शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या कार्यातून प्रेरणा घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:44 IST

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान आहे. देश अखंड ठेवण्यात त्यांची कामगिरी मोठी आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : राष्ट्रीय एकतेसाठी धावले भंडारा शहर, राष्ट्रीय एकता दिवस व संकल्प दिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान आहे. देश अखंड ठेवण्यात त्यांची कामगिरी मोठी आहे. सगळ्यांना एकाच धाग्यात गुफण्याचं काम त्यांनी केले. सरदार या नावातच नेतृत्वगुण दिसून येतात. म्हणूनच आज राष्ट्रीय एकता दिनाचे व राष्ट्रीय संकल्प दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपले जीवन समृद्ध करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय एकता दिवस व राष्ट्रीय संकल्प दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, पोलीस उपअधीक्षक सुनील कुळकर्णी, उपजिल्हाधिकारी दिलीप तलमले, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, तहसीलदार संजय पवार, अधीक्षक वरूण शहारे उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, १९७१ च्या युध्दात संपूर्ण जगास विस्मयकारक राजकीय निर्णय घेऊन पाकिस्तान व बांगला देशसोबतच्या युद्धात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कठोर निर्णयाबदद्दल त्यांना ‘आयर्न लेडी’ म्हटले जाते. या दोन्ही नेत्यांना स्मरण करण्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. या महान नेत्यांचे चरित्र तरूणांनी व विद्यार्थ्यांनी वाचून त्यांचे गुणकर्तृत्व आत्मसात करावे, असे त्यांनी सांगितले. आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस तर इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस साजरा करण्यात आला.मंगळवारला सकाळी महात्मा गांधी चौक ते जिल्हा क्रिडा संकुलापर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले. या दौडला जिल्हाधिकारी सुहास दिवसे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. या दौडमध्ये विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात विविध क्रीडा संघटना सहभागी झाल्या होत्या. एकता दौडचा समारोप जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोल्हे यांनी तर उपस्थितांचे आभार दिलीप ईटनकर यांनी मानले.