शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

किडींचा प्रादुर्भाव; धान उत्पादक संकटात

By admin | Updated: November 13, 2015 00:54 IST

रात्रंदिवस मेहनत करून, लहरी निसर्गाचा सामना करीत, यावर्षीच्या तुटपुंज्या पाण्याचे कसेतरी नियोजन करून,

मासळ : रात्रंदिवस मेहनत करून, लहरी निसर्गाचा सामना करीत, यावर्षीच्या तुटपुंज्या पाण्याचे कसेतरी नियोजन करून, सर्वोत्तम पिक घेण्याची तयारी असताना ऐन गर्भावस्थेत व कापणीला येणाऱ्या धान पिकाला गाद, तुडतुडा या व इतर किडीने जबरदस्त मारा केल्याने विशेषत: भारी धान उत्पादक संकटात सापडला आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने आपला लहरीपणा दाखवायला सुरुवात केली होती. पेरणीपासूनच पाऊस कमी अधिक पडताना शेतकऱ्यांच्या नजरेस पडला. निसर्गाचा कोप नेहमीप्रमाणे यावर्षीही येईल असे वाटत असतानाच कमी पावसात कशीबशी रोवणी आटोपली. त्यानंतर वेळोवेळी पाण्याची कमतरता सहन करत पीक जोमात वाढले. परंतु ऐन गर्भावस्थेत असतानाच हलक्या जातीच्या धानाला विविध रोगांनी ग्रासायला सुरुवात झाली. त्यावरही आर्थिक भुर्दंड सहन करत बळीराजाने मात करण्याचा प्रयत्न केला. हलके धानाच्या पाठोपाठ भारी धान गर्भावस्थेत आले. यावेळी मात्र तुडतुड्यासारख्या किडीने अक्षरश: धानावर प्रहार करायला सुरुवात केली. काही काळायच्या आतच एका रात्रीत तुडतुडा संपूर्ण शेतात पसरू लागला. एकामागोमाग एक असे फवारणीचे डोस शेतकरी देवू लागला. धान कापणीला येवून ठेपले परंतु तुडतुड्यावर नियंत्रण होवू शकले नाही. पेरणीपासून ज्या शेतकऱ्यांनी पिकासाठी अहोरात्र मेहनत केली, रक्ताचे पाणी केले आणि पुढील जीवनात मदतीची आस ठेवून पीक वाढवून उत्पादन घेण्याची अपेक्षा ठेवली. ती मात्र या चार दोन दिवसात संपुष्टात आली. रोगांच्या भीतीने काही शेतकरी, धान लोंबी भरण्याच्या आतच कापायला सुरुवात करू लागला. काहींचे धान तर तणसच बनून शेतात उभे आहे. सध्या अंतीम टप्प्यात तणसच बनून शेतात उभे आहे. सध्या अंतिम टप्प्यात धान कापणी सुरु आहे. परंतु धानाला लोंबीत धानच नाहीत काही ठिकाणी धानाची मळणी सुरु झाली. परंतु उताराच नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व संतापाची लाट पसरली आहे. ज्या भरवशावर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होत्या, त्या आशा त्यांच्या धुळीस मिळत आहेत. उत्पादनात घट निर्माण झाल्याने, आर्थिक प्रश्न कसे सोडवायचे हा बिकट प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे आ वासून उभा आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात रोगराईने झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारे आहे. सर्वात अधिक फटका भारी व उच्च प्रतीच्या धान उत्पादकांना पडला आहे.धान उपादकांच्या नशिबी दु:खाचेच डोंगर अनुभवायला मिळत आहेत. तूर्त किडींच्या प्रादुर्भावाने धान उत्पादक संकटात पडला असून निरुपाय झाला आहे. (वार्ताहर)