शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पिकांचे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:08 IST

भंडारा तालुक्यातील गुंथारा येथे महाराष्ट्र शासन राज्य कृषी विभागांतर्गत तालुकास्तरीय क्षेत्रीय कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...

भंडारा तालुक्यातील गुंथारा येथे महाराष्ट्र शासन राज्य कृषी विभागांतर्गत तालुकास्तरीय क्षेत्रीय कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ कृषी अधिकारी होमराज धांडे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, कृषी साहाय्यक गिरीश रणदिवे, देवा जवंजाळ, मीनाक्षी लांडगे उपस्थित होते. डॉ. श्यामकुवर यांनी उन्हाळी धान लागवडीची पाहणी करून त्यावरील कीड रोग व्यवस्थापनाविषयी सखोल मार्गदर्शन केले.

उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेबाबत सखोल मार्गदर्शन केले.

भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी हरभरा पिकाचे दैनंदिन आहारातील महत्त्व व जमीन सुपीकतेच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी हरभरा पीक महत्त्वाचे असून कृषी विभागाच्या ठिबक, तुषार सिंचन, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत राबवलेल्या योजना तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त भाजीपाला पिकाकडे लक्ष देऊन आपली आर्थिक उन्नती साधण्याचे आवाहन केले. पारंपरिक भात पिकाला अन्य पिकांचे पर्याय शोधण्याचेही त्यांनी आवाहन केले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी गटनिर्मिती व शासनाच्या विविध योजनांचा लाभ गटामार्फत कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. संचालन होमराज धांडे यांनी केले तर आभार मीनाक्षी लांडगे यांनी मानले.

बॉक्स

शेतीपूरक व्यवसायासाठी सर्वतोपरी सहकार्य

महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतीशी निगडित शेतीपूरक व्यवसाय निर्मिती, शेतकरी उत्पादक कंपन्यांतून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याचा ध्यास घेतला आहे. यासाठी भंडारा उपविभागातून कृषी आयुक्तालयाकडे ५ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. या प्रस्तावांची दखल घेत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी अन्य जिल्ह्यांतूनही असे शेतीपूरक उद्योग उभारणीचे प्रस्ताव मागविले असून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर व ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी हे उद्योग फायदेशीर ठरणार आहेत. कृषी आयुक्तांनी भंडारा जिल्हा कृषी विभागाचे कौतुक केले आहे.