शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पिकांचे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:08 IST

भंडारा तालुक्यातील गुंथारा येथे महाराष्ट्र शासन राज्य कृषी विभागांतर्गत तालुकास्तरीय क्षेत्रीय कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...

भंडारा तालुक्यातील गुंथारा येथे महाराष्ट्र शासन राज्य कृषी विभागांतर्गत तालुकास्तरीय क्षेत्रीय कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ कृषी अधिकारी होमराज धांडे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, कृषी साहाय्यक गिरीश रणदिवे, देवा जवंजाळ, मीनाक्षी लांडगे उपस्थित होते. डॉ. श्यामकुवर यांनी उन्हाळी धान लागवडीची पाहणी करून त्यावरील कीड रोग व्यवस्थापनाविषयी सखोल मार्गदर्शन केले.

उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड यांनी शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेबाबत सखोल मार्गदर्शन केले.

भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी हरभरा पिकाचे दैनंदिन आहारातील महत्त्व व जमीन सुपीकतेच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी हरभरा पीक महत्त्वाचे असून कृषी विभागाच्या ठिबक, तुषार सिंचन, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत राबवलेल्या योजना तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त भाजीपाला पिकाकडे लक्ष देऊन आपली आर्थिक उन्नती साधण्याचे आवाहन केले. पारंपरिक भात पिकाला अन्य पिकांचे पर्याय शोधण्याचेही त्यांनी आवाहन केले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी गटनिर्मिती व शासनाच्या विविध योजनांचा लाभ गटामार्फत कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. संचालन होमराज धांडे यांनी केले तर आभार मीनाक्षी लांडगे यांनी मानले.

बॉक्स

शेतीपूरक व्यवसायासाठी सर्वतोपरी सहकार्य

महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतीशी निगडित शेतीपूरक व्यवसाय निर्मिती, शेतकरी उत्पादक कंपन्यांतून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याचा ध्यास घेतला आहे. यासाठी भंडारा उपविभागातून कृषी आयुक्तालयाकडे ५ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. या प्रस्तावांची दखल घेत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी अन्य जिल्ह्यांतूनही असे शेतीपूरक उद्योग उभारणीचे प्रस्ताव मागविले असून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर व ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी हे उद्योग फायदेशीर ठरणार आहेत. कृषी आयुक्तांनी भंडारा जिल्हा कृषी विभागाचे कौतुक केले आहे.