शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
2
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
3
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
4
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
5
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
6
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
7
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
8
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
9
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
10
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
11
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
12
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
13
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
14
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
15
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
16
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
17
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
18
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
19
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
20
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या मानधनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:06 IST

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या मानधनात राज्य शासनाने वाढ केली आहे. याबाबतचा आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला आहे. आता दरमहा २०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळणार आहेत.

ठळक मुद्देदिलासा : २०० रुपयांवरुन मानधन ५०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या मानधनात राज्य शासनाने वाढ केली आहे. याबाबतचा आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला आहे. आता दरमहा २०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळणार आहेत.वृध्दांना आयुष्याच्या सायंकाळी सन्मानाने जगता यावे. यासाठी शासन त्यांना निवृत्तीवेतन देते. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राज्यात राबविली जात आहे.यात आतापर्यंत या योजनेअंतर्गत अगदी तुटपूंजे मानधन दिले जाते. वेळोवेळी केंद्र शासनाने या योजनांमध्ये सुधारणाही केल्या आहेत. त्यांची अमंलबजावणी राज्य शासनाने केली आहे. वयाच्या ८० वर्षावरील वृध्दांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेंतर्गत आतापर्यंत २०० रुपये मासिक मानधन दिले जात होते. त्यात ३०० रुपयांची वाढ करुन आता सदर मानधन प्रतीमाह ५०० रुपये करण्यात आली आहे.इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत ४० ते ६५ वर्षाखालील महिलांना दरमहा २०० रुपये दिले जात होते. आता या योजनेसाठी ४० ते ७९ वर्ष असे वय करण्यात आले असून प्रतीमाह ३०० रुपये मानधन दिले जाणार असल्याची माहिती आहे. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगनिवृत्ती वेतन योजनेसाठी सध्या १८ ते ६५ वर्षाखालील लाभार्थ्यांना लाभ दिला जात होता. त्यात बदल करुन १८ ते ७९ असे करुन २०० रुपयांऐवजी आता प्रतीमाह ३०० रुपये मानधन दिले जाणार आहे.सदर योजनेचे मानधन महागाईच्या काळात अगदी तुटपूंजे असले तरी आयुष्याच्या सायंकाळी ही रक्कमही मोठी असते. आजारपण व विविध कारणात ही रक्कम वृध्दांना आधार ठरते. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ राज्यातील हजारो वृध्दांना मिळणार आहे.