शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पावसाच्या हुलकावणीने भाजीला महागाईची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:29 IST

यावर्षी मान्सूनला झालेल्या विलंबामुळे सर्वत्र पाणी टंचाईची झळ दिसून येत असल्याने त्याच्यावर विपरित परिणाम बाजारातील भाजीपाल्यावर होत आहे. पाणीटंचाईमुळे पालेभाज्यांची बाजारातील आवक घटल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले आहे.

ठळक मुद्देबाजारातील आवक घटली : पालेभाज्यांचे दर भिडले गगणाला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यावर्षी मान्सूनला झालेल्या विलंबामुळे सर्वत्र पाणी टंचाईची झळ दिसून येत असल्याने त्याच्यावर विपरित परिणाम बाजारातील भाजीपाल्यावर होत आहे. पाणीटंचाईमुळे पालेभाज्यांची बाजारातील आवक घटल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले आहे.जून अखेरपासून बाजारात येणारा भाजीपाला हा दिवसेंदिवस कमी येत असल्याने दरामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजट कोलमडले असून भाजीपाला खरेदी करणे कठीण होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे शाश्वत सिंचनाची सोय कमी असल्याने नागपूर मधून येणाºया भाजीपाल्यांचे दर हे दिवसेंदिवस वाढत आहे.भंडारा येथील मोठा बाजारात ग्रामीण भागातील येणाºया शेतकऱ्यांचा माल हा दुर्मिळ झाला आहे. त्यातच टोमॅटो, फुलकोबी, पालेभाज्या यांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. वातावरण ढगाळ राहत असल्याने उत्पादन घटले असून शेतकºयांचा खर्च वाढला आहे. त्यामुळे त्याचाच परिणाम भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे पालेभाज्यासंह फुलकोबीचे दर हे वाढले आहे. हिरवी मिरची देखील महागल्याने सर्व सामान्यांना भाजीपाला खरेदी करणे परवडेनासे झाले आहे. जुलै महिना संपत आला तरी पुन्हा एकदा पावसाचा खंड पडल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना स्वस्त दरात भाजीपाला मिळणे कठीण होत आहे.दर आवाक्याबाहेरदररोजच्या आहारात वापरात असलेली हिरवी मिरची ८० रुपये किलो तर फुलकोबी ६० ते ७० रुपये किलो इतर पालेभाज्याही महागल्याने सर्वसामान्य गुहिणींना भाजीपाला खरेदी करणे जिकरीचे झाले आहे. सांभार २५० रुपये, लहसून १०० रुपये, काकडी २० रुपये, अद्रक १३० रुपये किलो पालेभाज्या १५ ते २० रुपये जुडी दराने उपलब्ध असल्याने थोक विक्रेत्यांकडून किरकोळ बाजारात विक्रेत्यांकडे पोहचेपर्यंत भाजीपाल्याचे दर दुप्पट होत असल्याने सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे कठीण होत आहे.