शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

रक्षाबंधनाला दिले विमा सुरक्षेचे कवच

By admin | Updated: September 1, 2015 00:33 IST

रक्षाबंधनाचे महत्व सर्वांना माहित आहे. आयुष्यात मदतीकरिता चार माणसे सहज मिळतील.

वरठी : रक्षाबंधनाचे महत्व सर्वांना माहित आहे. आयुष्यात मदतीकरिता चार माणसे सहज मिळतील. पण पैसे उभारण्याकरिता सामान्य माणसाला मोठी कसरत करावी लागते. आर्थिक सुरक्षा ही शारीरिक सुरक्षेपेक्षा गरजेची आहे. म्हणून वेळप्रसंगी सर्वांना आर्थिक सहाय्यता उपलब्ध व्हावी याकरिता वरठी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधुन गावातील २३५ कुटूंबीयाचे सुरक्षा विमा योजनेचे फार्म भरुन घेतले. यासाठी येणारी प्रथम किस्त त्यांनी स्वत:च्या पैशाने भरले. पुढील दोन दिवसात गावातील एक हजार कुटूंबीयांना या योजनेत आणण्यासाठी त्यांचा प्रवास आजही सुरु आहे.काल रक्षाबंधनात होते. सर्वांना ह्या दिवसाची उत्सुकता होती. वर्षातून एकदा येणाऱ्या बहिणीचे आकर्षण व भेट खास होती. रक्षाबंधन हे सुरक्षेचे वचन म्हणून आपण साजरे करतो. सर्वांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताकरिता आतून असल्यामुळे सहजासहजी आपण बाहेर पडत नाही. पण वरठी येथील सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र देशमुख, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे, मिलिंद धारगावे व पूनम बालपांडे हे सकाळपासून गावात घरोघरी फिरले. सर्व सामान्यांच्या घरी शासनाच्या योजना व लाभ सुर्याच्या प्रकाशाप्रमाणे उशिरा पोहचतात. राबराबणारे कष्टकरी माणूस व त्यांच्या कुटूंबीयाचे दीवस व रात्र, सण व उत्सव एकसारखे जातात. याची जाणीव असल्यामुळे यांनी घरोघरी जावून सामान्य लोकांना आर्थिक सुरक्षा कवच देण्याचे ठरवले. कठीण प्रसंगी हातात पैसा नसल्यास सुरक्षेचे सर्व साधणे काळून पडतात. यासाठी आर्थिक सुरक्षा महत्वाची आहे. त्याच उद्देश समोर ठेवून वरठी येथील शास्त्री सुभाष व डॉ. आंबेडकर वॉर्डातील घरोघरी जावून यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवन ज्योती योजनेची माहिती दिली. यातून मिळणारे लाभ समजावून सांगण्यात आले. माहिती देताना केंद्र शासनाची योजना ही राजकीय पक्षवाद यातून सर्व सामान्याच्या फायदयाची कशी याची माहिती देण्यात आली. आर्थिक सुरक्षेचा प्रश्न मिटला की मनस्ताप आणि मानसाच्या चिंता आपोआप कमी होतात. धकाधकीच्या जीवनात कुटूंब प्रामुख्याने बरेवाईट झाल्यास कुटूंब उघड्यावर पडते. यामुळे सर्वांनी स्वत:ची आर्थिक सुरक्षा करुन घ्यावे असे आवाहन करुन इच्छुक कुटूंबाकडून त्यांनी विमा योजनेचे फार्म भरुन घेतले. याकरिता येणारी प्रथम किस्त सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र देशमुख, पुनम बालपांडे, मिलिंद धारगावे व पुष्पा भुरे स्वत: बँकेत जमा करणार आहेत. घरोघरी जावून माहिती देवून ५०० च्या जवळपास कुटूंबीयांचे अर्ज भरुन घेतले. आजही त्यांचा प्रवास सुरुच होता. एक हजार कुटुंबीयांचे फार्म भरुन देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)