शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यापूर्वीच तुमसर नगरपरिषदेवर फडकला होता तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:02 IST

देशाला १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि तिरंगा डौलाने फडकू लागला. मात्र तुमसर नगरपरिषदेवर २ आॅक्टोबर १९२९ रोजीच देशभक्तांनी तिरंगा फडकवून संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. महात्मा गांधींनीही या घटनेची दखल घेतली होती.

ठळक मुद्देसहा जणांना वीरमरण : स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांना ‘सळो की पळो’ करून सोडले होते.

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देशाला १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि तिरंगा डौलाने फडकू लागला. मात्र तुमसर नगरपरिषदेवर २ आॅक्टोबर १९२९ रोजीच देशभक्तांनी तिरंगा फडकवून संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती. महात्मा गांधींनीही या घटनेची दखल घेतली होती. स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असणाऱ्या तुमसर शहरात ब्रिटीशांच्या गोळीबारात सहा जणांना वीर मरण आले होते. स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात तुमसरचे नाव अजरामर झाले आहे.‘करेंगे या मरेंगे’ या ध्येयाने प्रेरित होऊन ब्रिटिशांच्या विरूद्ध संपूर्ण देशात रान पेटले होते. भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरही त्यात आघाडीवर होते. मध्यप्रदेशातील राजधानी नागपूर होते. तर जबलपूर हे दुसरे महत्वपूर्ण केंद्र होते. १८९१ च्या नागपूर अधिवेशनापासून स्वातंत्र्याचे वारे भंडारा जिल्ह्यात पोहचले. तुमसर शहरातील सुशिक्षित वर्गाने स्वातंत्र्य प्राप्तीसाठी पुढाकार घेतला. १९२० मध्ये नागपूर अधिवेशनाला तरूण उपस्थित राहिल्याने अनेकांना प्रेरणा मिळाली.त्या प्रेरणेतूनच तुमसर शहरात स्वातंत्र्य चळवळीने जोर धरला होता. २ आॅक्टोबर १९२९ रोजी पो.प. दामले, वासूदेव कोंडेवार आणि विदर्भवीर वामनराव जोशी यांनी तुमसर नगरपरिषदेवर तिरंगा फडकविला. स्वातंत्र्यापूर्वी तिरंगा फडकविणारे तुमसर हे एकमेव शहर असावे.या घटनेने ब्रिटिशांचा तीळपापड झाला. संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. महात्मा गांधींनीही या घटनेची दखल घेत वीर जवानांचे कौतुक केले.विदर्भात सर्वाधिक स्वातंत्र्यसंग्राम सैनिकस्वातंत्र्य लढ्यात सर्वस्वाची बाजी लावण्यात तुमसर आघाडीवर होते. या शहरात विदर्भात सर्वाधिक स्वातंत्र्य संग्राम सैनिक असून १६७ जणांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली होती, अशी शासन तफ्तरी नोंद आहे. मोहाडी येथे ३५ स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी लढ्यात भाग घेतला. चुल्हाड येथील स्वातंत्र्य संग्राम सैनिक भीवाजी अंबुले यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिल्लीत गौरव करण्यात आला होता. तुमसरचे नाव स्वातंत्र्य लढ्यात अजरामर झाले आहे.असा झाला होता गोळीबारतुमसरमध्ये स्वातंत्र्य लढ्याने चांगलाच जोर पकडला होता. सकाळी प्रभातफेरी आणि रात्री गुप्त बैठका होत होत्या. १० आॅगस्ट १९४२ ला माकडे गुरूजी व भिवाजी लांजेवार यांना अटक झाली. त्याच रात्री बाबुजी लांजेवार यांच्या अन्नपुर्णा राईस मिलमध्ये गुप्त बैठक घेण्यात आली. ८० सदस्य उपस्थित होते. या बैठकीत करेंगे या मरेंगे चा निर्धार करण्यात आला. मात्र ही माहिती पोलिसांना मिळाली. सर्कल इन्स्पेक्टर गोपालसिंग व तुमसरचे इन्स्पेटक्टर रवानी, सहायक दिलावर खान, महम्मद शफी यांच्या मदतीला भंडारा येथून कुमक बोलाविण्यात आली. मोहाडी येथे तरूणांनी खड्डे खोदून कुमक अडविण्याचा प्रयत्न केला. भंडाराचे स्पेशल मॅजिस्ट्रेट जयवंत रात्रीच तुमसरला पोहचले होते. नागरिक जुन्या गंज बाजारातून पोलीस ठाण्याकडे आग लावण्याकडे जावू लागली. १४ आॅगस्ट १९४२ चा तो दिवस होता. वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा नागरिक देत होते. वातावरण चिघडले. पोलिसांनी जमावावर सुरूवातीला लाठीमार केला. नागरिकांनी दगडफेक करत प्रतिउत्तर दिले. जमाव पोलीस ठाण्याच्या दिशेने सरकू लागला. ठाणेदार रवानी यांच्या पत्नीने हाती पुस्तूल घेवून जमावाला धमकाविण्याचा प्रयत्न केला. पाहता पाहता गोळी चालली. श्रीराम धुर्वे या तरूणाच्या डोळ्यात गोळी शिरली आणि तो जागीच गतप्राण झाला. जमाव भडकला. पोलिसांनी बेधुंद गोळीबार केला. मॅजिस्ट्रेट जयवंत यांनीही गोळीबार करण्यासाठी सुरूवात केली. या लढ्यात श्रीराम धुर्वे, भदूजी रामाजी लोंदासे, श्रीहरी काशिनाथ फाये (करडी), पांडूरंग परसराम सोनवाने, भुवाजी बालाजी वानोरे, राजाराम पैकु धुर्वे शहीद झाले तर १३० नागरिक जखमी झाले.देव्हाडी रेल्वेस्थानक जाळण्याची होती तयारीदेव्हाडी येथील बाजार चौकातील सभेत रामचंद्र दशरथ फाये, पन्नालाल यांची भाषणे झाली. त्यानंतर मुंबई हावडा मार्गावरील देव्हाडी रेल्वेस्थानक जाळण्याचा निर्धार करण्यात आला. परंतु दोघांनाही पोलिसांनी पकडले. त्यामुळे रेल्वे स्टेशन जाळण्याचा प्रयत्न असफल झाला.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन