शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अन्यायग्रस्त ठेवीदारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:19 IST

कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प कंपनीच्या संचालकांना तत्काळ अटक करावी. तसेच ठेवीदारांचे पैसे परत द्यावे या मागणीसाठी येथील हुतात्मा चौकातून जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

ठळक मुद्देकोट्यवधींची फसवणूक : जेएसव्ही डेव्हलपर्स, जय विनायक बिल्डकॉर्पचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प कंपनीच्या संचालकांना तत्काळ अटक करावी. तसेच ठेवीदारांचे पैसे परत द्यावे या मागणीसाठी येथील हुतात्मा चौकातून जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.सदर कंपनीने भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना दामदुप्पट रकमेचे प्रलोभन देऊन २५ हजार कोटी रूपयांनी फसवणूक केली आहे. सदर कंपनीच्या संचालकांविरोधात ६ सप्टेंबर २०१६ रोजी भंडारा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून करण्यात आला. यातील काही आरोपींना अटक करण्यात आली तर अनेकजण आजही पोलिसांच्या हाती लागले नाही. जेएसव्ही डेव्हलपर्स इंडिया आणि जय विनायक बिल्डकॉर्प या कंपनीच्या नावाने असलेली संपत्ती जप्त करण्याची मागणी करात नागपूर हिवाळी अधिवेशनावर दोनदा मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ८ फेब्रुवारी २०१८ रोजी भंडारा अप्पर जिल्हाधिकाºयांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करून मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.मात्र अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप कुठलही कार्यवाही केलेली नाही. ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळालेली नाही. अखेर ठेवीदारांनी येथील हुतात्मा स्मारक चौकातू जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. सामाजिक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे, कन्हैया नागपुरे, मधुकर येरपुडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात ठेवीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांना निवेदन देण्यात आले. त्यात ठेवीदाराची रक्कम तात्काळ परत देण्याची कार्यवाही करवी, पसार आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाºया २०१९ च्या निवडणुकीत सर्व जिल्ह्यातील ठेवीदार बहिष्कार घालतील, असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी सदर प्रकरण समजून घेत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ माहिती घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासनाला पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच लवकरात लवकर रक्कम परत मिळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासनही दिले.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा घेऊन मोर्च्याचा समारोप करण्यात आले. यावेळी डॉ. राजकुमार बावणकर, ममता सांडेल, अनिता मुर्ती, नलु सेलोकर, ममता साखरे, केशोराव बिसने, ज्ञानेश्वर गजभिये या ठेवीदारांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मोर्च्याला यशस्वीतेयसठी फुलवंता कोकुडे, जागृती गजभिये, मंगला सातके, अरविंद प्रधान, पुष्पा पटले, जगदीश जनबंधू, लेकचंद लुसेसरी यांनी परिश्रम घेतले. मोर्चात अनेकजण सहभागी झाले होते.