शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायग्रस्त ठेवीदारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:19 IST

कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प कंपनीच्या संचालकांना तत्काळ अटक करावी. तसेच ठेवीदारांचे पैसे परत द्यावे या मागणीसाठी येथील हुतात्मा चौकातून जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

ठळक मुद्देकोट्यवधींची फसवणूक : जेएसव्ही डेव्हलपर्स, जय विनायक बिल्डकॉर्पचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प कंपनीच्या संचालकांना तत्काळ अटक करावी. तसेच ठेवीदारांचे पैसे परत द्यावे या मागणीसाठी येथील हुतात्मा चौकातून जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.सदर कंपनीने भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना दामदुप्पट रकमेचे प्रलोभन देऊन २५ हजार कोटी रूपयांनी फसवणूक केली आहे. सदर कंपनीच्या संचालकांविरोधात ६ सप्टेंबर २०१६ रोजी भंडारा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून करण्यात आला. यातील काही आरोपींना अटक करण्यात आली तर अनेकजण आजही पोलिसांच्या हाती लागले नाही. जेएसव्ही डेव्हलपर्स इंडिया आणि जय विनायक बिल्डकॉर्प या कंपनीच्या नावाने असलेली संपत्ती जप्त करण्याची मागणी करात नागपूर हिवाळी अधिवेशनावर दोनदा मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ८ फेब्रुवारी २०१८ रोजी भंडारा अप्पर जिल्हाधिकाºयांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करून मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.मात्र अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप कुठलही कार्यवाही केलेली नाही. ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळालेली नाही. अखेर ठेवीदारांनी येथील हुतात्मा स्मारक चौकातू जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. सामाजिक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे, कन्हैया नागपुरे, मधुकर येरपुडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात ठेवीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांना निवेदन देण्यात आले. त्यात ठेवीदाराची रक्कम तात्काळ परत देण्याची कार्यवाही करवी, पसार आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाºया २०१९ च्या निवडणुकीत सर्व जिल्ह्यातील ठेवीदार बहिष्कार घालतील, असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी सदर प्रकरण समजून घेत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ माहिती घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासनाला पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच लवकरात लवकर रक्कम परत मिळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासनही दिले.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा घेऊन मोर्च्याचा समारोप करण्यात आले. यावेळी डॉ. राजकुमार बावणकर, ममता सांडेल, अनिता मुर्ती, नलु सेलोकर, ममता साखरे, केशोराव बिसने, ज्ञानेश्वर गजभिये या ठेवीदारांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मोर्च्याला यशस्वीतेयसठी फुलवंता कोकुडे, जागृती गजभिये, मंगला सातके, अरविंद प्रधान, पुष्पा पटले, जगदीश जनबंधू, लेकचंद लुसेसरी यांनी परिश्रम घेतले. मोर्चात अनेकजण सहभागी झाले होते.