शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

गारांसह अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 21:40 IST

आठ दिवसांपुर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. शुक्रवारीही वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात सर्वत्र गारांसह पावसाने हजेरी लावली. बोरीच्या व चना एवढ्या आकाराच्या गारा बरसल्या. या गारपिटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चौरास भागात गारपिटीचे प्रमाण जास्त आहे.

ठळक मुद्देरबी पिकांचे नुकसान : शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आठ दिवसांपुर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. शुक्रवारीही वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात सर्वत्र गारांसह पावसाने हजेरी लावली. बोरीच्या व चना एवढ्या आकाराच्या गारा बरसल्या. या गारपिटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चौरास भागात गारपिटीचे प्रमाण जास्त आहे.जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिना सुरू होताच अस्मानी संकटाने पुन्हा डोके वर काढले. पहिल्या पावसात बळीराजाने हिम्मत दाखवित पीक नुकसान सहन केले. मात्र मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाने हातात आलेले पीक ही जाण्याच्या मार्गावर आले. त्यातच धान खरेदी केंद्रातबाहेर उघड्यावर ठेवलेल्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. याशिवाय गहू, हरभरा, लाख, लाखोरी यासह कठाण पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. भाजीपाला पिकांवर गारपिटीचा चांगलाच दुष्परिणाम दिसून आला.जवाहरनगर येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास वादळी वाºयासह गारपिट व पाऊस बरसला. यात शेतमालाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. भंडारा तालुक्यात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. जवळपास १० मिनिटांपर्यंत गारपिटीसह पाऊस बरसला. बोरीच्या आकाराच्या गारा बरसल्या.लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, बोरीच्या आकाराच्या गारांसह पाऊस बरसला. या पावसामुळे कठाण पिकांसह भाजीपाल्यांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची धांदल उडाली.करडी येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजताच्या सुमारास गारपिटीसह पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतल्या जाते. सदर पावसामुळे पिकांना फटका बसल्याचे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाने या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ मोका पंचनामा करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यातील लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर, तुमसर व मोहाडी तालुक्यातही पाऊस बरसल्याची माहिती आहे.वीज कोसळून बैल ठारसाकोली तालुक्यातही विजांच्या गडगटासह पाऊस बरसला. यात पळसगाव सोनका येथील शेतशिवारात बांधलेल्या बैल जोडीतील एका बैलावर वीज कोसळली. यात बैलाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे पशुमालक तुकाराम नारायण कावळे यांचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. कावळे यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.