शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या मानधनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:06 IST

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या मानधनात राज्य शासनाने वाढ केली आहे. याबाबतचा आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला आहे. आता दरमहा २०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळणार आहेत.

ठळक मुद्देदिलासा : २०० रुपयांवरुन मानधन ५०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या मानधनात राज्य शासनाने वाढ केली आहे. याबाबतचा आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला आहे. आता दरमहा २०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळणार आहेत.वृध्दांना आयुष्याच्या सायंकाळी सन्मानाने जगता यावे. यासाठी शासन त्यांना निवृत्तीवेतन देते. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राज्यात राबविली जात आहे.यात आतापर्यंत या योजनेअंतर्गत अगदी तुटपूंजे मानधन दिले जाते. वेळोवेळी केंद्र शासनाने या योजनांमध्ये सुधारणाही केल्या आहेत. त्यांची अमंलबजावणी राज्य शासनाने केली आहे. वयाच्या ८० वर्षावरील वृध्दांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेंतर्गत आतापर्यंत २०० रुपये मासिक मानधन दिले जात होते. त्यात ३०० रुपयांची वाढ करुन आता सदर मानधन प्रतीमाह ५०० रुपये करण्यात आली आहे.इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत ४० ते ६५ वर्षाखालील महिलांना दरमहा २०० रुपये दिले जात होते. आता या योजनेसाठी ४० ते ७९ वर्ष असे वय करण्यात आले असून प्रतीमाह ३०० रुपये मानधन दिले जाणार असल्याची माहिती आहे. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगनिवृत्ती वेतन योजनेसाठी सध्या १८ ते ६५ वर्षाखालील लाभार्थ्यांना लाभ दिला जात होता. त्यात बदल करुन १८ ते ७९ असे करुन २०० रुपयांऐवजी आता प्रतीमाह ३०० रुपये मानधन दिले जाणार आहे.सदर योजनेचे मानधन महागाईच्या काळात अगदी तुटपूंजे असले तरी आयुष्याच्या सायंकाळी ही रक्कमही मोठी असते. आजारपण व विविध कारणात ही रक्कम वृध्दांना आधार ठरते. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ राज्यातील हजारो वृध्दांना मिळणार आहे.