शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

ऐन श्रावणातील महागाईने सणासुदीचा गोडवा झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:40 IST

भंडारा : सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाच्या आहारात साखरेचा वापर कमी जास्त प्रमाणात होत असतो; मात्र ऐन श्रावण ...

भंडारा : सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाच्या आहारात साखरेचा वापर कमी जास्त प्रमाणात होत असतो; मात्र ऐन श्रावण महिन्यात ड्रायफ्रूटसह साखरेचे, तेलाचे दर वाढले असल्याने आता गृहिणींची चिंता वाढली आहे. या दरवाढीचा परिणाम हा मध्यमवर्गीय श्रीमंत व्यक्तींना फारसा जाणवत नसला तरी कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला मात्र दरवाढीने साखरेचा कडवटपणा जाणवत आहे.

जिल्ह्यात दोन साखर कारखान्यांचा अपवाद वगळता इतर साखर कारखाने नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात साखरेचे उत्पादन होत नाही. विदर्भात पश्चिम महाराष्ट्रातून साखर येते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत जिल्ह्यात साखरेचे दर हे अधिक आहेत. त्यातच आता झालेली साखरेची दरवाढ ही सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना परवडणारी नाही. चना, शेंगदाणे, साखर, मसाले, गहू, तांदळाचीसुद्धा भाववाढ झाल्याने गरीब, सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल-डिझेलने आधीच आपली मर्यादा ओलांडल्याने इतरही जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी प्रपंच चालवायचा कसा? असा प्रश्न आहे.

कोट

साखरेसह किराणा साहित्याची झालेली दरवाढ ही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी परवडणारी नाही. साखरेचेच नव्हे तर खाद्यतेल, पेट्रोल, डिझेलही प्रचंड वाढले आहे. सामान्यांनी जगावे कसे असा प्रश्न आहे. यावर केंद्र शासनाने अंकुश ठेवायला हवा.

दीपाली अविनाश कोटांगले, भंडारा

कोट

कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. गरिबांना वाढत्या महागाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान गोरगरिबांसाठी तरी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करायला हव्यात. ऐन श्रावणात साखरेची दरवाढ योग्य नाही.

दीपाली संजय आकरे, खरबी

कोट

सध्या सणांमुळे ग्राहकांकडून साखरेची मागणी वाढत आहे. आपल्या जिल्ह्यात तरी अजून साखरेचे फारसे दर वाढलेले नाहीत. गेल्या काही वर्षात तेल, साबण, साखरेचे रेट हे आवाक्याबाहेर गेले आहेत.

एक व्यावसायिक, भंडारा

कोट

साखरच नाही तर प्रत्येक गोष्टीचे दर वाढत चालले आहेत. सरकारला सामान्य जनतेचे काही देणे घेणे नाही. जनताही सर्व निमूटपणे सहन करत आहे. याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे.

दिनेश वासनिक, केसलवाडा