शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मामा तलावाच्या खोलीकरणामुळे सिंचन क्षमतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 23:01 IST

गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून मामा तलावाचे खोलीकरण करण्यात येत आहे. खोलीकरणामुळे तलावातील गाळ शेतात टाकून शेतीची सूपिकता वाढविता येइल व तलाव खोलीकरणामुळे पाण्याची पातळी वाढून सिंचनात वाढ होईल.

ठळक मुद्देराजेश काशिवार : गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार मोहिमेचा लवारी येथे शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून मामा तलावाचे खोलीकरण करण्यात येत आहे. खोलीकरणामुळे तलावातील गाळ शेतात टाकून शेतीची सूपिकता वाढविता येइल व तलाव खोलीकरणामुळे पाण्याची पातळी वाढून सिंचनात वाढ होईल. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होईल, यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून मामा तलावातील गाळ काढण्याचे काम मोठया प्रमाणात करावे, असे आवाहन आमदार राजेश काशिवार यांनी केले.जिल्ह्यात गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार अभियान अनुलोमच्या माध्यमातून लोकसहभागातून करण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ आमदार राजेश काशिवार यांच्या हस्ते साकोली तालुक्यातील लवारी येथील मामा तलावातील गाळ काढून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते होते. प्रमुख पाहूणे म्हणून साकोलीचे तहसिलदार अरविंद हिंगे, गटविकास अधिकारी एस.एम. तडस, साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, पं.स. संदस्य जयश्री पर्वते, अनुलोकचे नागपूर विभागाचे समन्वयक हेमंत ब्राम्हणकर, भंडारा-गोंदियाचे समन्वयक सतीश ठाकरे, लवारीचे सरपंच गायश्री टेंभूर्णे, उपसरपंच सुरेश नागरिकर, उमरीचे सरपंच भोजराज कापगते, सरपंच मुडींपार हरीश लांडगे, सरपंच वडद शोभा शहारे, सरपंच बोदडा सारिका राऊत, सरपंच पिंडकेपार समरित, लवारी ग्रामविकास अधिकारी आर. एम. झाडे, महेश भदाडे उपस्थित होते.आमदार काशिवार म्हणाले, मामा तलावाचे खोलीकरण व दुरुस्तीच्या उपाययोजनाबाबत आपण विधानभवनात आवाज उठविला आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ४ हजार ३०४ मालगूजारी तलाव १८४० पासून आहेत. आज त्यांना २५० वर्ष झालेले आहेत. तलाव दुरुस्तीच्या स्थितीत आले आहेत. त्यामुळे गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून त्यांचे खोलीकरण करण्यात येत आहे. तलाव खोलीकरणामुळे मासेमारी व्यवसायास चालना मिळेल. तलाव म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे जीवन म्हणून या कार्यास गावकऱ्यांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. सरपंच व त्यांच्या टिमने समन्वयातून काम करावे तसेच गावाचा विकास साधावा. विपरित परिस्थितीत कार्य करणे हाच पुरुषार्थ आहे.यावेळी बोलतांना रवी गिते यांनी गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याच्या पातळीत वाढ होईल. तसेच जमीनीची सुपिकता वाढेल असे सांगितले. अनुलोमचा जिल्ह्यातील ८० तलावातून गाळ काढण्याचा निश्चय हा अभिनंदनीय आहे. या कामास गावकऱ्यांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. पाण्याच्या येवा वाढण्यास होणारे मार्ग चालू करण्याची सूचना यावेळी केल्या. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होईल. स्वच्छ गाव होण्यास गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.हेमंत ब्राम्हणकर यांनी ५ हजार तलाव अनुलोमद्वारे लोकसहभागातून खोलीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. यात भंडारा, नागपूर, गडचिरोली व गोंदियाचा समावेश आहे. गाळ काढून शेतात टाकणार असल्याने पाण्याची पातळी वाढेल व जमीनीची सुपिकता वाढेल असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्यामुळे या कामास सहकार्य करावे, असे ते म्हणाले.अशोक कापगते म्हणाले, या तलावाच्या खोलीकरणासाठी अनेकदा निधी मंजूर करण्यात आला. परंतु खोलीकरण झाले नाही. आज गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत हे काम होत आहे. हे लवारीच्या ग्रामस्थांना अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे ५ हजार तलाव प्रचंड लोकसहभागातून करत आहे.अनुलोम नी स्वत: सर्व्हे करून ५ हजार तलावांची निवड करून मागील महिन्याभरा पासून तलावातून गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात लोकसहभागातून टाकण्याचे कार्य करत आहे.शुभारंभ कार्यक्रमासाठी अनुलोम साकोली भाग जनसेवक महेश भदाडे, हिरालाल बारापात्रे, सुधीर किरणापुरे, महेश करंजीकर, आनंद कापगते, हिरालाल लांजेवार, ग्रामपंचायत कार्यकारिणी व शेतकरी , संपूर्ण ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेऊन गावासाठी पुढाकार घेतला.