शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनाला दिले विमा सुरक्षेचे कवच

By admin | Updated: September 1, 2015 00:33 IST

रक्षाबंधनाचे महत्व सर्वांना माहित आहे. आयुष्यात मदतीकरिता चार माणसे सहज मिळतील.

वरठी : रक्षाबंधनाचे महत्व सर्वांना माहित आहे. आयुष्यात मदतीकरिता चार माणसे सहज मिळतील. पण पैसे उभारण्याकरिता सामान्य माणसाला मोठी कसरत करावी लागते. आर्थिक सुरक्षा ही शारीरिक सुरक्षेपेक्षा गरजेची आहे. म्हणून वेळप्रसंगी सर्वांना आर्थिक सहाय्यता उपलब्ध व्हावी याकरिता वरठी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधुन गावातील २३५ कुटूंबीयाचे सुरक्षा विमा योजनेचे फार्म भरुन घेतले. यासाठी येणारी प्रथम किस्त त्यांनी स्वत:च्या पैशाने भरले. पुढील दोन दिवसात गावातील एक हजार कुटूंबीयांना या योजनेत आणण्यासाठी त्यांचा प्रवास आजही सुरु आहे.काल रक्षाबंधनात होते. सर्वांना ह्या दिवसाची उत्सुकता होती. वर्षातून एकदा येणाऱ्या बहिणीचे आकर्षण व भेट खास होती. रक्षाबंधन हे सुरक्षेचे वचन म्हणून आपण साजरे करतो. सर्वांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताकरिता आतून असल्यामुळे सहजासहजी आपण बाहेर पडत नाही. पण वरठी येथील सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र देशमुख, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे, मिलिंद धारगावे व पूनम बालपांडे हे सकाळपासून गावात घरोघरी फिरले. सर्व सामान्यांच्या घरी शासनाच्या योजना व लाभ सुर्याच्या प्रकाशाप्रमाणे उशिरा पोहचतात. राबराबणारे कष्टकरी माणूस व त्यांच्या कुटूंबीयाचे दीवस व रात्र, सण व उत्सव एकसारखे जातात. याची जाणीव असल्यामुळे यांनी घरोघरी जावून सामान्य लोकांना आर्थिक सुरक्षा कवच देण्याचे ठरवले. कठीण प्रसंगी हातात पैसा नसल्यास सुरक्षेचे सर्व साधणे काळून पडतात. यासाठी आर्थिक सुरक्षा महत्वाची आहे. त्याच उद्देश समोर ठेवून वरठी येथील शास्त्री सुभाष व डॉ. आंबेडकर वॉर्डातील घरोघरी जावून यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवन ज्योती योजनेची माहिती दिली. यातून मिळणारे लाभ समजावून सांगण्यात आले. माहिती देताना केंद्र शासनाची योजना ही राजकीय पक्षवाद यातून सर्व सामान्याच्या फायदयाची कशी याची माहिती देण्यात आली. आर्थिक सुरक्षेचा प्रश्न मिटला की मनस्ताप आणि मानसाच्या चिंता आपोआप कमी होतात. धकाधकीच्या जीवनात कुटूंब प्रामुख्याने बरेवाईट झाल्यास कुटूंब उघड्यावर पडते. यामुळे सर्वांनी स्वत:ची आर्थिक सुरक्षा करुन घ्यावे असे आवाहन करुन इच्छुक कुटूंबाकडून त्यांनी विमा योजनेचे फार्म भरुन घेतले. याकरिता येणारी प्रथम किस्त सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र देशमुख, पुनम बालपांडे, मिलिंद धारगावे व पुष्पा भुरे स्वत: बँकेत जमा करणार आहेत. घरोघरी जावून माहिती देवून ५०० च्या जवळपास कुटूंबीयांचे अर्ज भरुन घेतले. आजही त्यांचा प्रवास सुरुच होता. एक हजार कुटुंबीयांचे फार्म भरुन देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)