शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पालांदुरात पोलीस मित्रांची रॅलीतून प्रबोधन

By admin | Updated: December 14, 2015 00:41 IST

दैनंदिन जीवनात शांतता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. पोलीस जनतेचे मित्र असुन संबंध टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होणे गरजेचे आहे.

जनतेच्या सहकार्याची गरज : ठोणदारांनी केले ग्रामस्थांना मार्गदर्शनपालांदूर : दैनंदिन जीवनात शांतता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. पोलीस जनतेचे मित्र असुन संबंध टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण होणे गरजेचे आहे. याची जाणीव सर्वसामान्यांना व्हावे यासाठी पालांदूर येथे पोलीस मित्र रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.गावातील प्रमुख मार्गाने ही रॅली काढण्यात आली. यानंतर बसस्थानक परिसरात घेतलेल्या कार्यक्रमात ठाणेदार ए.एस. सय्यद यांनी मार्गदर्शन करताना, लोकशाहीप्रधान देशात कायदा व सुव्यवस्था टिकविणे जनतेचे प्रथम कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले. या रॅलीत २०० पोलीस मित्रांचा समावेश होता. यात ५४ गावातील पोलीस मित्र ज्यात स्त्री, पुरुष यांचा उत्साहपूर्वक सहभाग होता. पोलीस ठाणे ते बाजार चौक या मुख्य रस्त्याने पायी रॅली काढण्यात आली. बाजारचौकात हजारो लोकांच्या साक्षीने रॅलीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. पालांदूर पोलीस ठाण्याच्या इतिहासात प्रथमच पोलीस रॅली काढून पोलीस आमजनतेचे सेवक तर आहेतच; परंतु चांगले मित्रसुध्दा असल्याचे रॅलीतून नागरिकांना संदेश दिला.रॅलीकरिता ठाणेदार सय्यद, पोलीस पाटील सुनील लुटे, मोरेश्वर प्रधान, सरपंच वैशाली खंडाईत, पोलीस हवालदार कोल्हे, पोलीस शिपाई अतुल मेश्राम, पीयूष कच्छवाह, प्रतीक बोरकर, गजानन नेमाडे आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)