शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वन्यजीव-मानव संघर्षाच्या घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST

भंडारा जिल्ह्याच्या चहूबाजूला समृद्ध जंगल आहे. तीन अभयारण्यांची सीमा भंडारा जिल्ह्यात आहे. वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, निलगाय आदींसह विविध ...

भंडारा जिल्ह्याच्या चहूबाजूला समृद्ध जंगल आहे. तीन अभयारण्यांची सीमा भंडारा जिल्ह्यात आहे. वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, निलगाय आदींसह विविध हिंस्त्र व तृणभक्षी प्राणी आहेत. मात्र अलीकडे जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये वन्यजीवांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत आहे. सर्वाधिक घटना तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलात घडल्याचे दिसून येत आहे. १७ ऑगस्ट रोजी तुमसर तालुक्यातील कवलेवाडा येथील पुनाराम कुसराम या गुराख्यावर वाघाने हल्ला केला. त्यानंतर तुमसर तालुक्यातीलच साखळी येथील भीमराज बिसने या गुराख्यावर २३ ऑगस्ट रोजी, तर आष्टी येथील गुराखी रूपचंद सोनवाने यांच्यावर २७ ऑगस्ट रोजी वाघाने हल्ला केला. तुमसर तालुक्यातील जंगलात वाघांची संख्या वाढल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे तीनही घटनास्थळ एकमेकांपासून दूर आहेत. तीनही ठिकाणी वाघानेच हल्ले केले. सुदैवाने यात कुणाचा प्राण गेला नाही. यासोबतच रानडुकराच्या हल्ल्यात लाखांदूर तालुक्यातील चिकना येथील रखमा बापू वलथरे ही महिला गंभीर जखमी झाली. पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्प परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आले.

बॉक्स

वनविभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना

वन्यजीव आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. जंगलव्याप्त परिसरात असलेल्या गावात दवंडी देण्यात आली. कुणीही एकटे जंगलात जाऊ नये, अशी सूचना देण्यात आल्या. वनविभागानेही या परिसरात गस्त वाढविली आहे. शेतात जाताना समूहाने जावे, तसेच सायंकाळच्या आत घराकडे परत यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्यात त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.

बॉक्स

हल्ल्याची वेळ सायंकाळची

तुमसर तालुक्यात वाघाच्या तीनही घटना साधारणत: सायंकाळी ४ ते ५ या वेळातच घडल्या आहेत. ही वेळ वाघाची भ्रमण वेळ असते. त्यातही कोणत्याही वाघाने जंगलाबाहेर गावात शिरून कुणावर हल्ला केला नाही. गुराखी जंगलात असताना त्यांच्यावर हल्ला केला आहे.