शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

पालांदुरात पोलीस मित्रांची रॅलीतून प्रबोधन

By admin | Updated: December 14, 2015 00:41 IST

दैनंदिन जीवनात शांतता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. पोलीस जनतेचे मित्र असुन संबंध टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होणे गरजेचे आहे.

जनतेच्या सहकार्याची गरज : ठोणदारांनी केले ग्रामस्थांना मार्गदर्शनपालांदूर : दैनंदिन जीवनात शांतता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. पोलीस जनतेचे मित्र असुन संबंध टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होणे गरजेचे आहे. याची जाणीव सर्वसामान्यांना व्हावे यासाठी पालांदूर येथे पोलीस मित्र रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.गावातील प्रमुख मार्गाने ही रॅली काढण्यात आली. यानंतर बसस्थानक परिसरात घेतलेल्या कार्यक्रमात ठाणेदार ए.एस. सय्यद यांनी मार्गदर्शन करताना, लोकशाहीप्रधान देशात कायदा व सुव्यवस्था टिकविणे जनतेचे प्रथम कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले. या रॅलीत २०० पोलीस मित्रांचा समावेश होता. यात ५४ गावातील पोलीस मित्र ज्यात स्त्री, पुरुष यांचा उत्साहपूर्वक सहभाग होता. पोलीस ठाणे ते बाजार चौक या मुख्य रस्त्याने पायी रॅली काढण्यात आली. बाजारचौकात हजारो लोकांच्या साक्षीने रॅलीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. पालांदूर पोलीस ठाण्याच्या इतिहासात प्रथमच पोलीस रॅली काढून पोलीस आमजनतेचे सेवक तर आहेतच; परंतु चांगले मित्रसुध्दा असल्याचे रॅलीतून नागरिकांना संदेश दिला.रॅलीकरिता ठाणेदार सय्यद, पोलीस पाटील सुनील लुटे, मोरेश्वर प्रधान, सरपंच वैशाली खंडाईत, पोलीस हवालदार कोल्हे, पोलीस शिपाई अतुल मेश्राम, पीयूष कच्छवाह, प्रतीक बोरकर, गजानन नेमाडे आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)