शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन श्रावणातील महागाईने सणासुदीचा गोडवा झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:40 IST

भंडारा : सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाच्या आहारात साखरेचा वापर कमी जास्त प्रमाणात होत असतो; मात्र ऐन श्रावण ...

भंडारा : सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाच्या आहारात साखरेचा वापर कमी जास्त प्रमाणात होत असतो; मात्र ऐन श्रावण महिन्यात ड्रायफ्रूटसह साखरेचे, तेलाचे दर वाढले असल्याने आता गृहिणींची चिंता वाढली आहे. या दरवाढीचा परिणाम हा मध्यमवर्गीय श्रीमंत व्यक्तींना फारसा जाणवत नसला तरी कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला मात्र दरवाढीने साखरेचा कडवटपणा जाणवत आहे.

जिल्ह्यात दोन साखर कारखान्यांचा अपवाद वगळता इतर साखर कारखाने नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात साखरेचे उत्पादन होत नाही. विदर्भात पश्चिम महाराष्ट्रातून साखर येते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत जिल्ह्यात साखरेचे दर हे अधिक आहेत. त्यातच आता झालेली साखरेची दरवाढ ही सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना परवडणारी नाही. चना, शेंगदाणे, साखर, मसाले, गहू, तांदळाचीसुद्धा भाववाढ झाल्याने गरीब, सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल-डिझेलने आधीच आपली मर्यादा ओलांडल्याने इतरही जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी प्रपंच चालवायचा कसा? असा प्रश्न आहे.

कोट

साखरेसह किराणा साहित्याची झालेली दरवाढ ही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी परवडणारी नाही. साखरेचेच नव्हे तर खाद्यतेल, पेट्रोल, डिझेलही प्रचंड वाढले आहे. सामान्यांनी जगावे कसे असा प्रश्न आहे. यावर केंद्र शासनाने अंकुश ठेवायला हवा.

दीपाली अविनाश कोटांगले, भंडारा

कोट

कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. गरिबांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान गोरगरिबांसाठी तरी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करायला हव्यात. ऐन श्रावणात साखरेची दरवाढ योग्य नाही.

दीपाली संजय आकरे, खरबी

कोट

सध्या सणांमुळे ग्राहकांकडून साखरेची मागणी वाढत आहे. आपल्या जिल्ह्यात तरी अजून साखरेचे फारसे दर वाढलेले नाहीत. गेल्या काही वर्षात तेल, साबण, साखरेचे रेट हे आवाक्याबाहेर गेले आहेत.

एक व्यावसायिक, भंडारा

कोट

साखरच नाही तर प्रत्येक गोष्टीचे दर वाढत चालले आहेत. सरकारला सामान्य जनतेचे काही देणे घेणे नाही. जनताही सर्व निमूटपणे सहन करत आहे. याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे.

दिनेश वासनिक, केसलवाडा