शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

धान्य वितरण व्यवस्था मजबूत करावी

By admin | Updated: April 5, 2016 03:22 IST

गावातील धान्य वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी ग्रामदक्षता समित्या सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी गाव दक्षता

भंडारा : गावातील धान्य वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी ग्रामदक्षता समित्या सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी गाव दक्षता समित्यांच्या नियमित बैठका घेवून त्याची इतिवृत्त प्रत्येक महिन्याच्या मागणीपत्रासोबत जोडावे. तसेच रेशन दुकानदारांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेला धान्यसाठा ग्रामपंचायत तसेच रेशन दुकानामध्ये जाहिररित्या प्रदर्शित करावा, असा सूर आजच्या पहिल्याच जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत अशासकीय सदस्य व शासकीय सदस्यांनी व्यक्त केला.जिल्हा दक्षता समितीवर पालकमंत्र्यांनी निवडलेल्या अशासकीय सदस्यांचा समावेश असलेल्या समितीची पहिली बैठक आज जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याबैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे , अ‍ॅड. वसंत एंचीलवार, विठ्ठल बांडेबुचे, राजु गायधने, मिलींद रामटेके, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, उपनिबंधक एस.एन. क्षीरसागर, माहिती अधिकारी मनीषा सावळे उपस्थित होते. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्थेसंबंधी माहिती सदस्यांना दिली. यापूर्वी जिल्ह्यात गोडावून मधून रेशन दुकानदार धान्य घेवून जात होते. आता एकाच पुरवठादारामार्फत सर्व रेशन दुकानदारांना धान्याचा पुरवठा करण्यात येतो. जिल्ह्यात ५ लाख ४३ हजार ४०६ प्राधान्य कुटुंब तर ६४ हजार २४९ अंत्योदय कुटुंब आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण ८८८ रेशन दुकानदार असून ११७८ किरकोळ केरोसिन विक्रेते आहेत. जिल्ह्यात आधार सिडींगचे काम ८२.२९ टक्के झाले आहे, अशी माहिती अनिल बनसोड यांनी समिती समोर ठेवली. ग्राहकांना वेळेवर धान्य मिळण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या २५ ते ३० तारखेपर्यंत तहसिलदारांकडे मागणीपत्र भरुन दिले पाहिजे. यासह अनेक सूचना अशासकीय सदस्यांकडून करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)