शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

गैरव्यवहाराची चौकशी थंडबस्त्यात

By admin | Updated: April 6, 2017 00:24 IST

भंडारा जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा कार्यालयाअंतर्गत गरीबांच्या हिताचे शासकीय गोदामातील अन्न धान्यात झालेल्या ....

धरणे आंदोलन : गैरव्यवहार उघडकीस आणण्याची मागणीभंडारा : भंडारा जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा कार्यालयाअंतर्गत गरीबांच्या हिताचे शासकीय गोदामातील अन्न धान्यात झालेल्या व होत असलेल्या कथीत भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे. सदर गैरव्यवहार जनतेसमोर यावा यासाठी ३ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर एक दिवसीय धरणे देवून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांतर्गत सुधारित वितरण पद्धतीनुसार अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे द्वारपोच वाहतूक कंत्राट कालावधी ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत देण्यात आली आहे. त्यात कंत्राटदार यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे वाहतूक करणाऱ्या गाड्यांना हिरवा रंग करणे अनिवार्य आहे. कंत्राटदारांनी वाहतूक करणाऱ्या सर्व गाड्यांना हिरवा रंग केल्याचे पत्र पुरवठा अधिकारी यांना दिले आहे. परंतु त्या पत्रावर तारीख व वर्ष नमूद नाही. बिन तारीख असलेला पत्र स्वीकारून अधिकाऱ्यांनी कंत्राट कसा मंजूर केला? म्हणून माहितीचे अधिकार अंतर्गत नांदेड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्र देवून माहिती मागितली असता त्यांनी गाड्यांना हिरवा रंग केल्याचा कुठेही नोंद नाही. डिसेंबर २०१५ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत कारधा गोडाऊन, पवनी, तुमसर, वरठी गोदामातून अन्नधान्य उचल करण्यात आले. मात्र ते अन्नधान्य कोणत्या गोदामामध्ये गेले.त्यावर रिप्रेझेंटीव्ह डी.एस.ओ. अधिकारी यांची किंवा त्यांनी नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांची सही नाही असे २९ पत्र माहितीच्या अधिकारांतर्गत मागितलेल्या माहितीत मिळाले आहे. झालेल्या करारनाम्याचे कंत्राटदार यांनी पालन न केल्यामुळे कंत्राट रद्द करण्यात यावा या आशयाची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. जिल्हाधिकारी भंडारा यांनी मुळीच लक्ष दिले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी भंडारा यांची तक्रार विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली. विभागीय आयुक्त यांनी सदर प्रकरण विभागीय पुरवठा अधिकारी नागपूर यांच्याकडे तात्काळ चौकशीसाठी दिला. यावेळी विष्णूदास लोणारे, कन्हैया नागपुरे, ज्ञानेश्वर निकुरे, बळीराम सार्वे, बायाबाई बनकर, मंगला शेळके, त्रिवेणी वासनिक, वंदना वाडीभस्मे, अर्चना वांढरे, रत्नमाला वासनिक, टेकराम मेश्राम, केशव बिसने, गोपाल बसेशंकर, नलू सेलोकर, ज्योती राऊत, वर्षा बोंदरे, ज्योती भोंडे, तिलकचंद सहारे, वनिता चवळे, अशोक आंबेकर, दीक्षा मारबते, साधना शेळके अशा अनेक महिला व पुरुष उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)