शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

भंडाऱ्यात फडकला स्वतंत्र विदर्भाचा झेंडा

By admin | Updated: May 2, 2017 00:51 IST

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भराज्य आघाडीतर्फे स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावून रक्ताक्षरी अभियानाला आजपासून प्रारंभ करण्यात आला.

सहनशीलतेचा अंत पाहू नका : ‘वीरा’च्या रक्ताक्षरी अभियानात महिलांचा उत्स्फूर्त सहभागभंडारा : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भराज्य आघाडीतर्फे स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावून रक्ताक्षरी अभियानाला आजपासून प्रारंभ करण्यात आला. आमचं हे रक्ताचं बलिदान म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची नांदी आहे. आता विदर्भ घेण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असा इशारा ‘वीरा’चे भंडारा जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. पदमाकर टेंभूर्णीकर यांनी दिला. येथील त्रिमूर्ती चौकात वीरा तर्फे घेण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलत होते. कार्यक्रमाची सुरवात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून झाली. त्यानंतर विदभार्चा झेंडा फडकवून राष्ट्रगीताचे गायन झाले. कर्ज व नापिकीपायी विदर्भात ३५००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या रोखण्यासाठी स्वतंत्र विदर्भ होणे गरजेचे आहे. विदर्भाची ओळख फार जुनी आहे. राजकीय स्वार्थापोटी विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात सामील करण्यात आले. राज्य पुनर्निर्माण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती धर यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची शिफारस केली होती. परंतु त्याचवेळी मुंबईसह महाराष्ट्र निर्मितीची चळवळ सुरु होती. विदर्भ वेगळा झाल्यास मुंबई गुजरातमध्ये सामील होईल. संयुक्त महाराष्ट्राच्या दावणीला बांधल्या गेलो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण, भारनियमन, बेरोजगारी, गरिबी आमच्या वाट्याला आली. पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. आता बस झालं "रक्ताक्षरी" ने आमची बलिदानाच्या दिशेने तयारी सुरु झाली. येत्या केंद्रीय अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा ठराव पारित करावा असे आवाहन त्यांनी केले.पूर्व विदर्भ महिला आघाडीच्या संयोजिका सरिता निंबार्ते म्हणाल्या, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा लहान राज्यांचे पुरस्कर्ते होते, लहान राज्यांची निर्मिती म्हणजे प्रगतीकडे वाटचाल होय. विदर्भ निर्मितीच्या लढ्यात महिलांनी आणि तरुणींनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी विदर्भवाद्यांची भाषणे झाली. सहनशीलतेचा अंत पाहू नये आजपासून "रक्ताक्षरीने" अंताचा लढा" विदर्भवाद्यांनी यावेळी गर्भित इशारा दिला. यावेळी पूर्व विदर्भ महिला आघाडीच्या संयोजिका सरिता निंबार्ते, रमाकांत पशीने, केशव हूड, प्रवीण भेलावे, शैलेंद्र निंबार्ते, अजय मेश्राम, प्रा.वडेटावार, मनीषा टेंर्भूणे, सोनाली भेलावे, बबिता तिडके, संगीता बनसोड, वर्षा माटूरकर, प्रगती ढवळे, अमित टीचकुले, वृंदा गायधने, निहार बुलबुले, , बिट्टू सोनकुसरे, चारुदत्त बाळबांडे, प्रवीण कळंबे, अंकित बांते, पी. झेड. गोसावी, अ‍ॅड काटेखाये, पंडित भालाधरे, ललितसिंह बाच्छिल, संजय बनसोड, भास्कर बांगडकर व विदर्भवादी उपस्थित होते. (प्रतिनिधी)साकोलीत रक्ताक्षरी अभियानाला प्रारंभसाकोली : विदर्भ राज्य आघाडी तर्फे आयोजित १ मे काळा दिवस व रक्ताक्षरी अभियानप्रगती कॉलोनीतील चौकात पार पडला. विदर्भाचा ध्वज राकेश भास्कर यांच्या हस्ते फडकावून व त्यांच्या रक्ताची स्वाक्षरी घेवून सदर कार्यक्रमाला सुरुवात झाली. विदर्भाची मागणी ही सामान्य जनतेची आहे हे प्रधानमंत्री यांना सांगता यावे, म्हणून वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे, रक्ताने अंगठा मारून सही केलेले (रक्ताक्षरी) निवेदन संपूर्ण विदर्भार्तन प्रधानमंत्री यांना पाठविण्याचे आंदोलन विदर्भ राज्य आघाडी (वीरा) तर्फे करण्यात येत आहे. रक्ताक्षरी अभियानात वीराचे प्रदेश सचिव राकेश भास्कर, साकोली नगर परिषदचे नगरसेवक मनीष कापगते, समाज भूषण पुरस्कार प्राप्त डी.जी.रंगारी, समाज प्रवर्तक शब्बीर पठाण, साकोली वीराचे दीपक जांभूळकर, सुनील जांभूळकर, अखिलेश गुप्ता, दिलीप मासुरकर, शरद उरकुडे, चेतन खोब्रागडे, हिवराज टेंभूर्णे, विजय रंगारी, महेश शहारे, लक्ष्मण टेंर्भूणे, अशोक बेहरे, लक्ष्मन राऊत, सुनील वाढई, घनश्याम दोनोडे, युवराज वाढई, हिरालाल किरनापुरे, दिनेश कापगते, सिराज भाई, शिवनाथ राऊत, वसंत शिवणकर, हेमकृष्ण कापगते, देविदास चुटे, इमरान पठान, सोनू भुरे, राज गणवीर, अभिलाष गजभिये, जी.एस.आवरकर, एस.आर.आगाशे, अजय जवंजाळ, आकाश सोफंडे, तोसीफ शेख, प्रमोद टेंर्भूणे, सतीश देशमुख, लखन चांदेवार, साहिल गायधने, निखील गिऱ्हेपुंजे, रामाधीश कांबळे, विलास शेंडे, व्ही.पी.शिवरकर अमीन शेख व इतर असे एकूण १२८ विदर्भ वाद्यांनी स्वत:च्या रक्ताने अंगुठा लावून वेगळ्या विदभार्ची मागणी केली. संचालन दीपक जांभूळकर यांनी केले. सकाळी ९ वाजता फडकवीलेला विदर्भाचा झेंडा सायंकाळी ५ वाजता उतरविण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)