांनी भंडारा जिल्हा कृषी विभागाचे कौतुक केले आहे.